शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकसंख्या तीन लाख, सफाई कर्मचारी अवघे ११० पंचवटी आरोग्य विभाग : लोकसंख्येनुसार मनुष्यबळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:29 IST

नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागातील सहाही प्रभागांची साफसफाई करण्याची जबाबदारी बोटावर मोजण्याइतकी म्हणजे केवळ ११० कर्मचाºयांवर असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देमनुष्यबळ वाढविण्याची नितांत गरज आरोग्य विभागाचा खरपूस समाचार

पंचवटी : नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागातील सहाही प्रभागांची साफसफाई करण्याची जबाबदारी बोटावर मोजण्याइतकी म्हणजे केवळ ११० कर्मचाºयांवर असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. पंचवटीची लोकसंख्या जवळपास तीन लाखांवर पोहचली आहे आणि मनपा प्रशासनाकडे अद्याप पुरेसे मनुष्यबळ नसल्याने लोकसंख्येच्या मानाने सफाई कर्मचाºयांचे मनुष्यबळ वाढविण्याची नितांत गरज आहे.तीन लाख लोकसंख्येचा विचार केला तर सरासरी दहा हजार माणसांमागे केवळ चार सफाई कर्मचारी असल्याचे सफाई कर्मचाºयांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पंचवटी प्रभागाच्या बैठकीत वारंवार सफाई कर्मचाºयांची अपुरी संख्या असल्याने सफाई कर्मचारी येत नाहीत, संपूर्ण प्रभागात केवळ एक, तर काही ठिकाणच्या प्रभागात सफाई कर्मचारीच नसल्याची ओरड नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या पंचवटी प्रभागाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी करून आरोग्य विभागाचा खरपूस समाचार घेतला होता. मनपा आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांची संख्या लक्षात घेतली तर चार सदस्य असलेल्या एका प्रभागात १८ कर्मचारी कार्यरत आहेत. यातही काही कर्मचारी गैरहजर असतात. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाºयांवर कामाचा वाढीव बोजा पडत आहे.पंचवटी विभागाची लोेकसंख्या तीन लाखांच्या पुढे असून, परिसराची साफसफाई करण्यासाठी किमान ७५० ते ८०० सफाई कर्मचाºयांची गरज आहे. मात्र सध्या प्रशासनाने केवळ ११० कर्मचाºयांकडेच स्वच्छतेची जबाबदारी देण्यात धन्यता मानली आहे. विशेष म्हणजे, पंचवटी परिसराचा काही भाग गावठाण असल्याने त्या भागात कायमच स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. पंचवटी विभागात सफाई कर्मचारी संख्या बोटावर मोजण्याइतकीच असल्याने रस्त्यावर झाडू मारणारे तसेच धार्मिक स्थळे असलेल्या परिसराची स्वच्छता नियमित होत नसल्याचे दिसून येते.