शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

निवडणुकीपूर्वी मतदान प्रतिनिधी नेमण्याची राजकीय पक्षांना सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:16 IST

उल्लंघन केल्यानंतर निवडणूक काळात राजकीय पक्षांना तक्रार करण्याची कोणतीही सोय आयोग ठेवू इच्छित नाही. देशपातळीवर आयोगाने सप्टेंबर महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबवून नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्याबरोबरच, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी विविध प्रकारचे अर्ज मतदारांकडून भरून घेतले

ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी नको गोंधळ : याद्या तपासून घेण्याच्या सूचना

नाशिक : मतदानाच्या दिवशी मतदार यादीत नाव नाही, मागच्या वेळी होते, आता नाही असे म्हणून मतदानापासून निवडणूक आयोगाने वंचित ठेवल्याचा ठपका बसू नये म्हणून निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वीच स्वत:ची बाजू सावरण्याचा प्रयत्न चालविला असून, मतदान केंद्रनिहाय शासकीय बीएलओ नेमण्यात आल्यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्षानेदेखील केंद्रनिहाय मतदान प्रतिनिधी नेमण्याची सक्ती केली आहे. राजकीय पक्षांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी अशी यादी सुपूर्द करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन केल्यानंतर निवडणूक काळात राजकीय पक्षांना तक्रार करण्याची कोणतीही सोय आयोग ठेवू इच्छित नाही.देशपातळीवर आयोगाने सप्टेंबर महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबवून नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्याबरोबरच, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी विविध प्रकारचे अर्ज मतदारांकडून भरून घेतले आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर आयोगाने त्यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या, परंतु यादी पाहण्याकडे मतदार व राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले, परिणामी हरकती व सूचना आल्या नाहीत. आता जानेवारीत आयोग अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार असून, त्यावर आधारितच लोकसभेला मतदारांना मतदान करता येणार आहे. ही मतदार यादी बिनचूक असावी यासाठी आयोगाचा प्रयत्न असून, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या बीएलओंकडून ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन तपासून घेतल्या जाणार आहेत. त्याच धर्तीवर राजकीय पक्षांनीदेखील प्रत्येक मतदान केंद्रनिहाय बीएलओ नेमून याद्यांची खात्री करून घ्यावी, असे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना तशा सूचना देऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षाच्या शहर, जिल्हाध्यक्षांना पत्र देऊन त्यांच्याकडून मतदान प्रतिनिधींची नावे मागविली आहेत. राजकीय पक्षांच्या मतदान प्रतिनिधींनी या याद्या आत्ताच तपासून त्यातील दोष निवडणुकीपूर्वी निदर्शनास आणून द्यावे, असा आग्रह आयोगाने धरला आहे. जेणे करून मतदानाच्या दिवशी यादीत नाव सापडत नाही, मतदार यादीतून नाव गायब झाले, गेल्या वेळी नाव होते, आत्ताच कसे नाही असे अनेक प्रश्न मतदार व राजकीय पक्षांकडून मतदान केंद्राध्यक्षांना केले जातात. त्यावरून अप्रत्यक्ष आयोगावरच अविश्वास प्रकट होत असतो. ते टाळण्यासाठी आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेतील गोंधळ टाळण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक