शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या उपद्रवाने पोलीसही जेरीस

By admin | Updated: May 15, 2014 00:16 IST

सिन्नर शहर व परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरूअसलेल्या भुरट्या चोर्‍यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे.

सुनील थोरात ल्ल सिन्नर शहर व परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरूअसलेल्या भुरट्या चोर्‍यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. त्यातील एकही चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. चोरट्यांच्या या उपद्रवामुळे नागरिक, व्यापार्‍यांसह पोलीसही जेरीस आले आहेत. सिन्नर शहर, उपनगरे व मुसळगाव या भागाला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. येथील नवापूल भागातील भैरवनाथ शॉपिंग सेंटर परिसरात पाच ठिकाणी मिळून विविध भागात सुमारे ५० ते ६० दुकाने फोडून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे रात्रीला सरासरी दोन चोर्‍या या नित्याच्याच ठरलेल्या आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे कार्यभाग उरकत आहे. त्यामुळे सिन्नर चोरांचे शहर होऊ पाहत असल्याने ही बाब चिंताजनक असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरू लागले आहे. ज्या दुकानात रोख रक्कम मिळाली नाही त्या दुकानांतून माल घेऊन पोबारा केला आहे. दिवसभर कष्ट करून थोड्याफार नफ्यातून उदरनिर्वाह करणार्‍या व्यापार्‍यांचे ‘तेलही गेले अन् तूपही गेले...’ अशी अवस्था झाली आहे. चोरी गेलेला माल परत मिळणे सोडाच; परंतु महिनाभरात एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागू शकला नाही हे विशेष. सातत्याने एकाच परिसरात चोर्‍या होत असल्याने ते भुरटे चोर असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सरदवाडी रस्त्यालगत असलेल्या दुकानांमधून तसेच बंद घराची कुलुपे तोडून चोरट्यांनी हात धुवून घेतला आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी पोलिसांच्या कमी संख्येवरही रात्रीच्या गस्तीचे नियोजन केले. रात्रीची गस्त सुरळीत असल्याने चोरट्यांवर पोलिसांचा वचक होता. अर्थातच चोर्‍यांचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र गेल्या महिन्यापासून पोलिसांची गस्त सुरू असली तरीही पोलिसांचा धाक उरला नसल्याने चोरटे निर्ढावले आहेत. शहराची वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारा विस्तार यामुळे पोलिसांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. दोन्ही औद्योगिक वसाहती, एक राष्ट्रीय महामार्ग, तीन महत्त्वाचे राज्य मार्ग व त्यावर होणारे अपघात, विविध कौटुंबिक, जमिनीचे वाद, हाणामार्‍या, चोर्‍या तसेच रस्त्याने जाणार्‍या व्हीआयपींचा बंदोबस्त, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लागणारे पोलीस बळ त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे विविध गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा शोध आदि कामांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहेत. मात्र त्याकडे शासनाचे वरिष्ठ आधिकारी काणाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जाता आहे.