शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण देशमुख : सिन्नर येथे नाशिक विभागातील सहकारी औद्योगिक वसाहतींची बैठक गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:22 IST

सिन्नर : शासनाकडून नियमात अनेक बदल केले जात असून, या बदलांना सामोरे जात उद्योगांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी वसाहतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देकामगारांना प्रशिक्षण घेण्यासाठी तरतूद सहकारी वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा

सिन्नर : शासनाकडून नियमात अनेक बदल केले जात असून, या बदलांना सामोरे जात उद्योगांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी वसाहतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी केले.उद्योग संचलनालयाच्या वतीने नाशिक विभागातील सहकारी औद्योगिक वसाहतींची बैठक मुसळगाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या कै. नंदलालजी केला सभागृहात पार पडली, यावेळी देशमुख बोलत होते. वसाहतीचे अध्यक्ष अविनाश तांबे, उपाध्यक्ष रामदास दराडे, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्ययस्थापक प्रदीप रेंदाळकर, अहमदनगरचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, धुळे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, नंदुरबारचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, उद्योग संचालक उमेशचंद्र दंडगव्हाळ, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रतीक पेशकर आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, शासनाचे निर्णय सर्वांना समजावेत यासाठी आॅनलाइन लिंकवर प्रसिद्ध केले जात आहेत. त्यावर विश्वास ठेवा, शासन बदल करीत आहे त्यास सकारात्मक दृष्टीने सामोरे गेल्यास सर्व प्रश्न मार्गी लागलेले दिसतील, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. अधिकारी म्हणून आम्ही सहकार्य करू. कामगारांना प्रशिक्षण घेण्यासाठी आमच्याकडे तरतूद आहे. वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतील. दर तीन महिन्यांनी विभागातील जिल्ह्यांमध्ये बैठकी घेण्यात येतील व त्यात मांडण्यात आलेले काही प्रश्न पुढच्या बैठकीमध्ये सुटलेले बघायला मिळतील, असे ते म्हणाले. सहकारी वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी शासनाच्या पातळीवरून मदत मिळत नसल्याच्या तक्रारींचा पाढाच या बैठकीत विभागातील पाच जिल्ह्यांमधून आलेल्या पदाधिकारी व अधिकाºयांनी मांडला. पदाधिकाºयांच्या प्रश्नांना देशमुख यांनी उत्तरे दिली. माळेगाव, जळगाव मनपा वसाहतींकडून सर्व कर वसूल करतात. मात्र, वसाहतींच्या कुठल्याही सुविधा पुरवत नसल्याची तक्रार तेथील वसाहतींच्या पदाधिकाºयांनी केली होती. त्याची दखल घेत या दोन्ही महानगरपालिकांबरोबरच विभागातील इतरही नगरपालिका, नगरपालिकांबरोबर संयुक्त बैठका घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे ते म्हणाले. बैठकांमधील अडी-अडचणींचा आराखडा शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कळवणचे डॉ. किशोर कुवर, मनमाडचे सुनील कासलीवाल, चाळीसगावचे संजय पवार, जळगावचे चिंतामण पाटील, भडगावचे प्रदीप पवार यांच्यासह येवला, संगमनेर, नगर येथील पदाधिकाºयांनीही आपल्या वसाहतींना येणाºया समस्या मांडल्या. नामकर्ण आवारे यांनी समस्या मांडण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल वसाहतीच्या संपूर्ण संचालक मंडळाचे आभार मानले. मदन लोणारे यांनी सूत्रसंचालन केले. नाशिक, नगर, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यांतील सुमारे २८ सहकारी वसाहतींचे पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.सरकारी धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्नउद्योग खाते म्हणजे केवळ एमआयडीसीपुरते मर्यादित आहे असे आजपर्यंत मानले जात होते. मात्र, औद्योगिक वसाहतीपर्यंतही सरकारी धोरणे पोहोचली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाशकार म्हणाले. केवळ शासनाला दोष देऊन चालणार नाही तर अशा बैठकीमधील फिडबॅक शासनाच्या धोरणात दिसला पाहिजे ही मुख्यमंत्री व शासनाची इच्छा आहे़