शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

संमेलनासाठी आता दिवाळीनंतरचा वायदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 01:47 IST

प्रस्तावित साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या ४० समित्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत संमेलन आयोजनाबाबत दिवाळीनंतरच्या तारखेसाठी तयारी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोना गेल्यानंतर तसेच दिवाळीनंतर संमेलन आयोजित करण्यास नाशिकचे पदाधिकारी इच्छुक असल्याचा निरोप साहित्य महामंडळाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : प्रस्तावित साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या ४० समित्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत संमेलन आयोजनाबाबत दिवाळीनंतरच्या तारखेसाठी तयारी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोना गेल्यानंतर तसेच दिवाळीनंतर संमेलन आयोजित करण्यास नाशिकचे पदाधिकारी इच्छुक असल्याचा निरोप साहित्य महामंडळाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबत तसे पत्र नाशिकच्या निमंत्रकांना पाठविले होते. मात्र,कोरोनाची स्थिती आणि तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याबाबत विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही मत या बैठकीत मांडण्यात आले. तसेच विविध समित्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या समितीच्या कामकाजाबाबतचा आढावादेखील सादर केला. तारीख निश्चित झाल्यास त्यानंतरच्या पंधरा दिवसात सर्व यंत्रणा सज्ज असेल असा विश्वासदेखील या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच संमेलनाचे आयोजन हे ऑनलाईन नकोच तर ऑफलाईनच व्हावे, याबाबतही यावेळी आग्रही भूमिका मांडण्यात आली. यावेळी प्रस्तावित साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नाशिककडून मिळणाऱ्या उत्तरावर संमेलन पुढे अजून काही काळ स्थगित करायचे की नाशिकचे संमेलन रद्दच करायचे, त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या आयोजकांकडून येणाऱ्या उत्तरावर संमेलनाबाबतचा पुढील निर्णय ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयावर साहित्य महामंडळ आणि त्याचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक