शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
5
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
6
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
7
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
8
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
9
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
10
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
12
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
13
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
14
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
15
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
16
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
17
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
18
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
19
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
20
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

चोरट्यांच्या उपद्रवाने पोलीसही जेरीस

By admin | Updated: May 15, 2014 00:16 IST

सिन्नर शहर व परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरूअसलेल्या भुरट्या चोर्‍यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे.

सुनील थोरात ल्ल सिन्नर शहर व परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरूअसलेल्या भुरट्या चोर्‍यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. त्यातील एकही चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. चोरट्यांच्या या उपद्रवामुळे नागरिक, व्यापार्‍यांसह पोलीसही जेरीस आले आहेत. सिन्नर शहर, उपनगरे व मुसळगाव या भागाला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. येथील नवापूल भागातील भैरवनाथ शॉपिंग सेंटर परिसरात पाच ठिकाणी मिळून विविध भागात सुमारे ५० ते ६० दुकाने फोडून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे रात्रीला सरासरी दोन चोर्‍या या नित्याच्याच ठरलेल्या आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे कार्यभाग उरकत आहे. त्यामुळे सिन्नर चोरांचे शहर होऊ पाहत असल्याने ही बाब चिंताजनक असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरू लागले आहे. ज्या दुकानात रोख रक्कम मिळाली नाही त्या दुकानांतून माल घेऊन पोबारा केला आहे. दिवसभर कष्ट करून थोड्याफार नफ्यातून उदरनिर्वाह करणार्‍या व्यापार्‍यांचे ‘तेलही गेले अन् तूपही गेले...’ अशी अवस्था झाली आहे. चोरी गेलेला माल परत मिळणे सोडाच; परंतु महिनाभरात एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागू शकला नाही हे विशेष. सातत्याने एकाच परिसरात चोर्‍या होत असल्याने ते भुरटे चोर असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सरदवाडी रस्त्यालगत असलेल्या दुकानांमधून तसेच बंद घराची कुलुपे तोडून चोरट्यांनी हात धुवून घेतला आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी पोलिसांच्या कमी संख्येवरही रात्रीच्या गस्तीचे नियोजन केले. रात्रीची गस्त सुरळीत असल्याने चोरट्यांवर पोलिसांचा वचक होता. अर्थातच चोर्‍यांचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र गेल्या महिन्यापासून पोलिसांची गस्त सुरू असली तरीही पोलिसांचा धाक उरला नसल्याने चोरटे निर्ढावले आहेत. शहराची वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारा विस्तार यामुळे पोलिसांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. दोन्ही औद्योगिक वसाहती, एक राष्ट्रीय महामार्ग, तीन महत्त्वाचे राज्य मार्ग व त्यावर होणारे अपघात, विविध कौटुंबिक, जमिनीचे वाद, हाणामार्‍या, चोर्‍या तसेच रस्त्याने जाणार्‍या व्हीआयपींचा बंदोबस्त, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लागणारे पोलीस बळ त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे विविध गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा शोध आदि कामांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहेत. मात्र त्याकडे शासनाचे वरिष्ठ आधिकारी काणाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जाता आहे.