शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

संमेलनासाठी आता दिवाळीनंतरचा वायदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 01:47 IST

प्रस्तावित साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या ४० समित्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत संमेलन आयोजनाबाबत दिवाळीनंतरच्या तारखेसाठी तयारी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोना गेल्यानंतर तसेच दिवाळीनंतर संमेलन आयोजित करण्यास नाशिकचे पदाधिकारी इच्छुक असल्याचा निरोप साहित्य महामंडळाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : प्रस्तावित साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या ४० समित्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत संमेलन आयोजनाबाबत दिवाळीनंतरच्या तारखेसाठी तयारी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोना गेल्यानंतर तसेच दिवाळीनंतर संमेलन आयोजित करण्यास नाशिकचे पदाधिकारी इच्छुक असल्याचा निरोप साहित्य महामंडळाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबत तसे पत्र नाशिकच्या निमंत्रकांना पाठविले होते. मात्र,कोरोनाची स्थिती आणि तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याबाबत विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही मत या बैठकीत मांडण्यात आले. तसेच विविध समित्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या समितीच्या कामकाजाबाबतचा आढावादेखील सादर केला. तारीख निश्चित झाल्यास त्यानंतरच्या पंधरा दिवसात सर्व यंत्रणा सज्ज असेल असा विश्वासदेखील या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच संमेलनाचे आयोजन हे ऑनलाईन नकोच तर ऑफलाईनच व्हावे, याबाबतही यावेळी आग्रही भूमिका मांडण्यात आली. यावेळी प्रस्तावित साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नाशिककडून मिळणाऱ्या उत्तरावर संमेलन पुढे अजून काही काळ स्थगित करायचे की नाशिकचे संमेलन रद्दच करायचे, त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या आयोजकांकडून येणाऱ्या उत्तरावर संमेलनाबाबतचा पुढील निर्णय ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयावर साहित्य महामंडळ आणि त्याचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक