शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

प्रियांका गांधीमुळे कॉँग्रेसचा जनाधार वाढणे अशक्य : जाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:28 IST

कॉँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्यामुळे भाजपाला फरक पडणार नाही. केवळ गांधी परिवारात आणखी एक सदस्य राजकारणात सक्रिय झाला, या पलीकडे त्याला महत्त्व नसल्याचे सांगत भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कॉँग्रेसवर टीका केली. सध्या भाजपा-सेनेत युतीच्या चर्चा झडत असल्याने या विषयावर त्यांनी न बोलणेच पसंत केले.

नाशिक : कॉँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्यामुळे भाजपाला फरक पडणार नाही. केवळ गांधी परिवारात आणखी एक सदस्य राजकारणात सक्रिय झाला, या पलीकडे त्याला महत्त्व नसल्याचे सांगत भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कॉँग्रेसवर टीका केली. सध्या भाजपा-सेनेत युतीच्या चर्चा झडत असल्याने या विषयावर त्यांनी न बोलणेच पसंत केले.भाजपाच्या वतीने मन की बात, मोदी के साथ या जाहीरनाम्यात लोकांच्या सूचना समावेश करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याची माहिती देण्यासाठी सोमवारी (दि. ११) वसंतस्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असून, पंतप्रधान ठरविण्याची क्षमता असलेले राज्य आहे. परंतु कॉँग्रेसची सत्ता येथून केव्हाच गेली आहे. त्यामुळे आता प्रियांका गांधी कॉँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या तरी त्यांच्या पक्षाला जनाधार मिळणार नाही, असेही ते म्हणाले. विरोधकांच्या महाआघाडीविषयी बोलताना ज्यांचा नेता एक नाही, सूत्र एक नाही किंवा अजेंडाही एक नाही, असे सर्व एकत्र आले आहेत. सत्तेसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. तेथे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हे एकत्र आले असून, नागरिकांना हे सर्व माहिती असल्याने त्याचा परिणाम होणार नसल्याचेही जाजू म्हणाले.राज्यात युतीची चर्चा होत आहे. १९८४ पासूनची भाजपा-शिवसेनेची मैत्री आहे. मात्र त्याबाबत पक्षाची संसदीय समिती निर्णय घेईल, असे सांगतानाच उत्तर महाराष्टÑातील काही जागांवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीबाबतदेखील समितीच निर्णय घेईल, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, माजी शहराध्यक्ष विजय साने, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा