शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

पोलीस साधणार पायी ‘सुसंवाद’

By admin | Updated: October 25, 2015 23:50 IST

परिमंडळ दोन : डीसीपी-एसीपींसह पोलीस कर्मचारी वाढविणार ‘जनसंपर्क’

नाशिक : नागरिक-पोलीस हितसंबंध अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे, जेणेकरून गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसेल आणि कायदा-सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होईल, या उद्देशाने परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या परिसरात दररोज संध्याकाळी वरिष्ठ अधिकारी पायी गस्त घालणार असून, नागरिकांशी ह्यजवळीकह्ण साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.शहर व परिसरातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी परिमंडळ हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कर्मचारींसह निवडलेल्या ठराविक परिसरात संध्याकाळी दोन तास पायी गस्त घालण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस ठाण्यांअंतर्गत वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ठराविक पोलीस ठाणे आणि त्या परिसरात पोलीस रस्त्यावर फिरताना दिसून येणार आहे.पायी गस्त घालताना परिसरातील डॉक्टर, दुकानदार यांसह नागरिकांशी संवाद साधून कायदा सुव्यवस्थेचा आढावा पोलिसांकडून घेतला जाणार आहे. त्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उपद्रवी असणार्‍या समस्या जाणून घेत त्या समस्या तत्काळ सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. सलग पंधरा ते वीस दिवस परिमंडळ दोनच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हा उपक्रम दररोज दोन तास राबविला जाणार असल्याचे ढिवरे यांनी सांगितले. सोमवारी (दि.७) संध्याकाळी साडेसहा वाजता धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे हे सातपूर, इंदिरानगर आणि सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर नाशिकरोड, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तास पायी गस्त घालणार असून, नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही संध्याकाळी दररोज आपापल्या हद्दीत पायी फिरण्याच्या सूचना देण्यात आल्याचे धिवरे म्हणाले. (प्रतिनिधी)

जनसामान्यांमध्ये प्रतिमा उंचविण्यास पूरक

नागरिकांशी सुसंवाद वाढविण्यासाठी आणि शहरातील गुन्हेगारीचा नागरिकांच्या मदतीने बिमोड करण्यासाठी शहर पोलिसांनी आणखी एक पाऊल टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अँप क्रमांक जाहीर करून नाशिककरांच्या आणखी जवळ जात ‘संपर्क’ वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दररोज सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संध्याकाळी दोन तास पायी गस्तीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकूणच शहर पोलिसांकडून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेच्या मनात असलेली पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासदेखील असे उपक्रम पूरक ठरणार असल्याचा आशावाद पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.