शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांच्या संपामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 18:23 IST

राज्यभरातील महसूल विभागातील तलाठी कर्मचाऱ्यांच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया कोतवाल कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे.

ठळक मुद्दे३८ दिवसांनंतरही आंदोलन सुरूच

येवला : राज्यभरातील महसूल विभागातील तलाठी कर्मचाऱ्यांच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया कोतवाल कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे.गुजरात राज्य सरकारने १९७९ मध्ये कोतवाल कर्मचाºयांना चतुर्थश्रेणीचा दर्जा दिला आहे. मात्र वर्षानुवर्षं मागणी, संप, आंदोलने करूनही महाराष्ट्र शासन कोतवालांचे प्रलंबित प्रश्न सोडवायला तयार नाही. गुजरात धर्तीवर आता तरी महाराष्ट्र शासनाने कोतवाल कर्मचाºयांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी येवल्यातील कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नायब तहसीलदार प्रकाश बुरु ंगले यांनी निवेदन स्वीकारले.ग्रामीण भागातील तलाठी कार्यालये कोतवालाअभावी ओस पडली असून, शेतकºयांच्या कामात असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील ग्रामीण भागात महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयाशी शेतकºयांचे पदोपदी काम असते. एका तलाठी कर्मचाºयाकडे तीन ते पाच गावांची कामे नेमलेली असतात. अशावेळेस तलाठी कार्यालयातील कोतवाल हा घटक शेतकºयांची आडलेली कामे करत असतो. याखेरीज महसूल गोळा करणे, संगणकीय कामे, निवडणूक, गावाचे दफ्तर सांभाळणे, नैसर्गिक आपत्ती, गौण खनिज, रात्रीच्या वेळी सरकारी कार्यालयाला पहारा देणे आदी कामे कोतवाल करतो. त्यामुळे कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष किरण पठारे, सुनील पगारे, सुकदेव घोडेराव, अरुण जाधव, इलियास पठाण, प्रवीण सोनवणे, अशोक पगारे, विवेक गाडेकर, सतीश भालेराव, नंदू दिवटे, ज्योती शिरसाठ, प्रियंका नडे, पूजा शिंदे, अर्चना दौंडे, गंगाराम लक्ष्मण आहेर आदींच्या स्वाक्षºया आहेत.कोतवाल कर्मचाºयांना चतुर्थश्रेणीत समाविष्ट करावेकोतवाल कर्मचाºयांना राज्य शासनाने चतुर्थश्रेणीत समाविष्ट करावे या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून राज्य अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सुमारे १२ हजार ६३७ कोतवाल कर्मचारी संपावर आहेत. संपाचा ३८ वा दिवस उजाडला असून, महाराष्ट्र शासन संपकºयांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याने राज्यभरात आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांवर संपकरी ठिय्या देऊन आहे.

टॅग्स :NashikनाशिकStrikeसंपGovernmentसरकार