शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कुंभमेळ्यात गोदाप्रदूषण

By admin | Updated: April 7, 2016 23:55 IST

‘मंत्राज’चा अहवाल : धोक्याची पातळी ओलांडली

 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गोदावरीचे पात्र प्रदूषित झाले नाही, असा अहवाल राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सादर करण्यात आला होता; मात्र ‘मंत्राज’ या खासगी संस्थेनेही कुंभमेळ्याच्या कालावधीत गोदावरीच्या पाण्याचे नमुने तपासले होते. या अहवालानुसार गोदा प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचा निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे. या अहवालाची प्रत सर्वच शासकीय कार्यालयीन प्रमुखांना सादर करण्यात येणार असल्याची माहितीही कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. उमेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गोदापात्रात लाखो भाविकांनी स्नान करूनही गोदावरीचे जल प्रदूषण झाले नाही, असा अहवाल प्रदूषण मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला होता. सदर अहवाल सिंहस्थ कुंभमेळा झाल्यानंतर काही दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला होता. या अहवालानुसार कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषित झाली नाही, असा निष्कर्ष प्रदूषण मंडळाकडून काढण्यात आला होता. मंत्राज ग्रिन रिसोर्सेस या खासगी कंपनीच्या विशेष पथकाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जल, ध्वनी आणि वायू प्रदूषणाची पडताळणी शहरात केली होती. गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता व दर्जा यांचे मूल्यमापन करण्यासाठी कंपनीच्या पथकाने चार ठिकाणांहून २४ पाण्याचे नमुने तपासले. १३ आॅगस्ट २०१५ ते ५ आॅक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये गंगापूर धरण, अहल्यादेवी होळकर पूल, रामकूंड, तपोवन या चार ठिकाणांची जल प्रदूषणाचे नमुने तपासण्यासाठी निवड केली होती. शास्त्रीय पद्धतीने शासकीय निकषानुसार पाण्याचे नमुने तपासण्यात आल्याची माहिती यावेळी अभियानाचे प्रमुख डॉ. एन. सी. कंकाल यांनी दिली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात मिसळत असून, त्याअनुषंगाने काही घातक रासायनिक द्रव्यही आढळून आल्याचे ते म्हणाले. नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्याच्या गटारी नदीपात्रात येणार नाही, याबाबत चोख उपाययोजना करणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष संस्थेने काढला आहे.