शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

पुणे-मुंबईचा खासगी प्रवास महागला

By admin | Updated: November 7, 2015 23:39 IST

अवाचे सवा दर : दिवाळी हंगामामुळे ट्रॅव्हल्सला ‘भाव’

नाशिक : दिवाळीचा हंगाम सुरू होताच शहरातील सर्वच खासगी वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना ‘भाव’ आला आहे. शहरातून पुणे, मुंबई या मोठ्या शहरांमध्ये जाणारे नागरिक अधिक असल्याने या दोन्ही ठिकाणच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. महामंडळाच्या तुलनेत दर अधिक असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.दोन दिवसांपूर्वीच राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी हंगामाची भाडेवाढ जाहीर केली. सदर भाडेवाढ जाहीर होताच महामंडळावर चौफेर टीका होऊ लागली, तसेच प्रवाशांमध्येही नाराजीचा सूर उमटला. जुन्या दराच्या तुलनेत महामंडळाने सर्वसाधारण जलदच्या दरामध्ये वीस रुपये, तर निमआरामच्या दरात तीस रुपये आणि रातराणीच्या दरात पंचवीस रुपयांनी वाढ केली आहे. सर्वसाधारण जलदचे दर नाशिक-मुंबईचे २१५ रुपये प्रत्येकी व निमआराम गाडीचे ३०२ आणि रातराणीचे २५४ रुपये प्रत्येकी दर आहे. या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सचे दर मात्र अधिक असून, धनत्रयोदशीपासून अधिक दरवाढ होणार असल्याची शक्यता आहे. नाशिक-मुंबई खासगी प्रवास विना वातानुकूलित ३५० ते ४५० रुपये प्रत्येकी असे दर आहेत, तर वातानुकूलित गाडीचे ६५० ते ७५० रुपयांपर्यंत दर असा खासगी प्रवासाचा ‘बाजार’ शहरात तेजीत आला आहे.सद्यस्थितीत जरी सर्वसाधारण विना वातानुकूलित गाडीचे दर ३५० ते ४५० च्या मध्ये असले तरी दोन दिवसांनंतर या दरांमध्येदेखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच खासगी बसेसच्या भाडेवाढीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अवाच्या सवा दराने भाडेवाढ खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच आगाऊ तिकीट नोंदणीदेखील काही वाहतुकदारांनी थांबविली असून, ज्या दिवशी प्रवास करावयाचा आहे त्याच दिवशी एखादी वेळ निश्चित करून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच काही खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून सुरुवातीला चौकशीमध्ये विना वातानुकूलित, वातानुकूलित बसेसचे पुणे-मुंबईचे दर वाढवून सांगितले जातात. (प्रतिनिधी)