शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नाशकात तिळगुळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग, गोड स्नेहगुणांच्या मकर संक्रांतीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:15 IST

मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. हा दिवस अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना शहरात तिळगूळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

ठळक मुद्देमकरसंक्रांतीसाठी तीळगुळ बनविण्याच्या प्रक्रीयेला वेगशहर परिसरातील वातावरणात सणाचा गोडव्याची चाहूलतीळगुळांचे लाडू, रेवडी तयार करण्यात व्यवसायिक व्यस्त

नाशिक : भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व असून, प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. हा दिवस अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना शहरात तिळगूळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तिळगूळ दिले जातात. दिवाळी संपल्यानंतरचा व नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्र ांती असून, हा सण हिवाळ्यात येत असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तसेच शरीरातील उष्णताही कमी होत असते. तीळ ही स्निग्धता कायम ठेवण्याचे तर गूळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करत असतो. तसेच या दिवसापासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो, अशी आख्यायिका आहे. अशा तिळापासून बनलेल्या पदार्थाना मकरसंक्रांती सणाच्या पाश्र्वभूमीवर मोठी मागणी असते. त्यामुळे तिळगूळ तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या साणासाठी गावरान तिळांना अधिक मागणी असल्याने त्यापासून लाडू, साखर व गुळाच्या वडी, रेवडी, तिळाचे पापड आदि पदार्थ तयार करण्यात येत असून, हे पदार्थ वजनानुसार 10 रुपयांपासून ते 100रुपयांर्पयतच्या वेगवेगळ्या पाकिटांमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान, अनेक कुटुंबांमध्ये सुटे तीळ खरेदी करून तीळ व गुळाचे पदार्थ तयार करण्याची प्रथा आहे. त्यामुळे सुटय़ा तिळांना होणारी मागणी लक्षात घेऊन आठवडे बाजारातील विक्रेते असे तीळ विक्रीसाठी ठेवत असतात. ज्या विक्रेत्यांनी तिळाची खरेदी करून ठेवली आहे, त्यांनी तिळांना बुरशी अथवा किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गोदावरीच्या घाटावर तिळांचे वाळवण घातले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक