शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

प्राथमिक शाळांमध्ये होणार ‘स्वच्छ शाळा’ स्पर्धा

By admin | Updated: November 12, 2014 23:53 IST

सीईओ सुखदेव बनकरांची माहिती : तालुका व जिल्हास्तरावरून बक्षिसे

 नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता पुढील टप्पा म्हणून जिल्ह्णातील सर्व ३३६६ प्राथमिक शाळांमध्ये व खासगी शाळांमध्येही ‘स्वच्छ शाळा व स्वच्छ विद्यार्थी’ स्पर्धा घेण्यात येणार असून, प्रत्येक विद्यार्थी व प्रत्येक शाळेला या स्वच्छ शाळा अभियानात सहभागी व्हावे लागणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली.जिल्ह्णात या स्वच्छ शाळा अभियानाचा शुभारंभ बुधवारी (दि.१२) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.या अभियानासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांना जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बोलविण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून देशभरात स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ झाला असून, त्यानुसारच स्वच्छ शाळा व स्वच्छ विद्यालय या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. १४ ते १९ नोेव्हेंबर दरम्यान प्रत्येक अंगणवाडी व शाळांमध्ये ‘बाल स्वच्छ मोहीम’ राबविण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद स्तरावर प्रत्येक शाळेची तपासणी करण्यात येणार असून, ज्या शाळेला सर्वाधिक गुण मिळतील अशा तालुका स्तरावरील व जिल्हास्तरावरील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रत्येकी तीन शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्वच शाळांना सहभाग घ्यावा लागणार असून ५० गुणांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या शाळांना या स्वच्छ शाळा स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे सुखदेव बनकर यांनी सांगितले. या स्पर्धेत शाळेची व विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता तपासण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)