शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

आसखेडा येथे वीजप्रश्नी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 20:48 IST

नामपूर : आसखेडा, ता. बागलाण येथे महावितरण कंपनीवर शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देऊनही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रविवारी (दि.२७) सकाळी उत्राणे शिवारातील व द्याने येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपकेंद्रावर धाव घेतली. यावेळी अधिकारी हजर न झाल्याने शेतकऱ्यांनी नामपूर-ताहाराबाद रस्त्यावर आंदोलन करत वाहतूक जाम करून टाकली.

ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित : निवेदन देऊनही दखल नाही

नामपूर : आसखेडा, ता. बागलाण येथे महावितरण कंपनीवर शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देऊनही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रविवारी (दि.२७) सकाळी उत्राणे शिवारातील व द्याने येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपकेंद्रावर धाव घेतली. यावेळी अधिकारी हजर न झाल्याने शेतकऱ्यांनी नामपूर-ताहाराबाद रस्त्यावर आंदोलन करत वाहतूक जाम करून टाकली.द्याने व उत्राने येथील शेतकऱ्यांनी लेखी निवेदन कार्यकारी अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते. आसखेडा येथील कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही डीपीवर लोड जास्त असल्याकारणाने रोहित्र ट्रिप होतात असेच सांगितले जायचे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र उपकेंद्रावर वेळेवर अधिकारी हजर न झाल्या कारणाने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना नामपूर ते ताराबाद रस्त्यावर आंदोलन करावे लागले. त्यामुळे रस्ता बंद होऊन ट्रॅफिक जाम झाली होती.यावेळी जायखेडा पोलीस स्टेशन येथील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. त्यानंतर महावितरण कंपनीचे संपूर्ण अधिकारी त्या जागेवर तत्काळ उपस्थित झाले. आंदोलनास उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार, अभिमान पगार, शरद पगारे, संदीप कापडणीस यांनी कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून काही लोड नामपूर सबस्टेशनवर टाकतो असे सांगितले. त्यानंतर आंदोलनाला पूर्ण विराम देण्यात आला. 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप