शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शाळास्तरावर गतवर्षीची पाठ्यपुस्तके स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू; पालकांचाही मिळतोय प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:14 IST

नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच ...

नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत नसल्यामुळे जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. यासाठी शिक्षण विभागाने पालकांना विनंती केल्यानुसार जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शाळास्तरावर मागीलवर्षीची सुस्थितीतील पुस्तके पालकांनी शाळेकडे परत करण्यास सुरुवात केली असून, ही पुस्तके शाळास्तरावर पालकांकडून स्वीकारून शिक्षक ग्रंथालयांमध्ये जमा करत आहेत. त्यामुळे बालभारतीकडे होणाऱ्या नवीन पुस्तकांच्या मागणीत आणि पर्यायाने छपाईच्या खर्चातही कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गतवर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये ५ लाख १६ हजार ४८८ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानांतर्गत पुस्तकांचे संच मोफत वितरीत करण्यात आले होते. विशेष म्हणजे, पालकांनी समजूतदारपणा दाखवत पुस्तके जमा करतानाच जिल्ह्यातील अन्य पालकांनाही पुस्तके जमा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती सुरू केेली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक विभागाची शाळा वर्षभर भरलीच नाही. तर पाचवी ते आठवीपर्यंतची शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. मात्र, त्यांचेही वर्ग काही दिवसच सुरू राहिले. त्यामुळे मार्गीलवर्षी विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या पुस्तकांचा पाहिजे तसा वापरच झाला नसल्याने पुस्तके जशीच्या तशीच होती. त्यामुळे शिक्षण विभागाने पालकांना गतवर्षींची पुस्तके परत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास ६ ते ७ हजार पालकांनी पुस्तके परत करून आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षण विभागाकडून बालभारतीकडे पुस्तकांची केली जाणारी मागणी कमी होण्याचे संकेत आहेत.

--

--

अशी आहे आकडेवारी

मागीलवर्षी संच वाटप - ५,१६,४८८

यावर्षी अंदाजित मागणी - ४,६४,५७०

-- ग्रामीण भागात पालकांचा पुढाकार

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची सुस्थितीतील पुस्तके परत मिळवून त्यांचा पुनर्वापर करण्याचा विचार पालकांनाही चांगलाच भावला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी इतर पालकांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन मागील वर्षातील सुस्थितीतील पुस्तके परत करण्यासाठी आवाहन करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून पालकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, विविध तालुक्यांमध्ये पालकांकडून शाळास्तरावर शिक्षकांकडे पुस्तके जमा होऊ लागली आहेत.

- पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होणार असून, या माध्यमातून होणारा खर्चही वाचणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनासाठी यातून हातभार लागू शकतो. पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास कागदाची बचत होणार आहे.

---

आम्ही परत केली, तुम्ही कधी करणार

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी गतवर्षी पाठ्यपुस्तकांचा फारसा वापर केलेला नाही. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची पुस्तके सुस्थितीत आहेत. ती परत केली तर पुढील वर्षी शासनाला पुस्तकांवरील खर्च अन्य शैक्षणिक विकासासाठी करता येईल. त्यामुळे सर्वच पालकांनी जबाबदारी स्वीकारून चांगली पुस्तके परत करायला हवीत.

- यशवंत जाधव, पालक

---

विद्यार्थ्यांना शाळेतच पाठ्यपुस्तके मिळत असल्याने आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना दिलासा मिळतो. त्यामुळे सर्वच पालकांनी त्यांच्या मुलांनी वापरलेली सुस्थितीतील पुस्तके शाळेकडे परत जमा करायला हवी. पुस्तके जमा करणाऱ्या पालकांनी आपल्या आजूबाजूच्या पालकांनाही यासाठी प्रवृत्त करणे आ‌वश्यक आहे.

- सुभाष कदम, पालक

--

कोट-

शाळास्तरावर शिक्षकांकडून प्रक्रिया

शासनाच्या निर्देशानुसार ज्या विद्यार्थ्यांची पुस्तके सुस्थितीत आहेत, त्यांची पुस्तके शाळास्तरावरील ग्रंथालयांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया स्थानिक शिक्षकांकडून सुरू आहे. याविषयीचा एकत्रित अहवाल अद्याप प्राप्त नाही. मात्र, पालकांचा पुस्तके जमा करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी

--

--

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

पहिली - १,१७,०४५

दुसरी - १,२१,३४२

तिसरी - १,२०,६१८

चौथी - १,२३,९३९

पाचवी - १,२२,७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी - १,१५,९१०