शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वावी ते श्रीक्षेत्र मढी पदयात्रेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:20 IST

रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असून, यानिमित्त तयारी करण्यात येत आहे.

वावी : रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असून, यानिमित्त तयारी करण्यात येत आहे.  वावी गावचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराजांची श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. रंगपंचमीच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी दरवर्षी धूलिवंदन ते रंगपंचमी या काळात वावी येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. सुमारे ७०० नाथभक्त पायी दिंंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे जातात. येत्या शुक्रवारी निघणाºया पदयात्रेची तयारी सुरू असून, यात्रोत्सवात सहभागी होणारा रथ सजविण्यात आला आहे. पदयात्रेसाठी युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. पापमोचनी एकादशी (दि. १३ ) ते फाल्गुन चतुदर्शी (दि. १६) पर्यंत भाविकांना समाधीचे दर्शन घेता येणार आहे.सुमारे ४५ वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या रंगपंचमी सोहळ्याच्या पदयात्रेत गेल्या १५ वर्षांपासून भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोणी, कोल्हार, सोनई, शनिशिंंगणापूर, टाकळीमियाँ, मिरी, तिसगाव मार्गे जाणाºया पदयात्रेत भक्त दररोज ४० किलोमीटर अंतर पायी चालतात. पदयात्रेसोबत पिण्याच्या पाण्याचा टँकर, ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहने असतात.  गुरुवारी (दि. १) सकाळी ९ वाजता कोपरगाव आश्रमाचे प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते रथ, ध्वज व पालखीचे पूजन करण्यात येणार असून, सायंकाळी ६ वाजता कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. २) सकाळी रथाचे मढीच्या दिशेने प्रस्थान होईल.  रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी येथे भरणाºया यात्रेला महाराष्टÑातून लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रोत्सवात वावीच्या काठीला विशेष मान असतो. वाजत गाजत मिरवणूक काढून काठीला कळसाचे दर्शन घडवले जाते. वावी पदयात्रा समितीने मढी येथे मुक्कामासाठी जागा विकत घेतली असून, या ठिकाणी पायी जाणारे नाथभक्त विसावतात. पदयात्रा काळात तिसगाव, सोनई, टाकळीमिया आदी गावांसह गावोगावी रथाचे पूजन करण्यात येऊन गावातून रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. प्रत्येक गावातील गावकरी जल्लोषात स्वागत करतात. पदयात्रेनिमित्त वावी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पदयात्रा संयोजक श्री कानिफनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.यावर्षी समाधीमंदिर चार दिवस खुलेभटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीक्षेत्र मढी येथील यात्रोत्सव होळी ते गुढीपाडवा असा पंधरा दिवस असतो. रंगपंचमी व गुढीपाडवा या दोन दिवशी मोठी यात्रा भरते. यापूर्वी केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी भाविकांना गाभाºयात जाऊन समाधीचे दर्शन घेता येत होते. त्यामुळे मोठी गर्दी होत असे. भाविकांना समाधीचे थेट दर्शन घेता यावे यासाठी समाधी मंदिर चार दिवस खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक