शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांची; जागरण मात्र गुरुजींचे, रेंजची समस्या; ऑनलाइन सबमिशनचा गोंधळ कायम

By संकेत शुक्ला | Updated: February 11, 2024 16:18 IST

दिवसा वीजपुरवठ्यासह रेंजची अडचण असल्याने मध्यरात्रीनंतर मोबाईलला रेंज येताच ते काम करावे लागते आहे.

नाशिक : दहावी, बारावीच्या अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये केला जाणारा हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिकांचे गुण ओएमआर गुणपत्रिकांऐवजी ऑनलाइन भरण्याची केलेली सूचना अंमलात आणली जात असताना भागात अनेक ठिकाणी रेंजची समस्या येत आहे. दिवसा वीजपुरवठ्यासह रेंजची अडचण असल्याने मध्यरात्रीनंतर मोबाईलला रेंज येताच ते काम करावे लागते आहे.

शनिवारपासून म्हणजेच १० फेब्रुवारीपासून दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ झाला आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत या परीक्षा संपवायच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. याची दखल घेऊन महामंडळाने ऑनलाइन गुणदानाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन सबमिशनही त्वरित करण्याची सक्ती असून, ओएमआर शीट त्यानंतर मंडळाकडे दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे. ही प्रक्रियाही किचकट स्वरूपाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती त्यात भरताना रेंजची समस्या येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मंडळाने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे गुण शिक्षक, प्राचार्यांना संकेतस्थळावरील 'प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड लिंकमधून प्रचलित लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून नोंदवावे लागणार आहेत. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिले, अशा विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक 'आउट ऑफ टर्न' परीक्षेसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र ऑनलाइन गूणदान करण्यासाठी रेंजची अडचण येते. रात्री उशिरा रेंज मिळाल्यानंतर मार्क टाकावे लागतात. त्यानंतर शिट अपलोड होते. त्यामुळे गुरुजींना रात्रीचे जागरण सक्तीचे झाले आहे.

२० गुणांसाठी प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ झाला आहे. इंटरनल परीक्षा झाल्यानंतर ओएमआर शीट ऑनलाउन माहिती त्यात भरायची सूचना आहे. त्यानुसार कामकाज केले जात आहे. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आणि ती ऑफलाइन पाठवायची आहे. त्यात काही तफावत आढळली, तर कारवाई होऊ शकते. ऑनलाइन सबमिशन वेळेत होत नसल्याने रेंज प्राप्त झाल्यानंतर ते भरावे लागतात. प्रसंगी रात्री उशिरा हे काम करावे लागते. त्यामुळे शासनाने यावर सकारात्मक विचार करावा.- एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना.