शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 17:57 IST

सटाणा तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण जगात अहिंसेचा संदेश पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज असल्याची माहिती मांगीतुंगी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या विशालकाय १०८ फूट उंच मूर्तीच्या प्रेरणास्थान गणिनी प्रमुख श्री ज्ञानमती माता यांनी दिली.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणाही सज्ज : राष्टÑपतींच्या हस्ते दिगंबर जैन प्रतिमा ग्रंथाचे लोकार्पण

सटाणा : तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण जगात अहिंसेचा संदेश पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज असल्याची माहिती मांगीतुंगी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या विशालकाय १०८ फूट उंच मूर्तीच्या प्रेरणास्थान गणिनी प्रमुख श्री ज्ञानमती माता यांनी दिली.शुक्र वारी (दि. १९) मांगीतुंगी फाट्यावरील भगवान ऋषभदेवपूरम येथील मूर्तिनिर्माण समितीच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी गणिनी प्रमुख ज्ञानमती माता यांनी माहिती दिली. याप्रसंगी आर्यिका श्री चंदनामती माता, समितीचे अध्यक्ष पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, अधिष्ठाता सी.आर. पाटील, कार्याध्यक्ष अनिल जैन, महामंत्री संजय पापडीवाल, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, विश्वस्त भूषण कासलीवाल, मंत्री विजयकुमार जैन, डॉ. जीवन प्रकाश जैन, चंद्रशेखर कासलीवाल उपस्थित होते. राष्ट्रपती कोविंद यांचे दुपारी साडेतीन वाजता एका विशेष विमानाने मांगीतुंगी येथे आगमन होणार आहे. या कार्यक्र मासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, तालिका विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पाटणी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षपद भूषविणार आहेत. संमेलनास राष्ट्रपती कोविंद यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद उपस्थित राहणार असून, त्यादेखील आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा ग्रंथाचे लोकार्पण राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच समितीकडून यंदापासून देण्यात येणाऱ्या भगवान ऋषभदेव इंटरनॅशनल अवॉर्ड मुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विश्वविद्यालयाला जाहीर केला असून, तो राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते विद्यालयाचे कुलगुरू सुरेश जैन यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री ज्ञानमती माता यांनी सांगितले. एक तासाच्या कार्यक्र मानंतर राष्ट्रपती कोविंद यांचे दुपारी साडेचार वाजता प्रस्थान होईल.————————————————भगवान ऋषभदेव यांच्या अहिंसात्मक सिद्धांताच्या प्रचार व प्रसारासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन धर्मीयांचा प्रमुख सिद्धांत अहिंसा परमोधर्म याच्या आधारे जगात शांती प्रस्थापित करण्याचे काम केले जात आहे. या संमेलनाच्या निमित्ताने जैन समाज अनेक ठिकाणी विश्वशांती अनुष्ठान , धार्मिक आयोजन, संगोष्ठी, मंत्र जप या माध्यमातून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जाणार आहे. गणिनी प्रमुख ज्ञानमती माता म्हणाल्या की, देशात सुख, शांती प्रस्थापित करण्यासाठी भक्तिमय वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. हे काम धर्मगुरु ंचे असून, त्यासाठी धार्मिक अनुष्ठान, यज्ञ, पूजा, प्रवचन आदी कार्यक्र म राबविणे आवश्यक आहे. कुटुंब, समाज आणि देशात एकमेकांवर प्रेम, करु णा, मैत्री असेल तर निश्चितच शांती प्रस्थापित होईल.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र