शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

वीज मंडळ कर्मचाऱ्यांचे पेन्शन देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:42 IST

गेल्या पंचवीस वर्षांपासून वीज मंडळाचे कर्मचारी व सेवानिवृत्त अभियंता आणि अन्य कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनाची मागणी करीत असून, शासन आणि आता कंपनी त्यासंदर्भात टाळाटाळ करीत आहे.

नाशिक : गेल्या पंचवीस वर्षांपासून वीज मंडळाचे कर्मचारी व सेवानिवृत्त अभियंता आणि अन्य कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनाची मागणी करीत असून, शासन आणि आता कंपनी त्यासंदर्भात टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे राज्य विद्युत मंडळ सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संघाच्या वतीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली अवमान याचिका दुरुस्तीसह दाखल करण्यात आली असून, ती अंतिम सुनावणीसाठी मंजूर झाली आहे. लवकरच त्यावर निर्णय होणार असल्याने सर्वांचे त्या याचिकेकडे लक्ष लागून आहे.विद्युत मंडळातील कर्मचाऱ्यांना १ एप्रिल १९९३ रोजी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली आहे. त्यात मंडळाच्या सेवेतून १ एप्रिल १९७४ नंतर निवृत्त होणाºया प्रत्येक कर्मचाºयाकरिता कोणत्याही भेदभावाशिवाय योजना अंमलात आणण्याचे ठरले होते. कारण मंडळाने १९९५ सालापासून लागू केलेली ईपीएस ९५ ही योजना कर्मचारी हिताची नसल्याने मंडळाने त्यापेक्षा चांगली योजना राबविण्याचा ठराव ३१ मे १९९७ रोजी संमत केला होता.राज्य शासनानेदेखील सर्व कायदेशीर बाजू पडताळल्यानंतर विधानसभेत २००१ मध्ये राज्य शासनाच्या धर्तीवर निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु त्यानंतर काहीच हालचाल न झाल्याने सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष बी. के. करंदीकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २०१७ मध्ये नागपूर खंडपीठाने यासंदर्भात तीन महिन्यांत जबाबदारीने निर्णय घेण्याचे आदेश दिले. परंतु यानंतरदेखील काहीच प्रतिसाद न मिळाल्याने करंदीकर यांनी अवमान याचिका दाखल केली. त्यावर वीज मंडळाकडे सूत्र असलेल्या कंपनीने बैठक घेऊन मंडळाच्या आर्थिक अडचणींचा बोजा राज्य सरकार घेण्यास तयार नसल्याने निवृत्तिवेतन देता येणार नाही, असा ठराव केला आहे त्यामुळे सर्व मुद्द्यांचा समावेश करून पुन्हा याचिका सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.अंतिम सुनावणीसाठी याचिकायाचिकाकर्त्याने न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा याचिका दाखल केली आहे. एस. एच. शुक्रे व एम. एस. मोडक यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली आणि त्यांनी अंतिम सुनावणीसाठी याचिका मंजूर केली आहे. शासनाचा आणि वीज कंपनीचा वेळकाढूपणा तसेच लालफितीचे धोरण यामुळे कंपनीचे कर्मचारी त्रस्त झाले असून, आता अंतिम सुनावणीकडे साºयांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीelectricityवीजCourtन्यायालय