शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आदिवासी विकासमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा, आज उपोषण संपणार? सातव्या दिवशीही ‘बिऱ्हाड’ कायम

By admin | Updated: March 4, 2015 01:15 IST

आदिवासी विकासमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा, आज उपोषण संपणार? सातव्या दिवशीही ‘बिऱ्हाड’ कायम

  नाशिक : महाराष्ट्र राज्य तासिका / मानधन शिक्षक स्त्री अधिक्षिका वर्ग-४ कर्मचारी संघटनेचे गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरूच असून, काल (दि.३) सातव्या दिवशीही कायम होते. दरम्यान, काल (दि.३) दुपारी आंदोलनकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाची आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, बुधवारी (दि.४) यासंदर्भात लेखी आश्वासन मिळताच हे बेमुदत आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या सहा दिवसांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभागासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यांना मंगळवारी (दि.३) आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्यासोबत चर्चा करण्याबाबत विभागाने लेखी कळविले होते. त्यानुसार आंदोलनकर्त्यांचे एक शिष्टमंडळ काल सकाळीच मुंबईला रवाना झाले. मंत्रालयात आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्यासह प्रधानसचिव राजगोपाल देवरा व प्रशासन अधिकारी संतोष ठुबे आदिंशी शिष्टमंडळातील एस. पी. गावित, केशव ठाकरे, बबीता पाडवी, सुनीता तडवी, संदीप भाबड, रितेश ठाकूर, भगतसिंग पाडवी, कमलाकर पाटील आदिंनी चर्चा केली. त्यात विष्णु सावरा यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत शासनाचा सकारात्मक विचार असून, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दुसऱ्यांदा ठेवल्याचे सांगितले. तसेच अतिदुर्गम भागात आपण काम करतात याची जाणीव असून, आपल्याला स्थानिक भाषाही अवगत असल्याने आपलाच विचार करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे शिष्टमंडळ रात्री उशिरा नाशिकला परतले. बुधवारी (दि.४) यासंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात येणार असल्याचे कळते. मात्र काल सातव्या दिवशीही बिऱ्हाड आंदोलन सुरूच होते. (प्रतिनिधी)