शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात तिळगुळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग, गोड स्नेहगुणांच्या मकर संक्रांतीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:15 IST

मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. हा दिवस अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना शहरात तिळगूळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

ठळक मुद्देमकरसंक्रांतीसाठी तीळगुळ बनविण्याच्या प्रक्रीयेला वेगशहर परिसरातील वातावरणात सणाचा गोडव्याची चाहूलतीळगुळांचे लाडू, रेवडी तयार करण्यात व्यवसायिक व्यस्त

नाशिक : भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व असून, प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. हा दिवस अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना शहरात तिळगूळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तिळगूळ दिले जातात. दिवाळी संपल्यानंतरचा व नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्र ांती असून, हा सण हिवाळ्यात येत असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तसेच शरीरातील उष्णताही कमी होत असते. तीळ ही स्निग्धता कायम ठेवण्याचे तर गूळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करत असतो. तसेच या दिवसापासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो, अशी आख्यायिका आहे. अशा तिळापासून बनलेल्या पदार्थाना मकरसंक्रांती सणाच्या पाश्र्वभूमीवर मोठी मागणी असते. त्यामुळे तिळगूळ तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या साणासाठी गावरान तिळांना अधिक मागणी असल्याने त्यापासून लाडू, साखर व गुळाच्या वडी, रेवडी, तिळाचे पापड आदि पदार्थ तयार करण्यात येत असून, हे पदार्थ वजनानुसार 10 रुपयांपासून ते 100रुपयांर्पयतच्या वेगवेगळ्या पाकिटांमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान, अनेक कुटुंबांमध्ये सुटे तीळ खरेदी करून तीळ व गुळाचे पदार्थ तयार करण्याची प्रथा आहे. त्यामुळे सुटय़ा तिळांना होणारी मागणी लक्षात घेऊन आठवडे बाजारातील विक्रेते असे तीळ विक्रीसाठी ठेवत असतात. ज्या विक्रेत्यांनी तिळाची खरेदी करून ठेवली आहे, त्यांनी तिळांना बुरशी अथवा किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गोदावरीच्या घाटावर तिळांचे वाळवण घातले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक