शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पोलीस साधणार पायी ‘सुसंवाद’

By admin | Updated: October 25, 2015 23:50 IST

परिमंडळ दोन : डीसीपी-एसीपींसह पोलीस कर्मचारी वाढविणार ‘जनसंपर्क’

नाशिक : नागरिक-पोलीस हितसंबंध अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे, जेणेकरून गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसेल आणि कायदा-सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होईल, या उद्देशाने परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या परिसरात दररोज संध्याकाळी वरिष्ठ अधिकारी पायी गस्त घालणार असून, नागरिकांशी ह्यजवळीकह्ण साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.शहर व परिसरातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी परिमंडळ हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कर्मचारींसह निवडलेल्या ठराविक परिसरात संध्याकाळी दोन तास पायी गस्त घालण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस ठाण्यांअंतर्गत वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ठराविक पोलीस ठाणे आणि त्या परिसरात पोलीस रस्त्यावर फिरताना दिसून येणार आहे.पायी गस्त घालताना परिसरातील डॉक्टर, दुकानदार यांसह नागरिकांशी संवाद साधून कायदा सुव्यवस्थेचा आढावा पोलिसांकडून घेतला जाणार आहे. त्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उपद्रवी असणार्‍या समस्या जाणून घेत त्या समस्या तत्काळ सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. सलग पंधरा ते वीस दिवस परिमंडळ दोनच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हा उपक्रम दररोज दोन तास राबविला जाणार असल्याचे ढिवरे यांनी सांगितले. सोमवारी (दि.७) संध्याकाळी साडेसहा वाजता धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे हे सातपूर, इंदिरानगर आणि सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर नाशिकरोड, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तास पायी गस्त घालणार असून, नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही संध्याकाळी दररोज आपापल्या हद्दीत पायी फिरण्याच्या सूचना देण्यात आल्याचे धिवरे म्हणाले. (प्रतिनिधी)

जनसामान्यांमध्ये प्रतिमा उंचविण्यास पूरक

नागरिकांशी सुसंवाद वाढविण्यासाठी आणि शहरातील गुन्हेगारीचा नागरिकांच्या मदतीने बिमोड करण्यासाठी शहर पोलिसांनी आणखी एक पाऊल टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अँप क्रमांक जाहीर करून नाशिककरांच्या आणखी जवळ जात ‘संपर्क’ वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दररोज सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संध्याकाळी दोन तास पायी गस्तीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकूणच शहर पोलिसांकडून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेच्या मनात असलेली पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासदेखील असे उपक्रम पूरक ठरणार असल्याचा आशावाद पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.