शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कवीने सर्वसामान्यांच्या व्यथा, वेदना मांडाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:15 IST

काळानुसार भाषा बदलली; परंतु मराठी भाषेची महती कायम आहे. सामान्य माणसाची कुणाला पर्वाच दिसत नाही. त्यामुळे आजच्या कवीने सामान्य माणसांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे, असे मत कवी नारायण पुरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनारायण पुरी : पिंंपळगाव महविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा रंगला

पिंपळगाव बसवंत : काळानुसार भाषा बदलली; परंतु मराठी भाषेची महती कायम आहे. सामान्य माणसाची कुणाला पर्वाच दिसत नाही. त्यामुळे आजच्या कवीने सामान्य माणसांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे, असे मत कवी नारायण पुरी यांनी व्यक्त केले.येथील मविप्र समाजाच्या क. का. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे सभापती माणिक बोरस्ते, संचालक प्रल्हाद गडाख, संचालक सचिन पिंगळे, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वास मोरे, प्रतापदादा मोरे, उल्हास मोरे, प्रवीण लभडे, कवी संदीप जगताप, कैलास सलादे, गुलाब मोरे, नामदेव मोरे, अशोक मोरे, चेतन मोरे, उपप्राचार्य डी. डब्लू. दाते आदी उपस्थित होते. प्राचार्य दरेकर यांनी प्रास्ताविक केले. गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.कवी पुरी यांनी आपल्या गाजलेल्या काटा व प्रेमाचा झांगडगुत्ता या कवितांमधून देशातील सध्याच्या विदारक परिस्थितीवर कोरडे ओढले. राजकारणामुळे सामान्याची अवस्था कशी चोथ्यासारखी झाले ते मार्मीकतेने दाखवून दिले. आज जिव्हाळ्याची नाती बदलली आहेत. नात्यांमधील पावित्र्य जपले पाहिजे. तरच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. आदर्श घडला तरच अन्याय-अत्याचार थांबतील. माणूस ज्या गोष्टीची दक्षता घेत नाही त्या लुप्त होतात. त्यामुळे आपल्या भावना जपल्या पाहिजेत, असेही नारायण पुरी म्हणाले. ज्ञानोबा ढगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. बी. बी. पेखळे यांनी क्रीडा अहवाल वाचन केले. साहेबराव मोरे, ग्रंथपाल मेहंदळे यांनी पारितोषिक यादीचे वाचन केले. प्रा. शोभा डहाळे, अल्ताफ देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. जे. पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक