शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

नाशिक महापालिकेत सहाव्यांदा बससेवेचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:35 IST

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे.

ठळक मुद्देबुधवारी फैसला : मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे शहर वाहतूक

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे.महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यानंतर शहर बससेवा चालविण्यास देण्याचे प्रस्ताव पाचवेळा मांडण्यात आले होते; मात्र ते फेटाळण्यात आले. आजवरचे प्रस्ताव हे राजकीय पक्षांच्या पुढाकाराने येत होते. मात्र यंदा प्रथमच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेऊन प्रस्ताव मांडला आहे. त्यामागेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असून, गेल्या वर्षी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शहर बस वाहतूक ही महापालिकेने चालवण्यासाठी मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महापालिका अधिनियमात बंधनात्मक नसलेली म्हणजे ऐच्छिक कर्तव्यात दिलेली ही सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येत्या महासभेवर प्रस्ताव सादर केला असून, चारशे बस खासगीकरणातून चालविण्यात येणार आहेत. नवी मुंबईच्या धर्तीवर ठेकेदाराला प्रति किलोमीटर खर्च देऊन ही सेवा चालू करण्याचा प्रस्ताव असून, त्यात परिवहन समितीची कोणीतीही तरतूद नाही. विशेष म्हणजे बहुतांशी राजकीय पक्षांचा या सेवेला विरोध आहे. असे असतानाही सेवा महापालिकेनेच सुरू करावी असा सरकारचा अट्टाहास आहे.१९९५ मध्ये महापौर प्रकाश मते यांच्या कारकिर्दीत ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर झाला होता. परंतु विषय फेटाळला गेला. त्यानंतर डॉ. शोभा बच्छाव महापौर असताना महामंडळाने प्रस्ताव दिला तेव्हा ही सेवा नाकारण्यात आली. परंतु त्याचबरोबर विनायक पांडे, बाळासाहेब सानप आणि अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या महापौरपदाच्या कालावधीतही प्रस्ताव होते. परंतु ही तोट्यातील सेवा असल्याने नकार देण्यात आला होता. बाळासाहेब सानप महापौर असताना तर शंभर बस खरेदी करण्यासाठी केंद्र शासनदेखील तयार होते. परंतु परिवहन महामंडळाने या बस स्वत:च्या ताब्यात घेतल्या आणि महापालिकेने त्यांना ही सेवा चालविण्याचे स्वारस्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आत्तापर्यंतच्या फेटाळलेल्या बससेवाच्महापालिकेने स्वत: बस खरेदी करून सेवा चालविण्याचा प्रस्ताव फेटाळला. त्यावेळी याच क्रिसील कंपनीने अहवाल देताना ही सेवा तोट्यात जाईल असे स्पष्ट केले होते.च्महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी स्वारस्य घेतलेल्या बीआरटीएस सेवेचा, अहमदाबाद येथील सेवेचा अभ्यास करण्यात आला. मात्र, त्यावेळीदेखील ही सेवा पूर्णत: तोट्यात आढळली होती. शिवाय मोठ्या रस्त्यांवरच बीआरटीएस अन्य रस्त्यावर पूरक साध्या बस किंवा रिक्षांचा वापर होणार होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच हा एक हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव फेटाळला होता.च्आता पुन्हा हा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यात ठेकेदारीचा समावेश करण्यात आला आहे; परंतु महापालिकेचा ठेकेदारीविषयी अनुभवदेखील कटू असून, अनेक ठेकेदारांनी खासगीकरणाच्या तरतुदीचा आधार घेऊन लवाद नेमून स्वत:च्या सोयीचे निकाल लावले तसेच महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा घाटादेखील झाला आहे.