शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

कोतवालांच्या संपामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 18:23 IST

राज्यभरातील महसूल विभागातील तलाठी कर्मचाऱ्यांच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया कोतवाल कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे.

ठळक मुद्दे३८ दिवसांनंतरही आंदोलन सुरूच

येवला : राज्यभरातील महसूल विभागातील तलाठी कर्मचाऱ्यांच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया कोतवाल कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे.गुजरात राज्य सरकारने १९७९ मध्ये कोतवाल कर्मचाºयांना चतुर्थश्रेणीचा दर्जा दिला आहे. मात्र वर्षानुवर्षं मागणी, संप, आंदोलने करूनही महाराष्ट्र शासन कोतवालांचे प्रलंबित प्रश्न सोडवायला तयार नाही. गुजरात धर्तीवर आता तरी महाराष्ट्र शासनाने कोतवाल कर्मचाºयांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी येवल्यातील कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नायब तहसीलदार प्रकाश बुरु ंगले यांनी निवेदन स्वीकारले.ग्रामीण भागातील तलाठी कार्यालये कोतवालाअभावी ओस पडली असून, शेतकºयांच्या कामात असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील ग्रामीण भागात महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयाशी शेतकºयांचे पदोपदी काम असते. एका तलाठी कर्मचाºयाकडे तीन ते पाच गावांची कामे नेमलेली असतात. अशावेळेस तलाठी कार्यालयातील कोतवाल हा घटक शेतकºयांची आडलेली कामे करत असतो. याखेरीज महसूल गोळा करणे, संगणकीय कामे, निवडणूक, गावाचे दफ्तर सांभाळणे, नैसर्गिक आपत्ती, गौण खनिज, रात्रीच्या वेळी सरकारी कार्यालयाला पहारा देणे आदी कामे कोतवाल करतो. त्यामुळे कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष किरण पठारे, सुनील पगारे, सुकदेव घोडेराव, अरुण जाधव, इलियास पठाण, प्रवीण सोनवणे, अशोक पगारे, विवेक गाडेकर, सतीश भालेराव, नंदू दिवटे, ज्योती शिरसाठ, प्रियंका नडे, पूजा शिंदे, अर्चना दौंडे, गंगाराम लक्ष्मण आहेर आदींच्या स्वाक्षºया आहेत.कोतवाल कर्मचाºयांना चतुर्थश्रेणीत समाविष्ट करावेकोतवाल कर्मचाºयांना राज्य शासनाने चतुर्थश्रेणीत समाविष्ट करावे या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून राज्य अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सुमारे १२ हजार ६३७ कोतवाल कर्मचारी संपावर आहेत. संपाचा ३८ वा दिवस उजाडला असून, महाराष्ट्र शासन संपकºयांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याने राज्यभरात आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांवर संपकरी ठिय्या देऊन आहे.

टॅग्स :NashikनाशिकStrikeसंपGovernmentसरकार