शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

पुणे-मुंबईचा खासगी प्रवास महागला

By admin | Updated: November 7, 2015 23:39 IST

अवाचे सवा दर : दिवाळी हंगामामुळे ट्रॅव्हल्सला ‘भाव’

नाशिक : दिवाळीचा हंगाम सुरू होताच शहरातील सर्वच खासगी वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना ‘भाव’ आला आहे. शहरातून पुणे, मुंबई या मोठ्या शहरांमध्ये जाणारे नागरिक अधिक असल्याने या दोन्ही ठिकाणच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. महामंडळाच्या तुलनेत दर अधिक असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.दोन दिवसांपूर्वीच राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी हंगामाची भाडेवाढ जाहीर केली. सदर भाडेवाढ जाहीर होताच महामंडळावर चौफेर टीका होऊ लागली, तसेच प्रवाशांमध्येही नाराजीचा सूर उमटला. जुन्या दराच्या तुलनेत महामंडळाने सर्वसाधारण जलदच्या दरामध्ये वीस रुपये, तर निमआरामच्या दरात तीस रुपये आणि रातराणीच्या दरात पंचवीस रुपयांनी वाढ केली आहे. सर्वसाधारण जलदचे दर नाशिक-मुंबईचे २१५ रुपये प्रत्येकी व निमआराम गाडीचे ३०२ आणि रातराणीचे २५४ रुपये प्रत्येकी दर आहे. या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सचे दर मात्र अधिक असून, धनत्रयोदशीपासून अधिक दरवाढ होणार असल्याची शक्यता आहे. नाशिक-मुंबई खासगी प्रवास विना वातानुकूलित ३५० ते ४५० रुपये प्रत्येकी असे दर आहेत, तर वातानुकूलित गाडीचे ६५० ते ७५० रुपयांपर्यंत दर असा खासगी प्रवासाचा ‘बाजार’ शहरात तेजीत आला आहे.सद्यस्थितीत जरी सर्वसाधारण विना वातानुकूलित गाडीचे दर ३५० ते ४५० च्या मध्ये असले तरी दोन दिवसांनंतर या दरांमध्येदेखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच खासगी बसेसच्या भाडेवाढीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अवाच्या सवा दराने भाडेवाढ खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच आगाऊ तिकीट नोंदणीदेखील काही वाहतुकदारांनी थांबविली असून, ज्या दिवशी प्रवास करावयाचा आहे त्याच दिवशी एखादी वेळ निश्चित करून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच काही खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून सुरुवातीला चौकशीमध्ये विना वातानुकूलित, वातानुकूलित बसेसचे पुणे-मुंबईचे दर वाढवून सांगितले जातात. (प्रतिनिधी)