शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पोलीस साधणार पायी ‘सुसंवाद’

By admin | Updated: October 25, 2015 23:50 IST

परिमंडळ दोन : डीसीपी-एसीपींसह पोलीस कर्मचारी वाढविणार ‘जनसंपर्क’

नाशिक : नागरिक-पोलीस हितसंबंध अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे, जेणेकरून गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसेल आणि कायदा-सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होईल, या उद्देशाने परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या परिसरात दररोज संध्याकाळी वरिष्ठ अधिकारी पायी गस्त घालणार असून, नागरिकांशी ह्यजवळीकह्ण साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.शहर व परिसरातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी परिमंडळ हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कर्मचारींसह निवडलेल्या ठराविक परिसरात संध्याकाळी दोन तास पायी गस्त घालण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस ठाण्यांअंतर्गत वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ठराविक पोलीस ठाणे आणि त्या परिसरात पोलीस रस्त्यावर फिरताना दिसून येणार आहे.पायी गस्त घालताना परिसरातील डॉक्टर, दुकानदार यांसह नागरिकांशी संवाद साधून कायदा सुव्यवस्थेचा आढावा पोलिसांकडून घेतला जाणार आहे. त्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उपद्रवी असणार्‍या समस्या जाणून घेत त्या समस्या तत्काळ सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. सलग पंधरा ते वीस दिवस परिमंडळ दोनच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हा उपक्रम दररोज दोन तास राबविला जाणार असल्याचे ढिवरे यांनी सांगितले. सोमवारी (दि.७) संध्याकाळी साडेसहा वाजता धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे हे सातपूर, इंदिरानगर आणि सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर नाशिकरोड, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तास पायी गस्त घालणार असून, नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही संध्याकाळी दररोज आपापल्या हद्दीत पायी फिरण्याच्या सूचना देण्यात आल्याचे धिवरे म्हणाले. (प्रतिनिधी)

जनसामान्यांमध्ये प्रतिमा उंचविण्यास पूरक

नागरिकांशी सुसंवाद वाढविण्यासाठी आणि शहरातील गुन्हेगारीचा नागरिकांच्या मदतीने बिमोड करण्यासाठी शहर पोलिसांनी आणखी एक पाऊल टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अँप क्रमांक जाहीर करून नाशिककरांच्या आणखी जवळ जात ‘संपर्क’ वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दररोज सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संध्याकाळी दोन तास पायी गस्तीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकूणच शहर पोलिसांकडून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेच्या मनात असलेली पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासदेखील असे उपक्रम पूरक ठरणार असल्याचा आशावाद पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.