शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

राजकीय स्वार्थापोटी गावांचा विकास होत नाही : मकरंद अनासपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:37 IST

सुरगाणा : राजकीय स्वार्थापोटी गावांचा विकास होत नसल्याने पाणीटंचाईवर मात करायची असेल तर त्यात राजकारण चालणार नाही. त्यासाठी संपूर्ण गावाची एकजूट असावी लागते, असे प्रतिपादन नाम फाउण्डेशनचे संस्थापक तथा सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. तालुक्यातील बा-हे येथील जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते ...

सुरगाणा : राजकीय स्वार्थापोटी गावांचा विकास होत नसल्याने पाणीटंचाईवर मात करायची असेल तर त्यात राजकारण चालणार नाही. त्यासाठी संपूर्ण गावाची एकजूट असावी लागते, असे प्रतिपादन नाम फाउण्डेशनचे संस्थापक तथा सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. तालुक्यातील बा-हे येथील जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  नाम फाउण्डेशन राजकीय नसल्याने सर्व कामे पूर्ण होतील. आज नाना पाटेकरदेखील येणार होते. महाराष्ट्रात नाम फाउण्डेशनकडून कार्य सुरू आहे. व्यस्त कामामुळे ते येऊ शकले नाहीत. यावेळी अनासपुरे म्हणाले की, मला माफ करा पण टिळा लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर माझा विश्वास नाही. त्यावर काही उदाहरणे त्यांनी दिली. गावोगावी शिक्षणाची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत विकास घडून येणार नाही. आयुष्याचे सार कळल्यावर जीवन सुखमय व्यतीत होते. खास शैलीत बोलताना अनासपुरे यांनी उपस्थित सर्वांनाच खळखळून हसवत ज्यावेळी मुली शिकतील तेव्हा समाजाचे कल्याण होईल, असे सांगून मुलांना शिक्षण घेऊन पुढे जाण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनासपुरे यांनी नामतर्फेपाच लाख रुपयांची मदत स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजला जाहीर केली.  यावेळी गोपाळराव धूम नामकडून उपस्थित मुंबईचे उपायुक्त यशवंत मोरे व प्राचार्य तथा कवी राजेंद्र उगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्नल सहानी, राजीव सावंत, अमित खळे, सोनालीराजे पवार, भारती पवार, इंद्रजित गावित, बी.पी. महाले, कुसळकर, मनीषा महाले, नगरसेवक दीपक थोरात, रमेश थोरात आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरे