शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी डाळिंबबागेवर कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:41 IST

मानोरी : दुष्काळी स्थितीमुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत असतानाच शेतकऱ्यांना डाळिंबबागाही जगवणे अवघड होऊन बसले आहे. भूजल पातळीत सातत्याने घट होत असताना विहिरीत दररोज पाण्याचा साठा करून ४२ अंश इतक्या तापमानात डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र शेळके यांनी आपल्या तब्बल दोन एकर डाळिंबाच्या बागेवर कुºहाड चालवत बाग भुईसपाट केला आहे.

मानोरी : दुष्काळी स्थितीमुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत असतानाच शेतकऱ्यांना डाळिंबबागाही जगवणे अवघड होऊन बसले आहे. भूजल पातळीत सातत्याने घट होत असताना विहिरीत दररोज पाण्याचा साठा करून ४२ अंश इतक्या तापमानात डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र शेळके यांनी आपल्या तब्बल दोन एकर डाळिंबाच्या बागेवर कुºहाड चालवत बाग भुईसपाट केला आहे. या दोन एकर बागेत एकूण सातशे पन्नास डाळिंबाची झाडे होती.जमिनीतील भूजल पातळीत कमालीची घट होत गेल्याने बागेला पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या दोन डाळिंबाच्या बागेवर उघड्या डोळ्यादेखत कुºहाड चालविण्याची नामुष्की शेतकºयावर ओढावली असून, मोठ्या अपेक्षेने डाळिंबबाग पिकवून दर्जेदार उत्पादन घेण्याच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले आहे. ऐन दुष्काळात लाखो रु पयांचा खर्च आणि मेहनत वाया गेल्याची खंत शेतकरी राजेंद्र शेळके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जमिनीची पाण्याविना धूप होऊ लागल्याने कडक उन्हामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही वेळी अचानक वातावरणात सातत्याने झालेल्या बदलाचादेखील परिणाम डाळिंबबाग, द्राक्षबाग, तसेच खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवर झाल्याचे आढळून आले आहे. त्यात डिसेंबर महिन्यात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ येथील शेतकऱ्यांचे भवितव्य दुष्काळी स्थितीमुळे यंदा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून होते. परंतु पाणी वाटपाचे नियोजन न झाल्याने खडकीमाळ येथील वितरिका क्र मांक २५ ला पाणी न पोहोचल्याने पालखेड आवर्तनापासून शेतकरी वंचित राहिले. त्यामुळे शेतातील विहीर, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली.कोट....दोन महिन्यापासून उष्णता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढल्याने डाळिंबबागेला पुरेसे पाणी मिळत नव्हते. तीन दिवसांपासून तापमानाने चाळिशी पार केल्याने डाळिंबबाग अचानक सुकू लागली. परिणामी मला माझ्या तीन एकर डाळिंबबागेवर कुºहाड चालविण्याची वेळ आली.- राजेंद्र शेळके, शेतकरी, मानोरी 

टॅग्स :Nashikनाशिक