शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नाशिक महापालिकेत सहाव्यांदा बससेवेचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:35 IST

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे.

ठळक मुद्देबुधवारी फैसला : मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे शहर वाहतूक

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे.महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यानंतर शहर बससेवा चालविण्यास देण्याचे प्रस्ताव पाचवेळा मांडण्यात आले होते; मात्र ते फेटाळण्यात आले. आजवरचे प्रस्ताव हे राजकीय पक्षांच्या पुढाकाराने येत होते. मात्र यंदा प्रथमच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेऊन प्रस्ताव मांडला आहे. त्यामागेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असून, गेल्या वर्षी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शहर बस वाहतूक ही महापालिकेने चालवण्यासाठी मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महापालिका अधिनियमात बंधनात्मक नसलेली म्हणजे ऐच्छिक कर्तव्यात दिलेली ही सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येत्या महासभेवर प्रस्ताव सादर केला असून, चारशे बस खासगीकरणातून चालविण्यात येणार आहेत. नवी मुंबईच्या धर्तीवर ठेकेदाराला प्रति किलोमीटर खर्च देऊन ही सेवा चालू करण्याचा प्रस्ताव असून, त्यात परिवहन समितीची कोणीतीही तरतूद नाही. विशेष म्हणजे बहुतांशी राजकीय पक्षांचा या सेवेला विरोध आहे. असे असतानाही सेवा महापालिकेनेच सुरू करावी असा सरकारचा अट्टाहास आहे.१९९५ मध्ये महापौर प्रकाश मते यांच्या कारकिर्दीत ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर झाला होता. परंतु विषय फेटाळला गेला. त्यानंतर डॉ. शोभा बच्छाव महापौर असताना महामंडळाने प्रस्ताव दिला तेव्हा ही सेवा नाकारण्यात आली. परंतु त्याचबरोबर विनायक पांडे, बाळासाहेब सानप आणि अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या महापौरपदाच्या कालावधीतही प्रस्ताव होते. परंतु ही तोट्यातील सेवा असल्याने नकार देण्यात आला होता. बाळासाहेब सानप महापौर असताना तर शंभर बस खरेदी करण्यासाठी केंद्र शासनदेखील तयार होते. परंतु परिवहन महामंडळाने या बस स्वत:च्या ताब्यात घेतल्या आणि महापालिकेने त्यांना ही सेवा चालविण्याचे स्वारस्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आत्तापर्यंतच्या फेटाळलेल्या बससेवाच्महापालिकेने स्वत: बस खरेदी करून सेवा चालविण्याचा प्रस्ताव फेटाळला. त्यावेळी याच क्रिसील कंपनीने अहवाल देताना ही सेवा तोट्यात जाईल असे स्पष्ट केले होते.च्महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी स्वारस्य घेतलेल्या बीआरटीएस सेवेचा, अहमदाबाद येथील सेवेचा अभ्यास करण्यात आला. मात्र, त्यावेळीदेखील ही सेवा पूर्णत: तोट्यात आढळली होती. शिवाय मोठ्या रस्त्यांवरच बीआरटीएस अन्य रस्त्यावर पूरक साध्या बस किंवा रिक्षांचा वापर होणार होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच हा एक हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव फेटाळला होता.च्आता पुन्हा हा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यात ठेकेदारीचा समावेश करण्यात आला आहे; परंतु महापालिकेचा ठेकेदारीविषयी अनुभवदेखील कटू असून, अनेक ठेकेदारांनी खासगीकरणाच्या तरतुदीचा आधार घेऊन लवाद नेमून स्वत:च्या सोयीचे निकाल लावले तसेच महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा घाटादेखील झाला आहे.