शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

वीज कंपनी उभारणार अकरा ठिकाणी उपकेंद्रे

By admin | Updated: April 29, 2017 01:48 IST

वीज कंपनीने विजेशी संबंधित कामे त्या त्या गावात करण्याची अट घालून दिल्याने नजीकच्या काळात ग्रामीण भागात विजेच्या तक्रारी कमी होण्याची चिन्हे आहेत.

नाशिक : जिल्ह्णातील ग्रामीण भागात अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी वीज कंपनीला ठिकठिकाणी उपकेंद्रे उभारण्यासाठी लागणारी जागा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली असली तरी, शासकीय जमिनीच्या मूल्याइतकी वीज कंपनीने विजेशी संबंधित कामे त्या त्या गावात करण्याची अट घालून दिल्याने नजीकच्या काळात ग्रामीण भागात विजेच्या तक्रारी कमी होण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून वीज कंपनीने लक्ष दिलेले नसल्यामुळे विजेचे पोल मोडकळीस आले असून, काही ठिकाणी तारा जमिनीवर लोंबळण्याचे प्रकार झालेले आहेत. त्याच बरोबर रोहित्रांचीही नासधूस होऊन ते धोकादायक बनले आहेत. वीज कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही निव्वळ निधी नसल्याचे कारण देत कामे केली जात नसल्याबद्दल जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच तक्रारी केल्या आहेत. गेल्या आठवड्यात जिल्हा खरीप हंगाम बैठकीत आमदार नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित यांनी याप्रश्नाकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील विजेचे पोल अक्षरश: तुटले असून, काही ठिकाणी वीज तारांमुळे पोल उभे असल्याची तक्रार केली. वीज कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे तसेच अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात आली. दुर्गम भागात वारंवार वीज खंडित होत असून, उपकेंद्रांच्या क्षमतेपेक्षा अधिक ठिकाणी वीज जोडणी दिली जात असल्यामुळे रोहित्रे नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडत असल्याचे सांगितले. या संदर्भात वीज कंपनीने नवीन उपकेंद्रांसाठी अकरा ठिकाणी शासकीय जागांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केल्याने त्यापैकी मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रुक, विराणे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी, येवला तालुक्यातील सावरगाव व सिन्नर तालुक्यातील सरदवाडी या पाच ठिकाणी शासकीय जमिनींचे हस्तांतरण करण्यात आले आहे. या जागांवर वीज कंपनीने कामे सुरू केली असून, जून अखेर कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांसमक्ष सांगण्यात आले; मात्र वीज कंपनीला शासकीय जागा एक रुपया आकारणीने देण्यात आलेली असली तरी, या शासकीय जमिनीचे शासकीय मूल्याइतकी कामे वीज कंपनीने त्या त्या भागात करणे जिल्हा प्रशासनाने बंधनकारक केले आहे. या जागांचे ताबे देताना घालून देण्यात आलेल्या अटी-शर्तींमध्येच ही बाब नमूद करण्यात आली असून, ज्या ठिकाणी शासकीय जागा वीज कंपनीने ताब्यात घेतली त्याठिकाणी विजेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मूलभूत सुविधा पुरविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. (वार्ताहर)