शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

उमेदवारांच्या कोलांटउड्यांनी राजकीय पक्ष हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 01:01 IST

पाच वर्षे जनहित, सामान्यांचे प्रश्न, विकासाचे राजकारण, पारदर्शकता, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता अशा मुद्यांची माळ जपणाऱ्या राजकीय पक्षांची हतबलता नगरपंचायत निवडणुकीत दिसून आली. महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते राजकीय पक्षांना झुकवत असल्याचे प्रसंगी पक्षीय उमेदवारी लाथाडून अपक्ष उमेदवारी केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. जात, धर्म व पैसा याला महत्त्व देत मतदारानुनयी भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे मोजक्या कुटुंबांच्या हातात नगरपंचायतीची सत्ता केंद्रित राहण्याची परंपरा कायम राहील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसहा नगरपंचायतींची रणधुमाळी शिगेला पोहोचली भाकरी फिरविण्याची वेळ उमेदवार येऊ देत नाही

बेरीज वजाबाकीमिलिंद कुलकर्णीबेसावध पक्ष, महत्त्वाकांक्षी उमेदवार

कळवण, देवळा, दिंडोरी, निफाड, पेठ व सुरगाणा या सहा नगरपंचायतींची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी मतदान होत असून, २९ दिवसांनी निकाल कळणार आहे. तत्पूर्वी निवडणुका स्थगित ठेवलेल्या ओबीसींच्या ११ जागांवर १८ जानेवारी रोजी निवडणूक होईल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावर कोणत्याच निवडणुका होणार नाही, अशा मनोभूमिकेत असलेल्या राजकीय पक्षांची सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य निवडणूक आयोगाने केलेली त्याची अंमलबजावणी पाहता गोची झाली आहे. बेसावध असताना या निवडणुका जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तारांबळ उडाली. सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात यश आलेले नाही, हा त्याचा दृश्य परिणाम आहे.

सर्व जागांवर उमेदवार नाहीगाव तेथे शाखा, शतप्रतिशत, वन बुथ टेन युथ, पन्ना प्रमुख असे संघटनात्मक उपक्रम पाच वर्षे राबविणाऱ्या राजकीय पक्षांना सर्व जागांवर उमेदवार मिळू नये, यावरून अभियानामधील फोलपणा स्पष्ट होतो. ८७ जागांसाठी मतदान होत आहे. त्यापैकी भाजप : ७८, राष्ट्रवादी कॉंग्रेस : ६१, कॉंग्रेस : ३३, शिवसेना : ४६ जागा लढवत आहे. दिंडोरीत काँग्रेसचे २ व शिवसेनेचे ८ उमेदवार असून, त्यांनी आघाडी केली आहे.

उमेदवारांपुढे पक्ष हतबलभाकरी फिरवली नाही तर करपते, हे तत्त्व राजकारणात हमखास लावले जात असले तरी आता भाकरी फिरविण्याची वेळ उमेदवार येऊ देत नाही, ते चूल बदलायला मागेपुढे पाहत नाही. या निवडणुकीत हे प्रामुख्याने दिसले. राजकीय पक्षांचा उमेदवारांवर भरवसा नाही आणि उमेदवारांचा पक्ष व नेत्यांवर विश्वास उरलेला नाही. राजकीय कोलांटउड्या आणि नेत्यांनी नातेवाईक, स्वीय सहायकांना दिलेली उमेदवारी हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष अशी जबाबदारीची पदे भूषविलेले कार्यकर्ते उमेदवारीसाठी रात्रीतून पक्ष बदलताना दिसून आले. निष्ठा, बांधिलकी हे शब्द राजकारणातून हद्दपार होत आहे, हे त्याचेच निदर्शक आहे.

महिला उमेदवारांचा दबदबाया निवडणुकीत महिला उमेदवारांचा दबदबा आहे. एकूण २९२ उमेदवारांपैकी १६० महिला उमेदवार रिंगणात आहेत. पुरुष उमेदवार १३२ आहेत. ११ ठिकाणी महिला उमेदवार या पुरुष उमेदवारांविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतानाही त्यापेक्षा अधिक महिला उमेदवार उभे राहणे, स्त्रीसशक्तीकरणाच्यादृष्टीने स्वागतार्ह पाऊल आहे. अर्थात या सर्वसामान्य महिला किती आणि प्रस्थापित कुटुंबातील महिला किती हादेखील शोध घ्यायला हवा. पेठमध्ये २३४५ महिला मतदार, तर पुरुष मतदार त्यापेक्षा कमी म्हणजे २२९१ आहेत. कळवणमध्ये पुरुष : ७८३५, तर महिला : ७५६८ मतदार, निफाडमध्ये पुरुष : ८६६२, महिला : ८५११ मतदार आहेत. याचा परिणाम असू शकतो. 

टॅग्स :Nashikनाशिक