शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रस्त्यांच्या खडीकरणाला प्राधान्य

By admin | Updated: January 24, 2016 22:48 IST

महानगरपालिका : सुमारे ४० कोटींची कामे; नवीन कॉलनीत सुधारणा

नाशिक : महापालिका महासभेने १९३ कोटी रुपयांच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर बांधकाम विभागाकडून पहिल्या टप्प्यात सुमारे ४० कोटी रुपयांची कामे केली जाणार असून, नव्याने विकसित झालेल्या बाह्य भागातील कॉलनी परिसरातील रस्त्यांच्या खडीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. सदर कामांची निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली. दि. ७ डिसेंबर रोजी झालेल्या महासभेत सदस्यांना प्रभागातील रस्ते विकासाचे गाजर दाखवितानाच केंद्र सरकारचे अमृत व स्मार्ट सिटी अभियान आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत सुमारे २०३१ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता मिळविण्याचा महापालिका प्रशासनाचा ‘डबलगेम’ महासभेत सदस्यांनी एकमताने उधळून लावला होता. त्यावेळी केवळ १९१.४३ कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्ती व विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचे कारण दाखवत प्रशासनाकडून रस्ते विकासाच्या कामाबाबत विलंब लावला जात होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या प्रकरणात लक्ष घालत महापौरांना रस्त्यांच्या कामांना गती देण्याची सूचना केली होती. त्यानुसार, प्रशासनाने आता पहिल्या टप्प्यात सुमारे ४० कोटी रुपयांची कामे काढली असून, पहिल्या टप्प्यात ज्या कॉलनी परिसरात रस्त्यांच्या खडीकरणाची नितांत आवश्यकता आहे, तेथील कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. शहर परिसरातील पंचवटी, सिडको, सातपूर, इंदिरानगर, पाथर्डी आदि भागांतही रस्त्यांची कामे तातडीने व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)