शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जात्यावरील ओवींमुळेच कविता जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:24 IST

जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण पुरी यांनी केले.

ठळक मुद्देनारायण पुरी : रानवड महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ

पिंपळगाव बसवंत : जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण पुरी यांनी केले.रानवड येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य व्ही. एस. शिरसाठ, एस. पी. कदम, प्रा. ऐश्वर्य पाटेकर, रामभाऊ पानगव्हाणे, रामभाऊ आहेर, अशोक सोमवंशी, विलास वाघ, दीपक वाघ, महेश होळकर, मेघा रायते, गणेश आवारे आदी उपस्थित होते. आज राजकीय झेंडे घ्याल तर उद्या धोंडे हाती येतील, त्यामुळे युवकांनी फक्त तिरंगा झेंडाच हातात घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. महेश होळकर यांनी केला. प्रा. भाग्यश्री मोरे व ऐश्वर्या ताकटे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. आवारे यांनी आभार मानले.आईसाठी, मातृभूमीसाठी रक्त सांडता येते तोच खरा देशभक्तकवी पुरी यांनी ‘प्रेमाचा जंगडगुत्ता’ ही कविता सादर करताना त्यांनी बाहुबलीला कटपाने का मारले हा प्रश्न भारताला पडला होता; पण दाभोलकरांना का मारले? त्यांचे आरोपी कोण, हा प्रश्न भारताला नाही, फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना जरी पडला असता तरी आज त्यांचे मारेकरी कारागृहात असते, असे परखड मत मांडले. ज्याला आईसाठी व मातृभूमीसाठी रक्त सांडता येते तोच खरा देशभक्त असतो. कोणीही रंगावर जाऊ नये. जे ढग काळे असतात त्यातच पाणी असते. काळा रंग निर्मितीचे प्रतीक आहे. कवीने सामान्य माणसांच्या वेदना मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे. समाजात साप, सरडे निर्माण होऊ नये हाच साहित्यिकांचा उद्देश असतो, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक