शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डाळिंब उत्पादनाची ख्याती होतेय लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:25 IST

दाभाडी : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, आजाराचा प्रादुर्भाव यामुळे अनेक वर्षांपासून परिसराची डाळिंब उत्पादक म्हणून असलेली ख्याती ...

ठळक मुद्देहवामान बदलाचा परिणाम : दाभाडीची ओळख पुसण्याची भीती

दाभाडी : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, आजाराचा प्रादुर्भाव यामुळे अनेक वर्षांपासून परिसराची डाळिंब उत्पादक म्हणून असलेली ख्याती लुप्त होऊ पाहत आहे. संपूर्ण भारतात डाळिंब उत्पादनाने दाभाडीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातासमुद्रापार दाभाडीचे डाळिंब उत्पादनात नाव होते. सध्या डाळिंबाचे उत्पादन घटल्याने हा भाग आपली ओळख विसरतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे.दाभाडीत रोजगार नसल्याने स्थानिक मजुरांना उदरनिर्वाहासाठी बाहेरील राज्यात जावे लागत आहे. दाभाडीत एकेकाळी शेकडो मजूर कामाला येत. बाहेरून येऊन मजुरी करीत. मात्र आज तेथील भूमिपुत्रच मजुरीसाठी वणवण फिरताना दिसत असल्याची शोेकांतिका आहे.पंचक्र ोशीतील शेतकऱ्याची प्रयोगशील शेतकरी अशी ओळख होती. नवनवीन प्रयोग करून यशस्वी होण्याची परंपरा येथील शेतकऱ्यांनी जपली आहे. ऊस, डाळिंब उत्पादन व प्रत टिकवण्यात येथील शेतकºयांचा हात कोणीच धरू शकत नाही. एकरी १०० टन उसाचे उत्पादन येथे काढण्यात आलेले आहे, तर डाळिंबमध्ये एकरी ५ लाखांपर्यंत उत्पादन घेतले आहे. त्यामुळे राज्यातून किंवा परराज्यातील अनेक व्यापारी मजूर येथे कामानिमित्त येत असत. काही तर येथे कायमचे रहिवासी झाले. स्वत:चे घरदार करून आपला संसार येथेच थाटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, लहरी निसर्ग व नानाविध आजारांचा प्रादुर्भाव यामुळे येथील डाळिंब शेती अखेरचा श्वास घेत आहे. त्याचा सरळ परिणाम दाभाडीच्या अर्थकारणावर झाला आहे. याचा मोठा फटका मजूर वर्गाला बसत आहे. तर डाळिंब उत्पादकांना कोणते पर्यायी पीक घ्यावे, याची चिंता सतावत आहे. येथील भूमिपुत्र डाळिंब पॅकिंगसाठी कधी संगमनेर तर कधी बारामती येथे जाताना दिसतो. आता तर थेट राजस्थान, गुजरातलाच पॅकिंग किंवा डाळिंब छाटणीच्या कामासाठी जात आहे. आता बॉक्सचा दाम ठरवून मजुरी मिळते. पंधरा-पंधरा दिवस गावापासून, घरापासून कामानिमित्त बाहेरगावी जावे लागत आहे. त्यामुळे पुन्हा दाभाडीत मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड होऊन या भागाला सुबत्ता कधी येईल अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी