शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ‘कुरिअर्स’चा पोस्टाला ताप

By admin | Updated: January 31, 2016 22:00 IST

खासगी ‘कुरिअर्स’चा पोस्टाला ताप

किशोर इंदोरकर मालेगाव कॅम्पसध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरू असून, टपाल खात्यातील सेवेला खासगी कुरिअर्स सेवाचा फटका बसत आहे. कुरिअर्स सेवेला सामोरे जाऊन टपाल खात्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. दररोज सरासरी पाच हजारांहून अधिक पत्रांचे वाटप टपाल खात्यातून होत असल्याने खासगी सेवेचे आव्हान पोस्टासमोर आहे.शहर परिसराचा व्याप मोठा आहे. मालेगावची लोकसंख्या दहा लाखांवर पोहचली आहे. वाढलेला परिसर, वस्त्यांचे जाळे यामुळे टपाल खात्यास प्रत्येकाचे पत्र संबंधितांपर्यंत पोहचवणे आव्हान आहे. खासगी कुरिअर्स सेवेला नागरिकांनी पसंती दिली आहे. शहरात टपाल खात्याच्या मुख्य कार्यालयासह नवापूर वॉर्ड, शहर टपाल खाते (रॉयल गल्लीमधील) संगमेश्वर, मार्केट यार्ड कार्यालयातील पोस्टमास्तर यांच्यासह कॅम्प टपाल कार्यालयातील सहा कर्मचारी असे एकूण २७ पोस्टमास्तर टपाल पत्रे वितरण करण्याची कामे करीत आहेत.विविध राज्ये, जिल्हे व गावांतून दररोज साडेपाच ते सहा हजार पत्रे मालेगावी वाटपासाठी येतात. ही पत्रे कर्मचारी रोज किरकोळ अपवाद वळगता शहरातील संबंधितांच्या पत्त्यांवर वेळेत पोहचवतात. या पत्रांमध्ये टपाल खाते कार्यालय विशेषत: सरकारी पत्रे, विमा कंपनी, दूरध्वनी बिले, दैनिक, साप्ताहिके, मासिक, वृत्तपत्र, लग्नपत्रिका आदिंचा मोठ्या प्रमाणात भरणा असतो. पोस्ट कार्ड व आंतरदेशीय पत्रही किरकोळ प्रमाणात येतात. सध्या आॅनलाइन खरेदी मालाचे वितरण काही प्रमाणात पोस्ट खात्यातून होत आहे, तर टपाल कार्यालयात स्पीड पोस्ट, नोंदणी पत्रव्यवहार (रजिस्ट्रेशन), पार्सल सेवासह इतर आर्थिक गुंतवणूक सेवा सुरू असल्याने कार्यालयात गर्दी दिसून येते. या उलट शहरात खासगी टपाल सेवा देणारे कुरिअर्सची सात ते आठ केंद्र आहेत. त्यांच्यामार्फत शहरात विविध ठिकाणी ८०० ते ९०० पत्रे, टपालांचे वितरण होते. त्यामुळे टपाल खात्यावर नागरिकांची विश्वासार्हता टिकून असल्याचे दिसते. परंतु टपाल खात्यापेक्षा जादा जलद सेवा देत असल्याचा दावा कुरिअरवाले करतात. देशभरातील महत्त्वाच्या व मोठ्या शहरात ४८ ते ७२ तासात टपाल व इतर पार्सल पोहचवण्याचे काम कुरिअर्सवाले करतात. त्यामुळे काही प्रमाणात नागरिक या सेवेकडे आकर्षित झाले आहेत. टपाल खात्यापेक्षा कुरिअर सेवा महागडी आहे. येथील पत्र, टपाल पोहच करण्यासाठी अगदी २० रुपयांपासून पुढे टपालनुसार पैसे मोजावे लागतात, तर टपाल कार्यालयात अगदी पाच रुपयांच्या तिकिटांवर पत्र देशभरात कुठेही पोहचू शकते; कुरिअर केंद्रात पोस्ट खात्याप्रमाणे इतर व्यवहारांच्या सुविधा नाही. त्यामुळे टपाल खात्याचे महत्त्व आजही टिकून असल्याचे येथील कर्मचारी सांगतात.