शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

प्रकल्पग्रस्त पुन्हा धरणात उड्या घेण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 19:00 IST

महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कश्यपी धरणाची उभारणी केली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला देतानाच, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी फक्त २६ जणांना महापालिकेत सामावून

ठळक मुद्देकश्यपीप्रश्न : गंगापूरधरणात पाणी सोडण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्य कश्यपी धरणग्रस्तांचे पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सहभागी करून घेण्यास होणारा विलंब पाहता, पुन्हा एकवार पाचही गावातील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, कश्यपी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटेपर्यंत गंगापूर धरणात पाणी सोडण्यास विरोध दर्शवून प्रसंगी धरणाच्या पाण्यात उड्या घेण्याची तयारी चालविली आहे.दोन दिवसांपूर्वीच धोंडेगाव, देवरगाव, गोळशी, खड्याची वाडी येथील ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कश्यपी धरणाची उभारणी केली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला देतानाच, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी फक्त २६ जणांना महापालिकेत सामावून घेतले असून, उर्वरित ३६ जणांना आजही प्रतीक्षा आहे. शिवाय धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. गेल्या वीस वर्षांपासून या संदर्भात सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून २०१६ मध्ये प्रकल्पग्रस्तांनी थेट धरणाच्या पाण्यात उड्या घेतल्यामुळे सरकार खडबडून जागे झाले. त्यानंतर शासकीय समिती गठीत करून त्याबाबत वारंवार बैठका झाल्या, प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने गंगापूर धरणात जेमतेम ५६ टक्केच जलसाठा आहे, धरणाच्या पाण्यावर असलेले आवर्तन पाहता, लवकरच कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने सुरू केले असून, कश्यपी धरणात ९३ टक्के म्हणजेच १७२६ दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन कश्यपी धरणग्रस्तांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. महापालिकेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, जलसंपदा विभागाने त्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. या मागण्यांचा विचार न झाल्यास गंगापूर धरणात कश्यपीतून पाणी सोडू दिले जाणार नाही, तसा प्रयत्न केल्यास धरणात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरपंच काशीनाथ दत्तू मोंढे, सुकदेव सोनू मोंढे, सोमनाथ लक्ष्मण मोंढे, राजाराम भिका बेंडकोळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय