शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:51 IST

जिल्हा परिषदेच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले असून, वीज कंपनीविषयी ग्रामीण भागातील तक्रारींची दखल घेत या संदर्भात ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला.

ठळक मुद्देस्थायी समिती : कृषी खात्याच्या तक्रारींची दखल

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले असून, वीज कंपनीविषयी ग्रामीण भागातील तक्रारींची दखल घेत या संदर्भात ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान, कृषी खात्याच्या कामकाजाविषयी सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत कृषी खात्याच्या कार्यक्रमांची माहिती सदस्य, पदाधिकाºयांना देण्याच्या सूचनाही सांगळे यांनी दिल्या.स्थायी समितीच्या सभेत वीज कंपनीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे ग्रामीण भागात शेकडो विजेचे खांब पडून विजेच्या तारा तुटल्या आहेत. यातील काही पोल तर दोन वर्षांपूर्वीच वीज कंपनीने बसविले होते. असे पोल तुटून पडले तर जुने पोल तसेच कायम राहिल्याची तक्रार आत्माराम कुंभार्डे यांनी केली. भास्कर गावित यांनी पेठ तालुक्यासाठी वीज कंपनीने नवीन दोन हजार पोल दिल्याचे सांगण्यात आले; परंतु ते पोल कुठे बसविले, विजेच्या तारा कुठे गेल्या याचा पत्ताच लागला नसल्याचा आरोप केला. सभापती मनीषा पवार यांनी सौंदाणे गटात ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहेत, तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नसल्याचे सांगितले. त्यावर अध्यक्ष शीतल सांगळे यांनी गैरहजर असलेल्या वीज कंपनीच्या अधिकाºयांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. तसेच वीज कंपनीच्या तक्रारींची स्थानिक पातळीवर दखल घेतली जात नसल्याने थेट ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला.प्रभारी कृषी अधिकाºयांनी, जिल्ह्यात सतरा भरारी पथके गठित करण्यात आली असून, गुणवत्ता नियंत्रकदेखील असल्याचे सांगितले. शेतकºयांमध्ये या विषयांवर जनजागृती करण्यासाठी गावोगावी मेळावे घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतले.मेळावे घेताना त्याची माहिती सदस्य, पदाधिकाºयांनाच नसेल तर शेतकºयांना कसे कळते, असा सवाल केला.बियाणे, खतांबाबतसदस्यांची विचारणाकृषी खात्याच्या कामकाजाचा आढावा घेताना भास्कर गावित यांनी, सध्या पेरणीचे दिवस असून, काही कंपन्यांकडून शेतकºयांना बोगस बी-बियाणे, खतांची विक्री केली जाऊ शकते त्यावर कृषी खाते काय कार्यवाही करते अशी विचारणा केली. बाळासाहेब क्षीरसागर यांनी खराब बियाणांची विक्री करणाºया कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या कृषी खात्याला आहे काय? सध्या किती कंपन्या अशा प्रकारच्या बियाणांची विक्री करीत आहेत, असा सवाल केला.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदelectricityवीजagricultureशेती