शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वसाका भाडेतत्त्वावर देण्यामागे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 17:53 IST

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना २५ वर्षांसाठी भाडे तत्वावर चालविण्यास देण्यामागे राज्य सहकारी बँकेचे प्रशासन, राज्याचे सहकारमंत्री, आमदार डॉ. राहुल आहेर यांची मोठी राजकीय खेळी असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, सभासद व कामगारांनी वेळीच जागे होऊन सदरचा करार रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन माजी आमदार तथा वसाकाचे माजी अध्यक्ष शांताराम आहेर यांनी पत्रकार परिषदेत केले.

वसाका भाडे तत्वावर चालविण्यास देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. वसाकाच्या प्राप्त परिस्थितीनुसार व सहवीजनिर्मिती प्रकल्पातूनच येणाऱ्या पैशांच्या माध्यमातून वसाकाचे सर्व कर्ज अवघ्या सात ते आठ वर्षात फिटणार असताना वसाका २५ वर्षांसाठी भाडे तत्वावर चालविण्यास देणे म्हणजे सभासदांची, ऊस उप्तादकाची धूळफेक करण्याचा डाव आहे. यासाठी सर्व सुज्ञ, जाणकार सभासदांनी व ऊस उत्पादकांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन तीव्र लढा उभारावा व वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी ठेवावी , असे आवाहन आहेर यांनी केले. मागील तीन वर्षात दोनवेळा गळीत हंगाम चालवीत असताना प्राधिकृत मंडळ व कार्यकारी संचालकाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कारखान्यावर ४० कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहिला असून त्यास सर्वस्वी विद्यमान प्राधिकृत मंडळच जबाबदार आहे, असा थेट आरोप आहेर यांनी केला. सहकार कायद्यानुसार कोणत्याही प्राधिकृत मंडळाला प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी सत्तेत राहण्याचा अधिकार नसताना राज्य शासनाच्या मेहरबानीने गेल्या तीन वर्षांपासून हे प्राधिकृत मंडळ कारखान्याचा कार्यभार कसा पाहत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वसाका भाडे तत्वावर चालविण्यास देण्याचा महत्वाचा निर्णय ठरलेला असताना जाहीरपणे कुठेही सर्वसाधारण सभेची नोटीस प्रसिद्धीस देण्यात आलेली नव्हती तसेच घाईगर्दीत मोजक्याच व मर्जीतल्या सभासदांना बोलावून भाडे तत्वावर चालविण्यास देण्याचा ठराव एकतर्फी करून घेतला असून सदरची सर्वसाधारण सभा ही बेकायदेशीर असल्याचे आहेर यांनी सांगितले. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मोजके सक्षम ऊस उत्पादक, सभासद व हितचिंतक यांच्या माध्यमातून व स्वत:च्या मालकीची जमीन तारण देऊन चालवावा जेणेकरून कारखान्याची मालकी शाबूत राहील व कर्जही लवकरात लवकर फिटण्यास मदत होणार असल्याने याबाबत आपण मागणी केली होती. मात्र त्याबाबत हेतुपुरस्कार बोळवण करण्यात आल्याचे आहेर यांनी सांगितले.याप्रसंगी वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर आदी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती