शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

प्रवीण देशमुख : सिन्नर येथे नाशिक विभागातील सहकारी औद्योगिक वसाहतींची बैठक गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:22 IST

सिन्नर : शासनाकडून नियमात अनेक बदल केले जात असून, या बदलांना सामोरे जात उद्योगांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी वसाहतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देकामगारांना प्रशिक्षण घेण्यासाठी तरतूद सहकारी वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा

सिन्नर : शासनाकडून नियमात अनेक बदल केले जात असून, या बदलांना सामोरे जात उद्योगांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी वसाहतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी केले.उद्योग संचलनालयाच्या वतीने नाशिक विभागातील सहकारी औद्योगिक वसाहतींची बैठक मुसळगाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या कै. नंदलालजी केला सभागृहात पार पडली, यावेळी देशमुख बोलत होते. वसाहतीचे अध्यक्ष अविनाश तांबे, उपाध्यक्ष रामदास दराडे, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्ययस्थापक प्रदीप रेंदाळकर, अहमदनगरचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, धुळे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, नंदुरबारचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, उद्योग संचालक उमेशचंद्र दंडगव्हाळ, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रतीक पेशकर आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, शासनाचे निर्णय सर्वांना समजावेत यासाठी आॅनलाइन लिंकवर प्रसिद्ध केले जात आहेत. त्यावर विश्वास ठेवा, शासन बदल करीत आहे त्यास सकारात्मक दृष्टीने सामोरे गेल्यास सर्व प्रश्न मार्गी लागलेले दिसतील, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. अधिकारी म्हणून आम्ही सहकार्य करू. कामगारांना प्रशिक्षण घेण्यासाठी आमच्याकडे तरतूद आहे. वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतील. दर तीन महिन्यांनी विभागातील जिल्ह्यांमध्ये बैठकी घेण्यात येतील व त्यात मांडण्यात आलेले काही प्रश्न पुढच्या बैठकीमध्ये सुटलेले बघायला मिळतील, असे ते म्हणाले. सहकारी वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी शासनाच्या पातळीवरून मदत मिळत नसल्याच्या तक्रारींचा पाढाच या बैठकीत विभागातील पाच जिल्ह्यांमधून आलेल्या पदाधिकारी व अधिकाºयांनी मांडला. पदाधिकाºयांच्या प्रश्नांना देशमुख यांनी उत्तरे दिली. माळेगाव, जळगाव मनपा वसाहतींकडून सर्व कर वसूल करतात. मात्र, वसाहतींच्या कुठल्याही सुविधा पुरवत नसल्याची तक्रार तेथील वसाहतींच्या पदाधिकाºयांनी केली होती. त्याची दखल घेत या दोन्ही महानगरपालिकांबरोबरच विभागातील इतरही नगरपालिका, नगरपालिकांबरोबर संयुक्त बैठका घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे ते म्हणाले. बैठकांमधील अडी-अडचणींचा आराखडा शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कळवणचे डॉ. किशोर कुवर, मनमाडचे सुनील कासलीवाल, चाळीसगावचे संजय पवार, जळगावचे चिंतामण पाटील, भडगावचे प्रदीप पवार यांच्यासह येवला, संगमनेर, नगर येथील पदाधिकाºयांनीही आपल्या वसाहतींना येणाºया समस्या मांडल्या. नामकर्ण आवारे यांनी समस्या मांडण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल वसाहतीच्या संपूर्ण संचालक मंडळाचे आभार मानले. मदन लोणारे यांनी सूत्रसंचालन केले. नाशिक, नगर, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यांतील सुमारे २८ सहकारी वसाहतींचे पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.सरकारी धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्नउद्योग खाते म्हणजे केवळ एमआयडीसीपुरते मर्यादित आहे असे आजपर्यंत मानले जात होते. मात्र, औद्योगिक वसाहतीपर्यंतही सरकारी धोरणे पोहोचली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाशकार म्हणाले. केवळ शासनाला दोष देऊन चालणार नाही तर अशा बैठकीमधील फिडबॅक शासनाच्या धोरणात दिसला पाहिजे ही मुख्यमंत्री व शासनाची इच्छा आहे़