शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:36 IST

घोटी : गणेशोत्सवासाठी इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांसाठी निर्धोक व सुखकर गणेशोत्सव व्हावा यासाठी गुप्त माहिती, तपासणी, आपत्कालीन परिस्थितीसाठी रु ग्णवाहिका, क्र ेनसह मोठी यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी सांगितले.

ठळक मुद्देअरुंधती राणे : वाडीवºहे पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक

घोटी : गणेशोत्सवासाठी इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांसाठी निर्धोक व सुखकर गणेशोत्सव व्हावा यासाठी गुप्त माहिती, तपासणी, आपत्कालीन परिस्थितीसाठी रु ग्णवाहिका, क्र ेनसह मोठी यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी सांगितले.वाडीवºहे पोलीस ठाण्यात मंगळवारी सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, जागरूक नागरिक आदींची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी श्रीमती राणे बोलत होत्या. तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वांगीण प्रशिक्षित करून सतर्क करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाºया उपाययोजनांची जय्यत तयारी प्रशासनस्तरावरून करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनीही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. गेल्या वर्षी उत्कृष्ठ कामगिरी करणाºया गणेश मंडळांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी सांगितले की वाडीवºहे, घोटी, इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाºया प्रत्येक घटनेवर २४ तास पोलीस पथकाचे सुक्ष्म लक्ष राहणार आहे. तालुक्यात गणेशोत्सव काळामध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची विशेष कुमक तैनात ठेवली जाणार आहे.बैठकी प्रसंगी पोलीस हवालदार सोमनाथ बोराडे, जी. एस. परदेशी, ए. आर. बोडके, बी. पी. भगत, पी. आर. मोरे, बी. डी. सोनवणे, आर. ए. शेख, आर. पी. मुळाणे, के. यु. निंबाळकर, पी. जी. भोईर, एम. एस. गाडे, दिलीप चौधरी, पिंपळदचे सरपंच कड आदींसह विविध गावातील गणेश मंडळ पदाधिकारी, पोलीस पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.गणेशोत्सवाचे नियमगणेश मंडळांना आॅनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. गणेश उत्सवाचे मंडप न्यायालयाच्या नियमानुसार असायला हवे, मंडपासाठी रस्ता रु ंदीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त जागा वापरू नये रस्त्यावरील वाहतुकीच्या दिशेनेच मंडपाचे प्रवेशद्वार असावे, सिग्नल आणि चौकाच्या १०० फूट अंतरामध्ये कोणताही मंडप उभारू नये, ध्वनी प्रदूषणाचे कसोशीने पालन करावे, मंडळांची आॅनलाईन नोंदणी करावी, ज्यामुळे पोलिसांना सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, रस्त्यावर, मंडपाजवळ गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची खबरदारी मंडळांनी घ्यावी. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. उत्सव काळात नागरिकांना अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले.