शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

आॅनलाइन शाळा संकल्पनेला ग्रामीण भागात समस्यांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:34 IST

मालेगाव : जागतिक महामारी कोरोना संपूर्ण जगावर अस्मानी संकट घेऊन आलेला असताना गेल्या तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता आॅनलाइन ही नवीन शाळा विद्यार्थी- पालकांना खुणावत आहे. शहरी विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थी यांच्या वेगवेगळ्या समस्या आज आ वासून उभ्या आहेत.

मालेगाव : जागतिक महामारी कोरोना संपूर्ण जगावर अस्मानी संकट घेऊन आलेला असताना गेल्या तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता आॅनलाइन ही नवीन शाळा विद्यार्थी- पालकांना खुणावत आहे. शहरी विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थी यांच्या वेगवेगळ्या समस्या आज आ वासून उभ्या आहेत. ग्रामीण भागात आॅनलाइन शिक्षण कसे शक्य होईल याचीच चिंता लागली आहे .ग्रामीण भागात शेतकरी व मजूर मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांच्याही समस्या वेगळ्या आहेत. आॅनलाइन शिक्षणासाठी लागणारे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल याचीच वानवा असल्याने टॅब, संगणक, लॅपटॉप यांचा विषयच नाही. दूरदर्शन जरी असले तरी विजेची समस्या आहेच. आॅनलाइन शिक्षणासाठी लागणारी आवश्यक उपकरणे, इंटरनेट यांचा अतिरिक्त खर्च, उपलब्ध नसणारी रेंज याही समस्या आहेतच. ग्रामीण भागातील पालकांच्या घरात शिक्षण घेणारी मुलं एकापेक्षा अधिक असल्यास तेथे नियोजन करणे अवघड जाणार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना संपूर्ण आॅनलाइन शिक्षण मिळाल्यास शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया कशी होणार, त्यांचे मूल्यमापन, त्यांना कोणता घटक समजला, नाही समजला त्यांच्याकरिता काय उपाययोजना आहेत याविषयीही पालक अनभिज्ञ आहेत. ज्यांच्याकडे ही साधनेच नाहीत त्यांच्यापर्यंत शिक्षण कसे पोहोचावे याचे नियोजन करावे लागणार आहे.पालकांनी पाल्याजवळ बसून आॅनलाइन अभ्यास पूर्ण करून घेणे अपेक्षित असताना शेतीची वा इतर कामे सोडून ते कसे शक्य आहे या चिंतेत सध्या पालक आहे. दोन, तीन महिने अजून शाळा नाही भरल्या तरी हरकत नाही, पण आॅनलाइनच्या कचाट्यात इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांना आम्ही टाकू शकत नाही. मानसिक आरोग्यास हानी पोहोचणार नाही याची हमी कोण घेणार आहे? असेही पालक विचारत आहेत.------------------------विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार होत आहे, पण आॅनलाइन शिक्षणाकरिता योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण पालकांचे होणे गरजेचे आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पालक आज पाल्यांना शाळेत पाठविण्यास नकार देत आहेत तसेच आॅनलाइन शिक्षणाचेही योग्य समुपदेशन होऊन सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहोचेल, हे येणारा काळच ठरवेल.- भरत पाटील,उपक्रमशील शिक्षक, मालेगाव

टॅग्स :Nashikनाशिक