शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

दलित नेत्यांचे ‘पॉलिटीकल एन्काउंटर’

By admin | Updated: March 3, 2017 01:29 IST

नाशिक : जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत भाजप-सेनेबरोबर युती केलेल्या दलित संघटना व पक्षांचा मतांसाठी वापर करून प्रस्थापित पक्षांनी दलित नेत्यांचा पॉलिटीकल एन्काउंटर केला.

 नाशिक : राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत भाजप-सेनेबरोबर युती केलेल्या दलित संघटना व पक्षांचा मतांसाठी वापर करून प्रस्थापित पक्षांनी दलित नेत्यांचा पॉलिटीकल एन्काउंटर केला असून, या निवडणुकीत आठवले, कवाडे, आंबेडकर गटाचे उमेदवार निवडून न आल्यामुळे ते स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी पत्रक काढून ही बाब स्पष्ट केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दलित संघटना व पक्षांशी सेना, भाजप व दोन्ही कॉँगे्रसने काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी आघाडी केली. दलित संघटनांना बोटावर मोजण्या इतपत जागा देऊन त्यांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले गेले. प्रत्यक्षात या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दलित संघटना, पक्षांशी युती करणाऱ्या पक्षांचे उमेदवार निवडून आले, परंतु दलित उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. उदाहरणच द्यायचे तर मुंबई महापालिकेत रामदास आठवले यांनी भाजपासोबत निवडणूक युती केल्यावर रिपब्लिकन पक्षाच्या नावाने कुठल्याही गटाचा प्रतिनिधी महापालिकेत निवडून येऊ शकला नाही. दुसरीकडे प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नागपूर या बालेकिल्ल्यातही एकही जागा निवडून आणता आली नाही. तर प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातही कोणताही करिष्मा होऊ शकलेला नाही. हा सारा प्रकार पाहता, सत्तेचे गाजर दाखवित सर्वच प्रस्थापित पक्षांशी पद्धतशीरपणे दलित नेत्यांचे ‘पॉलिटीकल एन्काउंटर’ केले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेला पराभव पाहता, आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने मोठी नामुष्की ठरली आहे.