शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांची; जागरण मात्र गुरुजींचे, रेंजची समस्या; ऑनलाइन सबमिशनचा गोंधळ कायम

By संकेत शुक्ला | Updated: February 11, 2024 16:18 IST

दिवसा वीजपुरवठ्यासह रेंजची अडचण असल्याने मध्यरात्रीनंतर मोबाईलला रेंज येताच ते काम करावे लागते आहे.

नाशिक : दहावी, बारावीच्या अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये केला जाणारा हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिकांचे गुण ओएमआर गुणपत्रिकांऐवजी ऑनलाइन भरण्याची केलेली सूचना अंमलात आणली जात असताना भागात अनेक ठिकाणी रेंजची समस्या येत आहे. दिवसा वीजपुरवठ्यासह रेंजची अडचण असल्याने मध्यरात्रीनंतर मोबाईलला रेंज येताच ते काम करावे लागते आहे.

शनिवारपासून म्हणजेच १० फेब्रुवारीपासून दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ झाला आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत या परीक्षा संपवायच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. याची दखल घेऊन महामंडळाने ऑनलाइन गुणदानाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन सबमिशनही त्वरित करण्याची सक्ती असून, ओएमआर शीट त्यानंतर मंडळाकडे दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे. ही प्रक्रियाही किचकट स्वरूपाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती त्यात भरताना रेंजची समस्या येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मंडळाने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे गुण शिक्षक, प्राचार्यांना संकेतस्थळावरील 'प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड लिंकमधून प्रचलित लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून नोंदवावे लागणार आहेत. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिले, अशा विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक 'आउट ऑफ टर्न' परीक्षेसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र ऑनलाइन गूणदान करण्यासाठी रेंजची अडचण येते. रात्री उशिरा रेंज मिळाल्यानंतर मार्क टाकावे लागतात. त्यानंतर शिट अपलोड होते. त्यामुळे गुरुजींना रात्रीचे जागरण सक्तीचे झाले आहे.

२० गुणांसाठी प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ झाला आहे. इंटरनल परीक्षा झाल्यानंतर ओएमआर शीट ऑनलाउन माहिती त्यात भरायची सूचना आहे. त्यानुसार कामकाज केले जात आहे. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आणि ती ऑफलाइन पाठवायची आहे. त्यात काही तफावत आढळली, तर कारवाई होऊ शकते. ऑनलाइन सबमिशन वेळेत होत नसल्याने रेंज प्राप्त झाल्यानंतर ते भरावे लागतात. प्रसंगी रात्री उशिरा हे काम करावे लागते. त्यामुळे शासनाने यावर सकारात्मक विचार करावा.- एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना.