शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात तिळगुळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग, गोड स्नेहगुणांच्या मकर संक्रांतीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:15 IST

मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. हा दिवस अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना शहरात तिळगूळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

ठळक मुद्देमकरसंक्रांतीसाठी तीळगुळ बनविण्याच्या प्रक्रीयेला वेगशहर परिसरातील वातावरणात सणाचा गोडव्याची चाहूलतीळगुळांचे लाडू, रेवडी तयार करण्यात व्यवसायिक व्यस्त

नाशिक : भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व असून, प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. हा दिवस अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना शहरात तिळगूळ बनविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तिळगूळ दिले जातात. दिवाळी संपल्यानंतरचा व नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्र ांती असून, हा सण हिवाळ्यात येत असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तसेच शरीरातील उष्णताही कमी होत असते. तीळ ही स्निग्धता कायम ठेवण्याचे तर गूळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करत असतो. तसेच या दिवसापासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो, अशी आख्यायिका आहे. अशा तिळापासून बनलेल्या पदार्थाना मकरसंक्रांती सणाच्या पाश्र्वभूमीवर मोठी मागणी असते. त्यामुळे तिळगूळ तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या साणासाठी गावरान तिळांना अधिक मागणी असल्याने त्यापासून लाडू, साखर व गुळाच्या वडी, रेवडी, तिळाचे पापड आदि पदार्थ तयार करण्यात येत असून, हे पदार्थ वजनानुसार 10 रुपयांपासून ते 100रुपयांर्पयतच्या वेगवेगळ्या पाकिटांमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान, अनेक कुटुंबांमध्ये सुटे तीळ खरेदी करून तीळ व गुळाचे पदार्थ तयार करण्याची प्रथा आहे. त्यामुळे सुटय़ा तिळांना होणारी मागणी लक्षात घेऊन आठवडे बाजारातील विक्रेते असे तीळ विक्रीसाठी ठेवत असतात. ज्या विक्रेत्यांनी तिळाची खरेदी करून ठेवली आहे, त्यांनी तिळांना बुरशी अथवा किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गोदावरीच्या घाटावर तिळांचे वाळवण घातले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक