शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जुन्या नाशकात प्रचारात कव्वाली अन् भक्तिगीते

By admin | Updated: February 16, 2017 23:26 IST

उमेदवारांची शक्कल : परिसर बदलला की ‘धून’ही बदलते

 नाशिक : निवडणुकीचा माहोल रंगात आला असून, उमेदवारांकडून प्रभाग पिंजून काढण्यासाठी जिवाचे रान केले जात आहे. बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिल्याने मतदारांपुढे स्वत:ची छाप पाडण्यासाठी उमेदवार विविध शक्कल लढवित आहेत. जुन्या नाशकात प्रचारात चक्क कव्वाली अन् भक्तिगीते वाजविली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेल्या उमेदवारांकडून प्रचारावर सर्वाधिक भर दिला जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅँकेतून रक्कम काढण्यावर मर्यादा जरी असली तरी ‘होऊ द्या खर्च...’ या उक्तीनुसार काही उमेदवार कामाला लागले आहेत. आचारसंहिता भरारी पथकांच्या वाहनांसोबतच विविध पक्षांच्या उमेदवारांचे प्रचाररथही प्रभागातून गतिमान झाल्याचे चित्र आहे. प्रचार फेऱ्या काढून मतदारांचे लक्ष वेधण्याचा उमेदवार प्रयत्न करत असून, दुसरीकडे जुन्या नाशकात तर चक्क प्रचाररथांवर ‘एलईडी वॉल’ लावून प्रचार केला जात आहे. उमेदवाराची ‘ओळख’ अन् ‘आवाहन’ झाल्यानंतर मुस्लीम बहुल भागात वाहन असेल तर कव्वालीची ध्वनिफीत आणि हिंदू बहुल भागातून वाहन जात असेल तर भक्तिगीते वाजवून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. प्रचारात कव्वाली अन् भक्तिगीतांचे संगीत सध्या जुन्या नाशकात चर्चेचा मुद्दा आहे. दाट लोकवस्ती, हिंदू-मुस्लिमांचा एकोपा अशी जुन्या नाशिकची थोडक्यात ओळख. जुन्या नाशिकने महापालिकेत अनेकदा नेतृत्व पाठविले; मात्र या भागाचा गावठाण परिसर आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. निवडणुका येतात आणि उमेदवारांकडून आश्वासन नव्हे तर चक्क ‘स्मार्ट जुने नाशिक’असे कायापालटचे स्वप्न दाखविले जाते; मात्र मतदानानंतर परिस्थितीत पुन्हा ‘जैसे थे’ चित्र निर्माण होते, अशी खंत येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.