शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राजकीय पक्षांची ईव्हीएम उदासीनता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:18 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवीन इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी बॅलेट व कंट्रोल युनिट पाठविले असून, नव्याने दाखल होणाऱ्या या यंत्राबाबत सर्वच राजकीय पक्षांना माहिती देण्यास निवडणूक आयोग उत्सुक असले तरी राजकीय पक्षांची मात्र उदासीनता कायम असल्याचे निदर्शनास आले आहे.

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवीन इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी बॅलेट व कंट्रोल युनिट पाठविले असून, नव्याने दाखल होणाऱ्या या यंत्राबाबत सर्वच राजकीय पक्षांना माहिती देण्यास निवडणूक आयोग उत्सुक असले तरी राजकीय पक्षांची मात्र उदासीनता कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व त्यापाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीत एकाच राजकीय पक्षाला बहुमत मिळत असल्यामुळे सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यावर आक्षेप घेत सदरच्या मतदान यंत्रांबरोबर छेडछाड होत असल्याचा आरोप सुरू केला आहे. यासंदर्भात न्यायालयातही दाद मागण्यात आली असून, यापुढच्या निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.  आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने नाशिक जिल्ह्यासाठी ९२४४ बॅलेट युनिट व ५४७९ कंट्रोल युनिट बंगळुरू येथून उपलब्ध करून दिले असून, स्ट्रॉँगरूममध्ये सदरची यंत्रे ठेवण्यापूर्वी ती प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमक्ष ठेवली जावी, असे आयोगाचे आदेश असल्याने गेल्या शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवडणूक शाखेने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शुक्रवारी सकाळी दहा वाजता अंबडच्या सेंट्रल वेअर हाऊस येथे मतदान यंत्रे उतरताना हजर राहण्याची विनंती केली होती. परंतु कॉँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड वगळता एकाही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी यावेळी हजर राहू शकला नाही.उलट सत्ताधारी पक्षाच्या एका जिल्हास्तरीय नेत्याने तर मतदान यंत्रे आहेत की भुसा भरलेल्या पेट्या असा सवाल करून निवडणूक शाखेच्या निमंत्रणाला केराची टोपली दाखविण्यात धन्यता मानली आहे. एकीकडे मतदान यंत्रावर शंका उपस्थित करून संपूर्ण यंत्रणेला आरोपीच्या पिंजºयात उभे करायचे व दुसरीकडे यंत्रांच्या सत्यतेची माहिती जाणून घेण्याबाबत उदासीनता दाखवायची, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे.जुनी मतदान यंत्रे भंगारातराजकीय पक्षांचा ईव्हीएमवर असलेला आक्षेप पाहता तो एकप्रकारे निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यासारखे असल्यामुळे त्यातून मान सोडून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आजवर वापरण्यात आलेल्या सर्व जुनी मतदान यंत्रे भंगारात काढून नवीन अद्ययावत यंत्रे तसेच त्याला व्हीव्हीपॅट जोडण्याचा निर्णय घेतला आहे.  सर्वच विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यावर आक्षेप घेत सदरच्या मतदान यंत्रांबरोबर छेडछाड होत असल्याचा आरोप सुरू केला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण