शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

वीज घालविल्यास निर्मिती केेंद्रांना फटका? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:23 IST

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घरातील सर्व दिवे बंद करून पणती, टॉर्च, मोबाइलची लाइट सुरू ठेवले तर या नऊ मिनिटांच्या काळात व त्यानंतरही विजेची मागणी एकदम कमी होऊन वीजनिर्मिती केंद्रांना मोठा फटका बसू शकतो.

ठळक मुद्देआर्थिक नुकसानीची भीती : भारनियमनाचा पर्यायविजेची मागणी व उत्पादन बरोबरीने करून समतोल साधावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करण्याचे आवाहन केले असले तरी, तांत्रिकदृष्ट्या वीजनिर्मिती केंद्रांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अचानक दिवे घालविणे व पुन्हा चालू करणे या दोन्ही बाबींमुळे होऊ घातलेले संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जनतेला रविवारी दिवसभर अधून-मधून भारनियमनाला सामोरे जाण्याची शक्यताही जाणकारांनी बोलून दाखविली आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घरातील सर्व दिवे बंद करून पणती, टॉर्च, मोबाइलची लाइट सुरू ठेवले तर या नऊ मिनिटांच्या काळात व त्यानंतरही विजेची मागणी एकदम कमी होऊन वीजनिर्मिती केंद्रांना मोठा फटका बसू शकतो. अशा वेळी जलविद्युत केंद्रे महत्त्वाचा आधार ठरू शकतात. कारण यदा कदाचित ग्रिड फेल्युअरमुळे संच ट्रीप झाले तरी औष्णिकपेक्षा जलविद्युत केंद्रे लवकर कार्यान्वित करता येते असे जाणकारांचे म्हणणे असून, ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढली किंवा एकदम कमी झाली तरीही ग्रीडसाठी धोकादायक असते. विजेची मागणी व उत्पादन बरोबरीने करून समतोल साधावा लागतो. वन नेशन, वन ग्रीड अँड वन फ्रिक्वेन्सी असे धोरण देशभरात असल्याने वीजनिर्मिती केंद्रे त्याप्रमाणात कमी, अधिक लोडवर सुरू ठेवावे लागतात. अचानक वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे ग्रीड फेल्युअर होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वीजेची मागणी व पुरवठा यातील फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेली की वीजनिर्मिती केंद्रातील सुरू असलेले संच आपोआप ट्रिप होतात. ते पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.सध्या राज्यात महानिर्मितीचे नाशिक, खापरखेडा, परळी व भुसावळ ही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे विजेची मागणी कमी झाल्याने आधीच बंद आहेत. कोराडीचे ६६० मेगावॉटचे तीन, पारसचे २५० मेगावॉटचे दोन व चंद्रपूरचे ५०० मेगावॉटचे दोन असे महानिर्मितीचे सात संच सुरू आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे विजेची फ्रिक्वेन्सी बदलली तर या सुरू असलेल्या केंद्रांवरही परिणाम होऊन ट्रिप होण्याची भीती जाणकार व्यक्त करीत असून, महाराष्ट्रातील कमाल विजेची मागणी १७ हजार मेगावॉटवर आली आहे. रविवारी रात्री सर्वत्र वीज बंद राहिली तर अचानक मागणी घटून फ्रिक्वेन्सी वाढली तर काय? अशी शंका अभियंत्यांना आहे. त्यासाठी आधीपासूनच संच बंद ठेवून काही भागात भारनियमन करावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यामुळे वीज क्षेत्रातील अधिकारी, अभियंते, कामगार यांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक