शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

प्रियांका गांधीमुळे कॉँग्रेसचा जनाधार वाढणे अशक्य : जाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:28 IST

कॉँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्यामुळे भाजपाला फरक पडणार नाही. केवळ गांधी परिवारात आणखी एक सदस्य राजकारणात सक्रिय झाला, या पलीकडे त्याला महत्त्व नसल्याचे सांगत भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कॉँग्रेसवर टीका केली. सध्या भाजपा-सेनेत युतीच्या चर्चा झडत असल्याने या विषयावर त्यांनी न बोलणेच पसंत केले.

नाशिक : कॉँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्यामुळे भाजपाला फरक पडणार नाही. केवळ गांधी परिवारात आणखी एक सदस्य राजकारणात सक्रिय झाला, या पलीकडे त्याला महत्त्व नसल्याचे सांगत भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कॉँग्रेसवर टीका केली. सध्या भाजपा-सेनेत युतीच्या चर्चा झडत असल्याने या विषयावर त्यांनी न बोलणेच पसंत केले.भाजपाच्या वतीने मन की बात, मोदी के साथ या जाहीरनाम्यात लोकांच्या सूचना समावेश करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याची माहिती देण्यासाठी सोमवारी (दि. ११) वसंतस्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असून, पंतप्रधान ठरविण्याची क्षमता असलेले राज्य आहे. परंतु कॉँग्रेसची सत्ता येथून केव्हाच गेली आहे. त्यामुळे आता प्रियांका गांधी कॉँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या तरी त्यांच्या पक्षाला जनाधार मिळणार नाही, असेही ते म्हणाले. विरोधकांच्या महाआघाडीविषयी बोलताना ज्यांचा नेता एक नाही, सूत्र एक नाही किंवा अजेंडाही एक नाही, असे सर्व एकत्र आले आहेत. सत्तेसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. तेथे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हे एकत्र आले असून, नागरिकांना हे सर्व माहिती असल्याने त्याचा परिणाम होणार नसल्याचेही जाजू म्हणाले.राज्यात युतीची चर्चा होत आहे. १९८४ पासूनची भाजपा-शिवसेनेची मैत्री आहे. मात्र त्याबाबत पक्षाची संसदीय समिती निर्णय घेईल, असे सांगतानाच उत्तर महाराष्टÑातील काही जागांवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीबाबतदेखील समितीच निर्णय घेईल, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, माजी शहराध्यक्ष विजय साने, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा