शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

जिल्हा विकास निधी अखर्चित राहण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 18:55 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नावीन्यपूर्ण योजना राबवून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी शासनाकडून दरवर्षी जिल्हा विकास निधी उपलब्ध करून दिला जात असून, सन २०१८-१९ या वर्षासाठी सर्वसाधारण योजनांसाठी

ठळक मुद्देआचारसंहितेचे सावट : ७० टक्के निधी डिसेंबरअखेर प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेला जिल्हा विकास निधी मुदतीत खर्च करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले असून, डिसेंबरअखेर सर्वसाधारण व आदिवासी विकास विभागाच्या जेमतेत ६५ ते ७० टक्के निधी खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सन २०१९-२० या वर्षाच्या अंदाजीय विकासनिधीत मात्र आदिवासी विकास विभागाच्या सुमारे १४० कोटींच्या निधीत कपात करण्यात आली आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नावीन्यपूर्ण योजना राबवून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी शासनाकडून दरवर्षी जिल्हा विकास निधी उपलब्ध करून दिला जात असून, सन २०१८-१९ या वर्षासाठी सर्वसाधारण योजनांसाठी शासनाने ३२९ कोटी, तर आदिवासी विकास विभागासाठी ३३८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीतून विविध योजना तसेच विकासकामांचे प्रस्ताव त्या त्या खात्यांकडून सादर केल्यानंतर त्याला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची तरतूद आहे. यंदा विविध खात्यांनी साधारणत: जून, जुलैनंतरच प्रस्ताव सादर केल्याने त्या कामांची व्यवहार्यता व गरज लक्षात घेऊन मान्यता देण्यात आली असली तरी, डिसेेंबरअखेरपर्यंत शासनाने एकूण तरतुदीच्या ७० टक्के निधी उपलब्ध करून दिला. मात्र निधीच्या मानाने कामांवर होणारा खर्च तसेच प्रशासकीय मान्यता देण्याचे प्रमाण अगदीच अल्प आहे. परिणामी येत्या दोन महिन्यांत निधी खर्च पाडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागल्यास नवीन कामांना मंजुरी वा त्यासाठी निधीची तरतूद करणे अशक्य होणार आहे. अशा परिस्थितीत चालू वर्षासाठी तरतूद केलेला निधी कसा खर्च करणार? असा प्रश्न पडला आहे. तथापि, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी मात्र निधी मुदतीत खर्च होईल? असा दावा केला असून, ज्या प्रमाणात कामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी येतील त्यांना तत्काळ मान्यता देण्याची तजवीज ठेवल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र योजना व त्याची अंमलबजावणीचा विचार केला असता, ६५ ते ७० टक्केच निधी आजवर खर्ची पडला असून, अजूनही काही खात्यांनी आपले प्रस्ताव पाठविलेले नाहीत, तर ज्यांनी पाठविले ते जिल्हा नियोजन कार्यालयात पडून आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक