शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधीमुळे कॉँग्रेसचा जनाधार वाढणे अशक्य : जाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:28 IST

कॉँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्यामुळे भाजपाला फरक पडणार नाही. केवळ गांधी परिवारात आणखी एक सदस्य राजकारणात सक्रिय झाला, या पलीकडे त्याला महत्त्व नसल्याचे सांगत भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कॉँग्रेसवर टीका केली. सध्या भाजपा-सेनेत युतीच्या चर्चा झडत असल्याने या विषयावर त्यांनी न बोलणेच पसंत केले.

नाशिक : कॉँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्यामुळे भाजपाला फरक पडणार नाही. केवळ गांधी परिवारात आणखी एक सदस्य राजकारणात सक्रिय झाला, या पलीकडे त्याला महत्त्व नसल्याचे सांगत भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कॉँग्रेसवर टीका केली. सध्या भाजपा-सेनेत युतीच्या चर्चा झडत असल्याने या विषयावर त्यांनी न बोलणेच पसंत केले.भाजपाच्या वतीने मन की बात, मोदी के साथ या जाहीरनाम्यात लोकांच्या सूचना समावेश करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याची माहिती देण्यासाठी सोमवारी (दि. ११) वसंतस्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असून, पंतप्रधान ठरविण्याची क्षमता असलेले राज्य आहे. परंतु कॉँग्रेसची सत्ता येथून केव्हाच गेली आहे. त्यामुळे आता प्रियांका गांधी कॉँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या तरी त्यांच्या पक्षाला जनाधार मिळणार नाही, असेही ते म्हणाले. विरोधकांच्या महाआघाडीविषयी बोलताना ज्यांचा नेता एक नाही, सूत्र एक नाही किंवा अजेंडाही एक नाही, असे सर्व एकत्र आले आहेत. सत्तेसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. तेथे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हे एकत्र आले असून, नागरिकांना हे सर्व माहिती असल्याने त्याचा परिणाम होणार नसल्याचेही जाजू म्हणाले.राज्यात युतीची चर्चा होत आहे. १९८४ पासूनची भाजपा-शिवसेनेची मैत्री आहे. मात्र त्याबाबत पक्षाची संसदीय समिती निर्णय घेईल, असे सांगतानाच उत्तर महाराष्टÑातील काही जागांवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीबाबतदेखील समितीच निर्णय घेईल, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, माजी शहराध्यक्ष विजय साने, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा