शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मनपाला उत्पन्नवाढीसाठी खासगीकरणाचा आधार

By admin | Updated: April 21, 2017 01:43 IST

नाशिक : महापालिकेची उत्पन्नवाढीसाठी खासगीकरणाच्या माध्यमातून प्रकल्प राबविण्याची घोषणा स्थायी समितीचे सभापती गांगुर्डे यांनी केली.

 नाशिक : महापालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता उत्पन्नवाढीसाठी खासगीकरणाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविण्याची घोषणा स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी केली. प्रामुख्याने, मनपाच्या जागांवर पालिका बाजारांची निर्मिती, आडगाव ट्रक टर्मिनस याठिकाणी टेक्स्टाइल्स मार्केट, महापालिकेच्या मालकीच्या जाहिरात फलकांची संख्या वाढविणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय सभापतींनी जाहीर केले.महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर स्थायी समितीची विशेष अंदाजपत्रकीय सभा गुरुवारी (दि. २०) झाली. यावेळी सदस्यांनी उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना सुचवतानाच महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावरही ताशेरे ओढले. चर्चेनंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सांगितले, महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षण मंडळाच्या काही इमारतींमध्ये काही कार्यालये आहेत. त्यांना रेडीरेकनरप्रमाणे भाडेवाढ करण्यात येईल. महापालिकेच्या मालकीचे शहरात केवळ ४० जाहिरात फलक आहेत. त्यांची संख्या १५० पर्यंत तर खासगी फलकांची संख्या ७३२ वरुन १५०० पर्यंत करण्यात येऊन त्याद्वारे उत्पन्नात वाढ करण्यात येईल. सदर जाहिरात फलकांचा नव्याने सर्वे करण्याचे आदेशही सभापतींनी दिले. ज्याठिकाणी पालिका बाजार चालत नाही, जेथे व्यावसायिक भाडे भरत नाहीत तेथील इमारती पाडून वाहनतळांसाठी व्यवस्था करण्यात यावी. रविवार कारंजावरील यशवंत मंडईच्या जागेत बहुउद्देशीय वाहनतळ साकारण्यात येईल. काही ठिकाणी जुने झालेले पालिका बाजार पाडून तेथे नव्याने बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे संबंधित पालिका बाजारातील थकबाकीदार गाळेधारकांकडून तातडीने वसुली करावी व नोटिसा देऊन गाळे रिकामे करून घ्यावेत, असे आदेश सभापतींनी दिले. सदर पालिका बाजारांचा पुनर्विकास हा बीओटी तत्त्वावर करण्यात येणार आहे. तिबेटियन मार्केट याठिकाणी व्यापारी झोन तयार करून त्याठिकाणी असलेले जुने गाळे पाडून मॉल विकसित करण्याचे नियोजन आहे. आडगाव येथील ट्रक टर्मिनसच्या जागेत ओझरच्या धर्तीवर टेक्स्टाइल मार्केटची उभारणी होईल. द्वारका येथेही बीओटी तत्त्वावर मार्केट विकसित करण्यात येणार आहे. महापालिकेचे तरणतलाव हे खासगीकरणातून चालविण्यासाठी प्रयत्न केले जातील. फाळके स्मारक व बौद्ध स्मारक याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. मोबाइल टॉवरसाठी असलेल्या भाडेदरात सुधारणा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या उद्यानांच्या जागेत जाहिरात फलकांना परवानगी देऊन त्या माध्यमातूनही उत्पन्न वाढविता येईल. ‘कपाट’चा प्रश्न मार्गी लागल्यानंतर त्यातूनही महापालिकेला सुमारे ५० ते ६० कोटी रुपये प्राप्त होण्याची अपेक्षा सभापतींनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)