शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वी मतदान प्रतिनिधी नेमण्याची राजकीय पक्षांना सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:16 IST

उल्लंघन केल्यानंतर निवडणूक काळात राजकीय पक्षांना तक्रार करण्याची कोणतीही सोय आयोग ठेवू इच्छित नाही. देशपातळीवर आयोगाने सप्टेंबर महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबवून नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्याबरोबरच, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी विविध प्रकारचे अर्ज मतदारांकडून भरून घेतले

ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी नको गोंधळ : याद्या तपासून घेण्याच्या सूचना

नाशिक : मतदानाच्या दिवशी मतदार यादीत नाव नाही, मागच्या वेळी होते, आता नाही असे म्हणून मतदानापासून निवडणूक आयोगाने वंचित ठेवल्याचा ठपका बसू नये म्हणून निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वीच स्वत:ची बाजू सावरण्याचा प्रयत्न चालविला असून, मतदान केंद्रनिहाय शासकीय बीएलओ नेमण्यात आल्यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्षानेदेखील केंद्रनिहाय मतदान प्रतिनिधी नेमण्याची सक्ती केली आहे. राजकीय पक्षांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी अशी यादी सुपूर्द करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन केल्यानंतर निवडणूक काळात राजकीय पक्षांना तक्रार करण्याची कोणतीही सोय आयोग ठेवू इच्छित नाही.देशपातळीवर आयोगाने सप्टेंबर महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबवून नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्याबरोबरच, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी विविध प्रकारचे अर्ज मतदारांकडून भरून घेतले आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर आयोगाने त्यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या, परंतु यादी पाहण्याकडे मतदार व राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले, परिणामी हरकती व सूचना आल्या नाहीत. आता जानेवारीत आयोग अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार असून, त्यावर आधारितच लोकसभेला मतदारांना मतदान करता येणार आहे. ही मतदार यादी बिनचूक असावी यासाठी आयोगाचा प्रयत्न असून, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या बीएलओंकडून ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन तपासून घेतल्या जाणार आहेत. त्याच धर्तीवर राजकीय पक्षांनीदेखील प्रत्येक मतदान केंद्रनिहाय बीएलओ नेमून याद्यांची खात्री करून घ्यावी, असे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना तशा सूचना देऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षाच्या शहर, जिल्हाध्यक्षांना पत्र देऊन त्यांच्याकडून मतदान प्रतिनिधींची नावे मागविली आहेत. राजकीय पक्षांच्या मतदान प्रतिनिधींनी या याद्या आत्ताच तपासून त्यातील दोष निवडणुकीपूर्वी निदर्शनास आणून द्यावे, असा आग्रह आयोगाने धरला आहे. जेणे करून मतदानाच्या दिवशी यादीत नाव सापडत नाही, मतदार यादीतून नाव गायब झाले, गेल्या वेळी नाव होते, आत्ताच कसे नाही असे अनेक प्रश्न मतदार व राजकीय पक्षांकडून मतदान केंद्राध्यक्षांना केले जातात. त्यावरून अप्रत्यक्ष आयोगावरच अविश्वास प्रकट होत असतो. ते टाळण्यासाठी आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेतील गोंधळ टाळण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक