शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

शाळास्तरावर गतवर्षीची पाठ्यपुस्तके स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू; पालकांचाही मिळतोय प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:14 IST

नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच ...

नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत नसल्यामुळे जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. यासाठी शिक्षण विभागाने पालकांना विनंती केल्यानुसार जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शाळास्तरावर मागीलवर्षीची सुस्थितीतील पुस्तके पालकांनी शाळेकडे परत करण्यास सुरुवात केली असून, ही पुस्तके शाळास्तरावर पालकांकडून स्वीकारून शिक्षक ग्रंथालयांमध्ये जमा करत आहेत. त्यामुळे बालभारतीकडे होणाऱ्या नवीन पुस्तकांच्या मागणीत आणि पर्यायाने छपाईच्या खर्चातही कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गतवर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये ५ लाख १६ हजार ४८८ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानांतर्गत पुस्तकांचे संच मोफत वितरीत करण्यात आले होते. विशेष म्हणजे, पालकांनी समजूतदारपणा दाखवत पुस्तके जमा करतानाच जिल्ह्यातील अन्य पालकांनाही पुस्तके जमा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती सुरू केेली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक विभागाची शाळा वर्षभर भरलीच नाही. तर पाचवी ते आठवीपर्यंतची शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. मात्र, त्यांचेही वर्ग काही दिवसच सुरू राहिले. त्यामुळे मार्गीलवर्षी विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या पुस्तकांचा पाहिजे तसा वापरच झाला नसल्याने पुस्तके जशीच्या तशीच होती. त्यामुळे शिक्षण विभागाने पालकांना गतवर्षींची पुस्तके परत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास ६ ते ७ हजार पालकांनी पुस्तके परत करून आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षण विभागाकडून बालभारतीकडे पुस्तकांची केली जाणारी मागणी कमी होण्याचे संकेत आहेत.

--

--

अशी आहे आकडेवारी

मागीलवर्षी संच वाटप - ५,१६,४८८

यावर्षी अंदाजित मागणी - ४,६४,५७०

-- ग्रामीण भागात पालकांचा पुढाकार

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची सुस्थितीतील पुस्तके परत मिळवून त्यांचा पुनर्वापर करण्याचा विचार पालकांनाही चांगलाच भावला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी इतर पालकांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन मागील वर्षातील सुस्थितीतील पुस्तके परत करण्यासाठी आवाहन करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून पालकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, विविध तालुक्यांमध्ये पालकांकडून शाळास्तरावर शिक्षकांकडे पुस्तके जमा होऊ लागली आहेत.

- पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होणार असून, या माध्यमातून होणारा खर्चही वाचणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनासाठी यातून हातभार लागू शकतो. पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास कागदाची बचत होणार आहे.

---

आम्ही परत केली, तुम्ही कधी करणार

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी गतवर्षी पाठ्यपुस्तकांचा फारसा वापर केलेला नाही. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची पुस्तके सुस्थितीत आहेत. ती परत केली तर पुढील वर्षी शासनाला पुस्तकांवरील खर्च अन्य शैक्षणिक विकासासाठी करता येईल. त्यामुळे सर्वच पालकांनी जबाबदारी स्वीकारून चांगली पुस्तके परत करायला हवीत.

- यशवंत जाधव, पालक

---

विद्यार्थ्यांना शाळेतच पाठ्यपुस्तके मिळत असल्याने आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना दिलासा मिळतो. त्यामुळे सर्वच पालकांनी त्यांच्या मुलांनी वापरलेली सुस्थितीतील पुस्तके शाळेकडे परत जमा करायला हवी. पुस्तके जमा करणाऱ्या पालकांनी आपल्या आजूबाजूच्या पालकांनाही यासाठी प्रवृत्त करणे आ‌वश्यक आहे.

- सुभाष कदम, पालक

--

कोट-

शाळास्तरावर शिक्षकांकडून प्रक्रिया

शासनाच्या निर्देशानुसार ज्या विद्यार्थ्यांची पुस्तके सुस्थितीत आहेत, त्यांची पुस्तके शाळास्तरावरील ग्रंथालयांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया स्थानिक शिक्षकांकडून सुरू आहे. याविषयीचा एकत्रित अहवाल अद्याप प्राप्त नाही. मात्र, पालकांचा पुस्तके जमा करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी

--

--

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

पहिली - १,१७,०४५

दुसरी - १,२१,३४२

तिसरी - १,२०,६१८

चौथी - १,२३,९३९

पाचवी - १,२२,७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी - १,१५,९१०