शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

सेना-भाजपाच्या प्रचाराने पोलीस सतर्क

By admin | Updated: February 17, 2017 23:45 IST

कायदा सुव्यवस्था धोक्यात : संवेदनशील प्रभागांवर लक्ष

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व भाजपात एकमेकांच्या विरोधात केल्या जात असल्याच्या प्रचाराने राजकीय वातावरण गढूळ होण्याबरोबरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची कटुता निर्माण होऊन त्याचा परिणाम मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा ठरू शकत असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणेने तयार केला असून, त्यादृष्टीने पोलीस बंदोबस्ताची आखणी केली जाणार आहे.  विशेष करून ज्या प्रभागात सेना व भाजपाचे उमेदवार समोरा समोर ठाकले आहेत, त्यातही काट्याची लढत आहे अशा ठिकाणी संवेदनशील असल्याचे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. २६ जानेवारी रोजी शिवसेनेने भाजपाबरोबर युती तोडल्याची घोेषणा केल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपाच्या विरोधात आक्रमकपणे प्रचार करण्यास सुरुवात केली आहे व त्याला त्याच प्रमाणात भाजपानेही उत्तर देण्याचा प्रयत्न चालविल्याची बाब सैनिकांना खटकू लागली आहे.  विशेष करून भाजपाने थेट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करून त्यांच्या मालमत्ता, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवून दुखती नस दाबल्याने शिवसैनिक खवळून उठला आहे. त्याचप्रमाणे सेनेनेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करून ‘औकात’ दाखवून देण्याची भाषा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. ठाकरेद्वयींप्रमाणेच रामदास कदम, संजय राऊत हेदेखील भाजपाला प्रत्येक विषयात आडवे हात घेत असून, सामना मुखपत्रात सातत्याने भाजपाविरोधात केले जात असल्याचे लिखाण भाजपाला बदनामीकारक वाटू लागले आहे. ’आडवे आल्यास आडवे पाडू’, गुंड-पुंडांच्या बळावर भाजपाची वाटचाल, गुंडाचे हात छाटू अशी धमकी देणारी भाषादेखील दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांना उकसावित असल्याने त्याची कोणत्याही कारणाने ठिणगी पडू शकते, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे.  नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा झाल्याने शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची सभा होणार आहे. त्यांच्याकडून ठाकरे यांच्या आरोपांना व टीकेला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही सभांच्या माध्यमातून आणखी राजकीय तणाव निर्माण होऊ शकतो, त्यातून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती अधिक आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या तीन-चार दिवसांत परिस्थितीवर लक्ष ठेवून ज्या ज्या प्रभागात सेना-भाजपा आमनेसामने आहेत अशा ठिकाणांवर अधिक लक्ष देण्याची गरज पोलीस यंत्रणेला वाटू लागली आहे.  दरम्यान, शहरातील विविध मतदान केंद्र, संवेदनशील मतदान केंद्र, रस्त्यावरील बंदोबस्त यासाठी ४ हजार ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तर उर्वरित कर्मचारी इतर कामासाठी वापरले जाणार आहे़ पोलीस प्रशासनाने संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची प्रभागनिहाय यादी तयार केली असून, त्याठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे़