शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्रारंभिक प्रचारात राष्ट्रीय राजकारणावर तसेच आरोप-प्रत्यारोपांवरच भर; आता हवे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ ! स्थानिक मुद्द्यांवर कुणी काही बोलणार आहे की नाही?

By किरण अग्रवाल | Updated: April 7, 2019 02:00 IST

सारांश किरण अग्रवाल। आपल्याकडील निवडणुकीच्या जाहीर प्रचारात अजून रंग भरायचे आहेत; पण प्राथमिक अवस्थेत होत असलेले मेळावे व गावोगावच्या ...

ठळक मुद्देअधिकतर प्रचार राष्ट्रीय राजकारणाला धरून ‘सोशल मीडिया’वर मात्र जाहीर प्रचाराची सुरुवात स्थानिक मुद्दे आतापर्यंतच्या प्रचारात अभावानेच मतदारसंघाच्या विकासाचे ‘व्हिजन’

सारांशकिरण अग्रवाल।आपल्याकडील निवडणुकीच्या जाहीर प्रचारात अजून रंग भरायचे आहेत; पण प्राथमिक अवस्थेत होत असलेले मेळावे व गावोगावच्या संपर्क बैठकांत बोलणारे नेते आणि उमेदवारांकडूनही अपवादवगळता राष्ट्रीय व राज्यस्तरीय मुद्देच छेडले जात असल्याचे पाहता, स्थानिक विकासाच्या मुद्द्यांकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही, असा प्रश्नच पडावा. विशेष म्हणजे, अधिकतर प्रचार राष्ट्रीय राजकारणाला धरून होत आहे. परिणामी सामान्य माणूस यात आपले व आपल्यासाठी काय, हेच चाचपडताना बघावयास मिळत आहे.नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक अवस्थेत ‘युती’ व ‘आघाडी’च्या मनोमीलनाच्या बैठका-मेळावे तसेच वैयक्तिक गाठीभेटींवर भर असेच प्रचाराचे स्वरूप असले तरी, ‘सोशल मीडिया’वर मात्र जाहीर प्रचाराची सुरुवात होऊन गेली आहे. या बैठका, मेळावे असोत की ‘व्हायरल’ संदेश; यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय मुद्दे व आरोप-प्रत्यारोपांचेच प्रश्न उपस्थित केले गेलेले दिसत आहेत. त्यामुळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत व टीव्हीपासून मोबाइलमधील संदेशांपर्यंत तेच ते ऐकून-वाचून मतदार भंडावून गेले आहेत. त्यांच्याशी ‘कनेक्ट’ साधणारे स्थानिक मुद्दे आतापर्यंतच्या प्रचारात अभावानेच आढळून येतात.देशाच्या सत्तेसाठीची निवडणूक असल्याने यात देशपातळीवरील विषयांवर भर राहणार हे स्वाभाविकच आहे; पण स्थानिक नेत्यांनी तरी स्थानिकांच्या आशा-अपेक्षांना दुर्लक्षून राष्ट्रीय विषयांमध्ये गुंतून पडू नये अशी लोकभावना आहे. एस.टी. बस, रिक्षाने प्रवास करणाऱ्या तसेच उद्यानांमधील कट्ट्यावर आयुष्याची सांजवेळ घालविणाऱ्या अनेक ज्येष्ठांशी चर्चा केली असता, त्यात ‘कुणालाही निवडून दिले तर आपल्या जीवनमानात काही फरक पडत नाही’, अशी भावना प्रकर्षाने ऐकावयास मिळते ती त्यामुळेच. कारण, स्थानिक विषयांच्या-प्रश्नांच्या सोडवणुकीचे समाधान कुणाठायी नाही. चांगल्याची, लाभाची म्हणजेच विकासाची सुरुवात आपल्यापासून, स्वत:च्या शहरापासून व्हावी असेच प्रत्येकाला वाटते; पण प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही. त्यामुळेही स्थानिक मुद्दे प्रचारात अग्रस्थानी दिसत नाहीत.नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘एप्रिल फुल’च्या दिनी ‘विकास गुल’चा आरोप करीत एक व्यंगचित्र पुस्तिका प्रकाशित केली गेली, त्याला उत्तर देताना विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी सोबत बसून कामे कुणी केली याबाबत सोक्षमोक्ष करण्याचे आव्हान दिले. पण यातील स्थानिक कामांचा संदर्भ सोडला तर अन्यत्र त्याबाबत जाहीरपणे बोलले गेल्याचे अपवादानेच दिसून आले. युतीतर्फे शुक्रवारी संजय राऊत व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मेळावा झाला, त्यातही स्थानिक प्रश्नावर कोणी बोलले नाही. विशेषत: गेल्या दहा-पाच वर्षात आपल्याकडे नवीन कोणता उद्योग येऊ शकलेला नाही. द्राक्ष, कांदा, डाळिंबाचे मोठे उत्पादन जिल्ह्यात होते; पण मोठे प्रक्रिया उद्योग नाहीत, परिणामी रोजगार खुंटला आहे. ‘आयटी’ पार्क उभा राहू शकलेला नाही. नाशकातल्या काही बाबी तिकडे विदर्भात पळविण्याचे प्रयत्न समोर आलेत. ‘मांजरपाडा’ प्रकल्प रखडला आहे, शहराचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरू शकणाºया पर्यटन विकासाच्या मोठ्या संधी आहेत; पण त्याबाबत फारसे आशादायी घडताना दिसत नाही. बांधकाम नियमावलीचा व ‘कपाटा’सारखा प्रश्न दोन-तीन वर्ष चघळला जातो, त्यातून एकूणच बांधकाम व्यवसाय थंडावतो; पण त्याबाबत आक्रमकपणे शासनाशी भांडताना कुणी दिसले नाही. ‘स्मार्ट सिटी’चे रडतखडत सुरू आहे, पण या व अशा असंख्य स्थानिक बाबींबद्दल चर्चा होताना दिसत नाही.सत्ताधारी व विद्यमान प्रतिनिधी असो, की त्यासमोर उभे राहणारे विरोधक; या साऱ्यांनी दिल्ली गाठू पाहताना अशा स्थानिक विषयांबद्दल काही ‘अजेंडा’ मतदारांसमोर ठेवला तर त्यांचा ‘कनेक्ट’ वाढू शकेल. राष्ट्रीय राजकारणाचा प्रभाव व परिणाम त्यांच्या निवडीसाठी कामी येईलच. परंतु त्याच्या जोडीला स्थानिक विषयांची, विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ही राहिली तर मतदारांना योग्य व सक्षम प्रतिनिधीची निवड करणे अधिक सोपे जाईल. आरोप-प्रत्यारोपांच्या व एकमेकांवरील प्रश्नांच्या जंजाळात न गुरफटता मतदारसंघाच्या विकासाचे ‘व्हिजन’ हाती घेऊन मतदारांना सामोरे जाणे अधिक योग्य ठरेल. तेव्हा, या पुढील काळात तरी तसे घडून यावे हीच अपेक्षा.

टॅग्स :Politicsराजकारण