शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 17:57 IST

सटाणा तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण जगात अहिंसेचा संदेश पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज असल्याची माहिती मांगीतुंगी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या विशालकाय १०८ फूट उंच मूर्तीच्या प्रेरणास्थान गणिनी प्रमुख श्री ज्ञानमती माता यांनी दिली.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणाही सज्ज : राष्टÑपतींच्या हस्ते दिगंबर जैन प्रतिमा ग्रंथाचे लोकार्पण

सटाणा : तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण जगात अहिंसेचा संदेश पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज असल्याची माहिती मांगीतुंगी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या विशालकाय १०८ फूट उंच मूर्तीच्या प्रेरणास्थान गणिनी प्रमुख श्री ज्ञानमती माता यांनी दिली.शुक्र वारी (दि. १९) मांगीतुंगी फाट्यावरील भगवान ऋषभदेवपूरम येथील मूर्तिनिर्माण समितीच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी गणिनी प्रमुख ज्ञानमती माता यांनी माहिती दिली. याप्रसंगी आर्यिका श्री चंदनामती माता, समितीचे अध्यक्ष पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, अधिष्ठाता सी.आर. पाटील, कार्याध्यक्ष अनिल जैन, महामंत्री संजय पापडीवाल, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, विश्वस्त भूषण कासलीवाल, मंत्री विजयकुमार जैन, डॉ. जीवन प्रकाश जैन, चंद्रशेखर कासलीवाल उपस्थित होते. राष्ट्रपती कोविंद यांचे दुपारी साडेतीन वाजता एका विशेष विमानाने मांगीतुंगी येथे आगमन होणार आहे. या कार्यक्र मासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, तालिका विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पाटणी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षपद भूषविणार आहेत. संमेलनास राष्ट्रपती कोविंद यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद उपस्थित राहणार असून, त्यादेखील आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा ग्रंथाचे लोकार्पण राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच समितीकडून यंदापासून देण्यात येणाऱ्या भगवान ऋषभदेव इंटरनॅशनल अवॉर्ड मुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विश्वविद्यालयाला जाहीर केला असून, तो राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते विद्यालयाचे कुलगुरू सुरेश जैन यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री ज्ञानमती माता यांनी सांगितले. एक तासाच्या कार्यक्र मानंतर राष्ट्रपती कोविंद यांचे दुपारी साडेचार वाजता प्रस्थान होईल.————————————————भगवान ऋषभदेव यांच्या अहिंसात्मक सिद्धांताच्या प्रचार व प्रसारासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन धर्मीयांचा प्रमुख सिद्धांत अहिंसा परमोधर्म याच्या आधारे जगात शांती प्रस्थापित करण्याचे काम केले जात आहे. या संमेलनाच्या निमित्ताने जैन समाज अनेक ठिकाणी विश्वशांती अनुष्ठान , धार्मिक आयोजन, संगोष्ठी, मंत्र जप या माध्यमातून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जाणार आहे. गणिनी प्रमुख ज्ञानमती माता म्हणाल्या की, देशात सुख, शांती प्रस्थापित करण्यासाठी भक्तिमय वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. हे काम धर्मगुरु ंचे असून, त्यासाठी धार्मिक अनुष्ठान, यज्ञ, पूजा, प्रवचन आदी कार्यक्र म राबविणे आवश्यक आहे. कुटुंब, समाज आणि देशात एकमेकांवर प्रेम, करु णा, मैत्री असेल तर निश्चितच शांती प्रस्थापित होईल.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र