शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

प्राथमिक शाळांमध्ये होणार ‘स्वच्छ शाळा’ स्पर्धा

By admin | Updated: November 12, 2014 23:53 IST

सीईओ सुखदेव बनकरांची माहिती : तालुका व जिल्हास्तरावरून बक्षिसे

 नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता पुढील टप्पा म्हणून जिल्ह्णातील सर्व ३३६६ प्राथमिक शाळांमध्ये व खासगी शाळांमध्येही ‘स्वच्छ शाळा व स्वच्छ विद्यार्थी’ स्पर्धा घेण्यात येणार असून, प्रत्येक विद्यार्थी व प्रत्येक शाळेला या स्वच्छ शाळा अभियानात सहभागी व्हावे लागणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली.जिल्ह्णात या स्वच्छ शाळा अभियानाचा शुभारंभ बुधवारी (दि.१२) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.या अभियानासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांना जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बोलविण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून देशभरात स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ झाला असून, त्यानुसारच स्वच्छ शाळा व स्वच्छ विद्यालय या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. १४ ते १९ नोेव्हेंबर दरम्यान प्रत्येक अंगणवाडी व शाळांमध्ये ‘बाल स्वच्छ मोहीम’ राबविण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद स्तरावर प्रत्येक शाळेची तपासणी करण्यात येणार असून, ज्या शाळेला सर्वाधिक गुण मिळतील अशा तालुका स्तरावरील व जिल्हास्तरावरील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रत्येकी तीन शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्वच शाळांना सहभाग घ्यावा लागणार असून ५० गुणांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या शाळांना या स्वच्छ शाळा स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे सुखदेव बनकर यांनी सांगितले. या स्पर्धेत शाळेची व विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता तपासण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)