शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आधी सर्वेक्षण, मग लाभाची चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:22 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली. शेतकºयांना पूर्वकल्पना न देता महासभेत हा विषय मांडलाच कसा, असा प्रश्न करीत विविध मागण्यांची सरबत्ती केली. विशेषत: अधिक लाभ का देत नाही तसेच वाढीव चटई क्षेत्र किती देणार, असा प्रश्न केल्यानंतर प्रशासनाने प्रस्तावित योजनेसाठी आधी सर्वेक्षण करू द्या मग लाभ किती मिळू शकतो याची पडताळणी करून लाभ किती मिळू शकतो हे सांगता येईल, असेच उत्तर शेतकºयांना देण्यात आले. अखेरीस शेतकºयांना सर्वेक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक बोलावू असे सांगण्यात आले तर कंपनीने सर्वेक्षण केल्यानंतर तीन महिन्यांत सर्व पडताळणी करून शेतकºयांना किती जमीन मिळेल किंवा वाढीव फायदे मिळतील याबाबत माहिती देऊ शकू, असे सांगण्यात आले.मौजे नाशिक आणि मौजे मखमलाबाद शिवारात सुमारे सव्वासातशे एकर क्षेत्रात नगर रचना योजना आणि नंतर खास नियोजनबद्ध नगरी वसविण्याची स्मार्ट सिटी अंतर्गत योजना असून, त्यासंदर्भात बुधवारी (दि. १२) स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल तसेच नगररचनाकार कांचन बोधले यांनी महाकवी कालिदास कला मंदिरात सादरीकरण केले. यावेळी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडकेदेखील उपस्थित होत्या.मौजे नाशिक शिवारातील ५४ तर मखमलाबाद येथील वीस अशा ७४ सर्व्हे क्रमांकावर एकूण ७५४ एकर क्षेत्रात महापालिका खास नियोजनबद्ध शहर वसविणार आहे. त्यासाठी आधी नगररचना योजना राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शेतकºयांकडून जमिनी घेऊन त्या एकत्रित करून एकच सर्व्हे नंबरप्रमाणे गृहीत धरून लॅण्ड पुलिंग करण्यात येईल आणि त्यानंतर पन्नास टक्के जागा शेतकºयांना परत देण्यात येतील. यात भूसंपादनाचा प्रकार नसून बाधित शेतकरीच भागीदार असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना लाभ मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली तसेच कांचन बोधले यांनी महापालिकेने एकदा इरादा जाहीर केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्याला राजपत्रात प्रसिद्धी मिळेल आणि त्यानंतर हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही होऊन अंतिमत: नऊ महिन्यांत योजना अंतिम होईल तसेच तीन वर्षांत योजना पूर्ण होईल असे सांगितले.मग, प्रस्तावाची घाई कशासाठी ?महापालिकेच्या वतीने शेतकºयांना नगररचना योजना प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले, तसेच तत्पूर्वी शेतकºयांना अहमदाबाद दौरा घडविण्यात आला. त्याआधी महासभेवरच मखमलाबाद येथे नगररचना परियोजना राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला; मात्र हा सर्व उलटा क्रम ही योजना राबविण्याचा प्रस्ताव महासभेत कसा काय पाठविला गेला, असा प्रश्न शरद कोशिरे यांच्यासह अन्य शेतकºयांनी केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी