शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

कुख्यात गुंड शार्पशूटर ज्या ‘पार्वती’च्या फ्लॅट क्रमांक तेरामध्ये आश्रयाला होते त्या घरमालकावर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 14:35 IST

घर मालकांनी भाडेतत्वाचा करार भाडेकरूंशी करताना आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात त्या कराराची माहिती द्यावी व आवश्यक कागदपत्रांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पुर्तता करून पोलिसांकडून पडताळणी करुन घेत नाहरकरत दाखला प्राप्त करावा, असा आदेश तत्कालीन पोलिस आयुक्तांनी काढला होता. मात्र अद्यापही याबाबत नागरिकांकडून टाळाटाळ केली जाते.

ठळक मुद्देशहरात मोठा कांड घडविण्याच्या उद्देशाने त्यांनी आश्रय घेतल्याचा पोलिसांनी संशय १३ क्रमांकाची सदनिका सावंत यांच्या मालकीची

इंदिरानगर : अहमदनगरच्या कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व घातक शार्प शूटर अशा तीघा गुन्हेगारांना कोणतीही चौकशी न करता स्व मालकिच्या सदनिकेत भाडेतत्वाचा करार करून आश्रय दिला; मात्र याबबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यापासून दडविल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पार्वती अपार्टमेंटमधील रहिवासी घरमालक रमेश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सदनिके तून पोलिसांनी रविवारी पहाटे कुख्यात गुंडांच्या मुसक्या शिताफिने आवळल्या. शहरात मोठा कांड घडविण्याच्या उद्देशाने त्यांनी आश्रय घेतल्याचा पोलिसांनी संशय आहे.दहशतवादविरोधी पथकाने काही वर्षांपूर्वी सातपूर परिसरात दहशतवादी बिलालला अटक केली होती. त्यानंतर घर मालकांनी भाडेतत्वाचा करार भाडेकरूंशी करताना आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात त्या कराराची माहिती द्यावी व आवश्यक कागदपत्रांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पुर्तता करून पोलिसांकडून पडताळणी करुन घेत नाहरकरत दाखला प्राप्त करावा, असा आदेश तत्कालीन पोलिस आयुक्तांनी काढला होता. मात्र अद्यापही याबाबत नागरिकांकडून टाळाटाळ केली जाते.पाथर्डी परिसरातील विक्रीकर भवनाच्या पाठीमागे असलेल्या पार्वती अपार्टमेंटच्या तीसर्‍या मजल्यावरील १३ क्रमांकाची सदनिका सावंत यांच्या मालकीची आहे. हा परिसर तसा नव्याने विकसीत होत असल्यामुळेया भागात वर्दळीही कमी असते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून अहमदनगरच्या मोक्यातील सराईत गुन्हेगार शाहरूख शेख, सागर पगारे, बारकू अंभिरे यांया मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन विदेशी बनावटीचे पिस्तूल, चाळीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शहरात मोठे कांड करण्याचा कट या तिघांनी रचला होता; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आणि या कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. मात्र याबाबत जर घरमालकाने संबंधितांची माहिती पोलिसांना याअगोदरच दिली असती तर कदाचित इतक्या कालावधीपर्यंत त्यांना वास्तव्य करता आले नसते. सावंत यांनी माहिती दडविल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.