शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

आधी सर्वेक्षण, मग लाभाची चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:22 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली. शेतकºयांना पूर्वकल्पना न देता महासभेत हा विषय मांडलाच कसा, असा प्रश्न करीत विविध मागण्यांची सरबत्ती केली. विशेषत: अधिक लाभ का देत नाही तसेच वाढीव चटई क्षेत्र किती देणार, असा प्रश्न केल्यानंतर प्रशासनाने प्रस्तावित योजनेसाठी आधी सर्वेक्षण करू द्या मग लाभ किती मिळू शकतो याची पडताळणी करून लाभ किती मिळू शकतो हे सांगता येईल, असेच उत्तर शेतकºयांना देण्यात आले. अखेरीस शेतकºयांना सर्वेक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक बोलावू असे सांगण्यात आले तर कंपनीने सर्वेक्षण केल्यानंतर तीन महिन्यांत सर्व पडताळणी करून शेतकºयांना किती जमीन मिळेल किंवा वाढीव फायदे मिळतील याबाबत माहिती देऊ शकू, असे सांगण्यात आले.मौजे नाशिक आणि मौजे मखमलाबाद शिवारात सुमारे सव्वासातशे एकर क्षेत्रात नगर रचना योजना आणि नंतर खास नियोजनबद्ध नगरी वसविण्याची स्मार्ट सिटी अंतर्गत योजना असून, त्यासंदर्भात बुधवारी (दि. १२) स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल तसेच नगररचनाकार कांचन बोधले यांनी महाकवी कालिदास कला मंदिरात सादरीकरण केले. यावेळी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडकेदेखील उपस्थित होत्या.मौजे नाशिक शिवारातील ५४ तर मखमलाबाद येथील वीस अशा ७४ सर्व्हे क्रमांकावर एकूण ७५४ एकर क्षेत्रात महापालिका खास नियोजनबद्ध शहर वसविणार आहे. त्यासाठी आधी नगररचना योजना राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शेतकºयांकडून जमिनी घेऊन त्या एकत्रित करून एकच सर्व्हे नंबरप्रमाणे गृहीत धरून लॅण्ड पुलिंग करण्यात येईल आणि त्यानंतर पन्नास टक्के जागा शेतकºयांना परत देण्यात येतील. यात भूसंपादनाचा प्रकार नसून बाधित शेतकरीच भागीदार असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना लाभ मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली तसेच कांचन बोधले यांनी महापालिकेने एकदा इरादा जाहीर केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्याला राजपत्रात प्रसिद्धी मिळेल आणि त्यानंतर हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही होऊन अंतिमत: नऊ महिन्यांत योजना अंतिम होईल तसेच तीन वर्षांत योजना पूर्ण होईल असे सांगितले.मग, प्रस्तावाची घाई कशासाठी ?महापालिकेच्या वतीने शेतकºयांना नगररचना योजना प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले, तसेच तत्पूर्वी शेतकºयांना अहमदाबाद दौरा घडविण्यात आला. त्याआधी महासभेवरच मखमलाबाद येथे नगररचना परियोजना राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला; मात्र हा सर्व उलटा क्रम ही योजना राबविण्याचा प्रस्ताव महासभेत कसा काय पाठविला गेला, असा प्रश्न शरद कोशिरे यांच्यासह अन्य शेतकºयांनी केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी