शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

जिल्हा विकास निधी अखर्चित राहण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 18:55 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नावीन्यपूर्ण योजना राबवून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी शासनाकडून दरवर्षी जिल्हा विकास निधी उपलब्ध करून दिला जात असून, सन २०१८-१९ या वर्षासाठी सर्वसाधारण योजनांसाठी

ठळक मुद्देआचारसंहितेचे सावट : ७० टक्के निधी डिसेंबरअखेर प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेला जिल्हा विकास निधी मुदतीत खर्च करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले असून, डिसेंबरअखेर सर्वसाधारण व आदिवासी विकास विभागाच्या जेमतेत ६५ ते ७० टक्के निधी खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सन २०१९-२० या वर्षाच्या अंदाजीय विकासनिधीत मात्र आदिवासी विकास विभागाच्या सुमारे १४० कोटींच्या निधीत कपात करण्यात आली आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नावीन्यपूर्ण योजना राबवून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी शासनाकडून दरवर्षी जिल्हा विकास निधी उपलब्ध करून दिला जात असून, सन २०१८-१९ या वर्षासाठी सर्वसाधारण योजनांसाठी शासनाने ३२९ कोटी, तर आदिवासी विकास विभागासाठी ३३८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीतून विविध योजना तसेच विकासकामांचे प्रस्ताव त्या त्या खात्यांकडून सादर केल्यानंतर त्याला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची तरतूद आहे. यंदा विविध खात्यांनी साधारणत: जून, जुलैनंतरच प्रस्ताव सादर केल्याने त्या कामांची व्यवहार्यता व गरज लक्षात घेऊन मान्यता देण्यात आली असली तरी, डिसेेंबरअखेरपर्यंत शासनाने एकूण तरतुदीच्या ७० टक्के निधी उपलब्ध करून दिला. मात्र निधीच्या मानाने कामांवर होणारा खर्च तसेच प्रशासकीय मान्यता देण्याचे प्रमाण अगदीच अल्प आहे. परिणामी येत्या दोन महिन्यांत निधी खर्च पाडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागल्यास नवीन कामांना मंजुरी वा त्यासाठी निधीची तरतूद करणे अशक्य होणार आहे. अशा परिस्थितीत चालू वर्षासाठी तरतूद केलेला निधी कसा खर्च करणार? असा प्रश्न पडला आहे. तथापि, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी मात्र निधी मुदतीत खर्च होईल? असा दावा केला असून, ज्या प्रमाणात कामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी येतील त्यांना तत्काळ मान्यता देण्याची तजवीज ठेवल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र योजना व त्याची अंमलबजावणीचा विचार केला असता, ६५ ते ७० टक्केच निधी आजवर खर्ची पडला असून, अजूनही काही खात्यांनी आपले प्रस्ताव पाठविलेले नाहीत, तर ज्यांनी पाठविले ते जिल्हा नियोजन कार्यालयात पडून आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक