शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

प्रेस अधिकारी, कामगार देणार केरळला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:18 IST

केरळ राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून भारत प्रतिभूती, चलार्थपत्र मुद्रणालय व महामंडळाच्या एकूण ९ युनिटमधील अधिकारी व कामगारांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकरोड : केरळ राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून भारत प्रतिभूती, चलार्थपत्र मुद्रणालय व महामंडळाच्या एकूण ९ युनिटमधील अधिकारी व कामगारांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  केरळ राज्यात गेल्या पंधरवड्यात अतिवृष्टी व पुराने थैमान घातले असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. पुरामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टी व पुरामुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून अजूनही काही भागातील पाणी हळूहळू ओसरत आहे. पाऊस व पुरामुळे सर्वस्व वाहून गेल्याने मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  केरळच्या पूरग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयासह महामंडळाच्या नऊ युनिटमधील अधिकारी, कामगारांच्या एक दिवसाचे वेतन केरळ मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुद्रणालय महामंडळाचे अपर महाप्रबंधक बी. जे. गुप्ता यांनी दोन दिवसांपूर्वीच नऊ युनिट प्रबंधकांना याबाबत पत्र पाठविले आहे. भारत प्रतिभूती मुद्रणालयात २१२६, चलार्थपत्र मुद्रणालयात १९४५ व नऊ युनिट मिळून एकूण ६ हजार ५०० अधिकारी, कामगार आहेत.  देशामध्ये नैसर्गिक आपत्ती, संकट आल्यावर मुद्रणालयातील कामगार नेहमी सर्व प्रकारच्या मदतीसाठी एकजुटीने आघाडीवर राहिले आहेत. प्रत्येकवेळी प्रेस कामगारांकडून मोठी मदत दिली जाते.

टॅग्स :floodपूरKerala Floodsकेरळ पूर