शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

वसाका भाडेतत्त्वावर देण्यामागे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 17:53 IST

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना २५ वर्षांसाठी भाडे तत्वावर चालविण्यास देण्यामागे राज्य सहकारी बँकेचे प्रशासन, राज्याचे सहकारमंत्री, आमदार डॉ. राहुल आहेर यांची मोठी राजकीय खेळी असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, सभासद व कामगारांनी वेळीच जागे होऊन सदरचा करार रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन माजी आमदार तथा वसाकाचे माजी अध्यक्ष शांताराम आहेर यांनी पत्रकार परिषदेत केले.

वसाका भाडे तत्वावर चालविण्यास देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. वसाकाच्या प्राप्त परिस्थितीनुसार व सहवीजनिर्मिती प्रकल्पातूनच येणाऱ्या पैशांच्या माध्यमातून वसाकाचे सर्व कर्ज अवघ्या सात ते आठ वर्षात फिटणार असताना वसाका २५ वर्षांसाठी भाडे तत्वावर चालविण्यास देणे म्हणजे सभासदांची, ऊस उप्तादकाची धूळफेक करण्याचा डाव आहे. यासाठी सर्व सुज्ञ, जाणकार सभासदांनी व ऊस उत्पादकांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन तीव्र लढा उभारावा व वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी ठेवावी , असे आवाहन आहेर यांनी केले. मागील तीन वर्षात दोनवेळा गळीत हंगाम चालवीत असताना प्राधिकृत मंडळ व कार्यकारी संचालकाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कारखान्यावर ४० कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहिला असून त्यास सर्वस्वी विद्यमान प्राधिकृत मंडळच जबाबदार आहे, असा थेट आरोप आहेर यांनी केला. सहकार कायद्यानुसार कोणत्याही प्राधिकृत मंडळाला प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी सत्तेत राहण्याचा अधिकार नसताना राज्य शासनाच्या मेहरबानीने गेल्या तीन वर्षांपासून हे प्राधिकृत मंडळ कारखान्याचा कार्यभार कसा पाहत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वसाका भाडे तत्वावर चालविण्यास देण्याचा महत्वाचा निर्णय ठरलेला असताना जाहीरपणे कुठेही सर्वसाधारण सभेची नोटीस प्रसिद्धीस देण्यात आलेली नव्हती तसेच घाईगर्दीत मोजक्याच व मर्जीतल्या सभासदांना बोलावून भाडे तत्वावर चालविण्यास देण्याचा ठराव एकतर्फी करून घेतला असून सदरची सर्वसाधारण सभा ही बेकायदेशीर असल्याचे आहेर यांनी सांगितले. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मोजके सक्षम ऊस उत्पादक, सभासद व हितचिंतक यांच्या माध्यमातून व स्वत:च्या मालकीची जमीन तारण देऊन चालवावा जेणेकरून कारखान्याची मालकी शाबूत राहील व कर्जही लवकरात लवकर फिटण्यास मदत होणार असल्याने याबाबत आपण मागणी केली होती. मात्र त्याबाबत हेतुपुरस्कार बोळवण करण्यात आल्याचे आहेर यांनी सांगितले.याप्रसंगी वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर आदी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती