शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नाशिक महापालिकेत सहाव्यांदा बससेवेचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:35 IST

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे.

ठळक मुद्देबुधवारी फैसला : मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे शहर वाहतूक

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे.महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यानंतर शहर बससेवा चालविण्यास देण्याचे प्रस्ताव पाचवेळा मांडण्यात आले होते; मात्र ते फेटाळण्यात आले. आजवरचे प्रस्ताव हे राजकीय पक्षांच्या पुढाकाराने येत होते. मात्र यंदा प्रथमच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेऊन प्रस्ताव मांडला आहे. त्यामागेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असून, गेल्या वर्षी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शहर बस वाहतूक ही महापालिकेने चालवण्यासाठी मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महापालिका अधिनियमात बंधनात्मक नसलेली म्हणजे ऐच्छिक कर्तव्यात दिलेली ही सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येत्या महासभेवर प्रस्ताव सादर केला असून, चारशे बस खासगीकरणातून चालविण्यात येणार आहेत. नवी मुंबईच्या धर्तीवर ठेकेदाराला प्रति किलोमीटर खर्च देऊन ही सेवा चालू करण्याचा प्रस्ताव असून, त्यात परिवहन समितीची कोणीतीही तरतूद नाही. विशेष म्हणजे बहुतांशी राजकीय पक्षांचा या सेवेला विरोध आहे. असे असतानाही सेवा महापालिकेनेच सुरू करावी असा सरकारचा अट्टाहास आहे.१९९५ मध्ये महापौर प्रकाश मते यांच्या कारकिर्दीत ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर झाला होता. परंतु विषय फेटाळला गेला. त्यानंतर डॉ. शोभा बच्छाव महापौर असताना महामंडळाने प्रस्ताव दिला तेव्हा ही सेवा नाकारण्यात आली. परंतु त्याचबरोबर विनायक पांडे, बाळासाहेब सानप आणि अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या महापौरपदाच्या कालावधीतही प्रस्ताव होते. परंतु ही तोट्यातील सेवा असल्याने नकार देण्यात आला होता. बाळासाहेब सानप महापौर असताना तर शंभर बस खरेदी करण्यासाठी केंद्र शासनदेखील तयार होते. परंतु परिवहन महामंडळाने या बस स्वत:च्या ताब्यात घेतल्या आणि महापालिकेने त्यांना ही सेवा चालविण्याचे स्वारस्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आत्तापर्यंतच्या फेटाळलेल्या बससेवाच्महापालिकेने स्वत: बस खरेदी करून सेवा चालविण्याचा प्रस्ताव फेटाळला. त्यावेळी याच क्रिसील कंपनीने अहवाल देताना ही सेवा तोट्यात जाईल असे स्पष्ट केले होते.च्महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी स्वारस्य घेतलेल्या बीआरटीएस सेवेचा, अहमदाबाद येथील सेवेचा अभ्यास करण्यात आला. मात्र, त्यावेळीदेखील ही सेवा पूर्णत: तोट्यात आढळली होती. शिवाय मोठ्या रस्त्यांवरच बीआरटीएस अन्य रस्त्यावर पूरक साध्या बस किंवा रिक्षांचा वापर होणार होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच हा एक हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव फेटाळला होता.च्आता पुन्हा हा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यात ठेकेदारीचा समावेश करण्यात आला आहे; परंतु महापालिकेचा ठेकेदारीविषयी अनुभवदेखील कटू असून, अनेक ठेकेदारांनी खासगीकरणाच्या तरतुदीचा आधार घेऊन लवाद नेमून स्वत:च्या सोयीचे निकाल लावले तसेच महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा घाटादेखील झाला आहे.