शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

फळभाज्यांचे भाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:20 IST

वाढत्या थंडीचा परिणाम सर्वच प्र्रकारच्या फळभाज्यांवर होत असून, त्यामुळे फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक बाजार समितीत फळभाज्यांची जवळपास २५ टक्क्यांपर्यंत आवक घटल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे

ठळक मुद्देआवक घटली : थंडीचा परिणाम

पंचवटी : वाढत्या थंडीचा परिणाम सर्वच प्र्रकारच्या फळभाज्यांवर होत असून, त्यामुळे फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक बाजार समितीत फळभाज्यांची जवळपास २५ टक्क्यांपर्यंत आवक घटल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. पंधरवड्यापूर्वी दिवाळीचा सण असल्याने बाजार समितीत व्यापारी शेतमाल खरेदीसाठी नसल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवला होता. सणासुदीचे दिवस असल्याने शेतमालाची मागणी मोठ्या प्रमाणात घटलेली होती.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आवक कमी झाली असली तरी मागणी टिकून असल्याने व त्यातच सध्या थंडीची चाहूल लागल्याने अनेक ठिकाणी थंडीमुळे शेतातील उभ्या पिकांचा फुलोरा सुकून जात असल्यामुळे आवक घटलीआहे.आवक घटल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवत असून, आगामी कालावधीत आवक आणखी घटली तर बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले आहे. पंधरवाड्यापूर्वी ३० रुपये प्रति जाळी दराने विक्री झालेल्या कारली जाळीला शुक्रवारी (दि.१६) बाजार समितीत २०० रुपये असा बाजारभाव मिळाला तर २० रुपये १८ नग दराने विक्री झालेल्या भोपळा मालाला १४० रुपये दर मिळाला. वांगे ५०० रुपये जाळी तर काकडी ६५० रुपये प्रति जाळी दराने विक्री होत आहे.हिवाळा सुरू झाल्याने थंडीचा परिणाम पिकांवर जाणवत आहे. थंडीमुळे कारले, भोपळा व अन्य शेतमालाचा फुलोरा सुकून जात आहे त्यामुळे फुलोरा वाढत नाही परिणामी आवक घटली आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी