शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:51 IST

जिल्हा परिषदेच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले असून, वीज कंपनीविषयी ग्रामीण भागातील तक्रारींची दखल घेत या संदर्भात ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला.

ठळक मुद्देस्थायी समिती : कृषी खात्याच्या तक्रारींची दखल

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले असून, वीज कंपनीविषयी ग्रामीण भागातील तक्रारींची दखल घेत या संदर्भात ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान, कृषी खात्याच्या कामकाजाविषयी सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत कृषी खात्याच्या कार्यक्रमांची माहिती सदस्य, पदाधिकाºयांना देण्याच्या सूचनाही सांगळे यांनी दिल्या.स्थायी समितीच्या सभेत वीज कंपनीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे ग्रामीण भागात शेकडो विजेचे खांब पडून विजेच्या तारा तुटल्या आहेत. यातील काही पोल तर दोन वर्षांपूर्वीच वीज कंपनीने बसविले होते. असे पोल तुटून पडले तर जुने पोल तसेच कायम राहिल्याची तक्रार आत्माराम कुंभार्डे यांनी केली. भास्कर गावित यांनी पेठ तालुक्यासाठी वीज कंपनीने नवीन दोन हजार पोल दिल्याचे सांगण्यात आले; परंतु ते पोल कुठे बसविले, विजेच्या तारा कुठे गेल्या याचा पत्ताच लागला नसल्याचा आरोप केला. सभापती मनीषा पवार यांनी सौंदाणे गटात ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहेत, तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नसल्याचे सांगितले. त्यावर अध्यक्ष शीतल सांगळे यांनी गैरहजर असलेल्या वीज कंपनीच्या अधिकाºयांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. तसेच वीज कंपनीच्या तक्रारींची स्थानिक पातळीवर दखल घेतली जात नसल्याने थेट ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला.प्रभारी कृषी अधिकाºयांनी, जिल्ह्यात सतरा भरारी पथके गठित करण्यात आली असून, गुणवत्ता नियंत्रकदेखील असल्याचे सांगितले. शेतकºयांमध्ये या विषयांवर जनजागृती करण्यासाठी गावोगावी मेळावे घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतले.मेळावे घेताना त्याची माहिती सदस्य, पदाधिकाºयांनाच नसेल तर शेतकºयांना कसे कळते, असा सवाल केला.बियाणे, खतांबाबतसदस्यांची विचारणाकृषी खात्याच्या कामकाजाचा आढावा घेताना भास्कर गावित यांनी, सध्या पेरणीचे दिवस असून, काही कंपन्यांकडून शेतकºयांना बोगस बी-बियाणे, खतांची विक्री केली जाऊ शकते त्यावर कृषी खाते काय कार्यवाही करते अशी विचारणा केली. बाळासाहेब क्षीरसागर यांनी खराब बियाणांची विक्री करणाºया कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या कृषी खात्याला आहे काय? सध्या किती कंपन्या अशा प्रकारच्या बियाणांची विक्री करीत आहेत, असा सवाल केला.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदelectricityवीजagricultureशेती