शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

कुंभमेळ्यात गोदाप्रदूषण

By admin | Updated: April 7, 2016 23:55 IST

‘मंत्राज’चा अहवाल : धोक्याची पातळी ओलांडली

 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गोदावरीचे पात्र प्रदूषित झाले नाही, असा अहवाल राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सादर करण्यात आला होता; मात्र ‘मंत्राज’ या खासगी संस्थेनेही कुंभमेळ्याच्या कालावधीत गोदावरीच्या पाण्याचे नमुने तपासले होते. या अहवालानुसार गोदा प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचा निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे. या अहवालाची प्रत सर्वच शासकीय कार्यालयीन प्रमुखांना सादर करण्यात येणार असल्याची माहितीही कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. उमेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गोदापात्रात लाखो भाविकांनी स्नान करूनही गोदावरीचे जल प्रदूषण झाले नाही, असा अहवाल प्रदूषण मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला होता. सदर अहवाल सिंहस्थ कुंभमेळा झाल्यानंतर काही दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला होता. या अहवालानुसार कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषित झाली नाही, असा निष्कर्ष प्रदूषण मंडळाकडून काढण्यात आला होता. मंत्राज ग्रिन रिसोर्सेस या खासगी कंपनीच्या विशेष पथकाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जल, ध्वनी आणि वायू प्रदूषणाची पडताळणी शहरात केली होती. गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता व दर्जा यांचे मूल्यमापन करण्यासाठी कंपनीच्या पथकाने चार ठिकाणांहून २४ पाण्याचे नमुने तपासले. १३ आॅगस्ट २०१५ ते ५ आॅक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये गंगापूर धरण, अहल्यादेवी होळकर पूल, रामकूंड, तपोवन या चार ठिकाणांची जल प्रदूषणाचे नमुने तपासण्यासाठी निवड केली होती. शास्त्रीय पद्धतीने शासकीय निकषानुसार पाण्याचे नमुने तपासण्यात आल्याची माहिती यावेळी अभियानाचे प्रमुख डॉ. एन. सी. कंकाल यांनी दिली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात मिसळत असून, त्याअनुषंगाने काही घातक रासायनिक द्रव्यही आढळून आल्याचे ते म्हणाले. नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्याच्या गटारी नदीपात्रात येणार नाही, याबाबत चोख उपाययोजना करणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष संस्थेने काढला आहे.