शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

वीजप्रश्नी आक्रमक : राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प; पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:14 IST

नांदगावी शेतकºयांचा रास्ता रोको नांदगाव : वीजप्रश्नी तालुक्यातील पिंप्राळे वाखारी येथील शेतकºयांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे नांदगाव - मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वीज वितरण विभागाकडून थातूरमातूर उत्तर देत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेले. या पार्श्वभूमीवर वेळ झाल्याने व रहदारी जाम झाल्याने तोंडी आश्वासनावर आंदोलकांनी रस्ता सोडला.

ठळक मुद्देनांदगावी शेतकºयांचा रास्ता रोकोवीजप्रश्नी आक्रमक : राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

नांदगावी शेतकºयांचा रास्ता रोको

नांदगाव : वीजप्रश्नी तालुक्यातील पिंप्राळे वाखारी येथील शेतकºयांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे नांदगाव - मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वीज वितरण विभागाकडून थातूरमातूर उत्तर देत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेले. या पार्श्वभूमीवर वेळ झाल्याने व रहदारी जाम झाल्याने तोंडी आश्वासनावर आंदोलकांनी रस्ता सोडला.माजी नगरसेवक शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, बापूसाहेब कवडे यांनी भेट दिली. अर्धवट योजना बनवून शेतकºयांची सत्त्वपरीक्षा पाहणारी वस्तुस्थिती येथील रास्ता रोको आंदोलनात समोर आल्याने वीज वितरण विभागाचे पितळ उघडे पडले. थकबाकीचे कारण पुढे करून वीज पुरविण्याचे नाकारणाºया विभागाला एकही रुपया थकबाकी नसली तरी पूर्ण दाबाने वीजपुरवठा करू शकणार नाही याची कबुली द्यावी लागली. रब्बी हंगाम सुरू झाला असून, कांदा, गहू व इतर पिकांची लागवड सुरू आहे. विहिरींना पाणी आहे. मात्र २४ तासांत एक ते दोन तासच तो ही कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरीवर्गापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे संतप्त पिंप्राळे, वाखारी, हिंगणवाडी व इतर गावांच्या शेतकºयांनी रास्ता रोको केला. रजेवर गेलेल्या साळुंके यांच्या उपकार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त भार अशोक येवला यांच्याकडे असल्याने ते व सहाय्यक अभियंता गायत्री चव्हाण यांना आंदोलकांच्या रोषास सामोरे जावे लागले. शिवाजी पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष प्रदीप कासलीवाल यांनी दररोज किमान आठ तास अखंडित वीजपुरवठ्याची मागणी केली.वीज वितरण विभागाकडून बाजू मांडताना येवला व चव्हाण यांनी संजीवनी कृषी योजनेतील बिलाची रक्कम न भरणाºया शेतकरी ग्राहकाचा पुरवठा बंदच ठेवू तसेच बिले भरल्यानंतरही अखंडित वीजपुरवठ्याचे ठोस आश्वासन देऊ शकत नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला.यावेळी शेतकºयांना बिल भरण्यासाठी काही दिवसांची मुदत द्या. त्यानंतर ज्यांच्याकडे बाकी असेल ते वगळून इतराना सलग आठ तास वीजपुरवठा द्या, अशी मागणी पाटील व कासलीवाल यांनी केली. अधिकाºयांना फटकारलेशेतकºयांचे रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याची माहिती शिवसेना कार्यालयात पोहचताच आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हाप्रमुख सुहास कांदे, बापूसाहेब कवडे, तालुकाप्रमुख राजेंद्र जगताप, नगरसेवक किरण देवरे, बाजार समिती सभापती तेज कवडे, माजी सभापती विलास अहेर, एकनाथ सदगिर आदी आंदोलनप्रसंगी दाखल झाले. कांदे यांनी आक्र मक भूमिका घेऊन वीज वितरणाच्या प्रतिनिधींना शिवसेना स्टाइलने फटकारले.याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, नगरसेवक वाल्मीक टिळेकर आदी दाखल झाले व त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.