शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

पाट पाणीप्रश्नी दिशाभूल

By admin | Updated: August 28, 2016 22:14 IST

येवला : कालवा कृती समितीच्या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया

येवला : तालुक्याच्या दुष्काळग्रस्त उत्तर-पूर्व भागातील शेतीसाठी नियोजित मांजरपाडा पाटपाण्याच्या प्रश्नात राजकीय कुरघोडीचा खेळ सुरू असल्याने हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी अजून किती वर्षे लागतील, असा संतप्त सवाल पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. शासनाने तृषार्त जनतेचा अधिक अंत न बघता तत्काळ धरणाचे व कालव्याचे काम सुरू करावे अन्यथा संतप्त येवलेकर तीव्र जनआंदोलन छेडतील, असा इशारा शनिवारी (दि. २७) दुपारी येवला येथील शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या समितीच्या बैठकीत देण्यात आला.यावेळी दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बद्रीनाथ कोल्हे बैठकीत बोलताना म्हणाले की, पुणेगाव धरणाचे पाणी दरसवाडी धरणापर्यंत चाचणी घेण्यात येणार असल्याचे श्रेय तालुक्यातील काही लोकांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाटण्याचे काम चालविले आहे. एका दिवसात उपोषण करून प्रश्न सुटणार होता तर गेल्या ३० वर्षांपासून हा प्रश्न हाती सत्ता असताना का मार्गी लावला नाही, असा संतप्त सवाल कोल्हे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, या कालव्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या कामास तृतीय सुधारित मान्यता देऊन तत्काळ काम सुरू करण्यात यावे अन्यथा आम्हाला तीव्र जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.संजय मिस्तरी यांनी सांगितले की, तालुक्यात पाणी येणार म्हणून लोकांनी गाजावाजा केला, प्रसिद्धीसाठी बातम्या दिल्या. ही गोष्ट जनतेची दिशाभूल करणारी आहे.मांजरपाडा प्रकल्पाला गती द्यावी अशी मागणी मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळांनी केली होती. त्यावर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे अधिवेशन बैठकीत जाहीर केले होते. मात्र दोन वर्षं होऊनही कोणताच निर्णय झाला नसल्याची खंत प्रा. सुदाम भालेराव यांनी व्यक्त केली.यापूर्वीचे ओझरखेडनंतरचे पुणेगाव व आत्ताचे मांजरपाडा अशा नामकरणात चाळीस वर्षांचा कालखंड लोटला तरी प्रश्न मार्गी लागत नसल्याने लाभक्षेत्रातील जनतेच्या भावना तीव्र बनल्या आहेत. पाटपाणी प्रश्नाला गती मिळावी. दुष्काळी परिस्थितीत प्रश्नाला वाचा फोडून जनतेला झुलवत ठेवण्याचे काम चाळीस वर्षे येथील पुढाऱ्यांनी केले आहे, असा आरोप सभेत करण्यात आला. रामा घोडके म्हणाले की, ३० वर्षांतील अकार्यक्षम नेतृत्वाने हा पाटपाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. मांजरपाडा धरण, बोगदा, वळण बंधारे व कॅनॉलच्या कामात बरीच अपूर्तता आहे. झालेल्या कामावरील खर्च झालेला निधी व अपूर्ण कामाची टक्केवारी व लागणारा पैसा व कालावधी याबाबत माहिती लपविली जात आहे. त्यामुळे पाटपाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरीवर्गाचा शासनाने आता अंत पाहू नये, अशी अपेक्षा घोडके यांनी व्यक्त केली. दुष्काळी येवले तालुक्यातील शेतीला हक्काचे पाणी मिळवून द्यायचे असेल तर तीव्र संघर्षाशिवाय पर्याय नाही, असा सूर या बैठकीतून निघाला. बैठकीस दादा पाटील, दिनकर लोहकरे, जगन भोसले, श्रावण देवरे, प्रकाश जानराव, विठ्ठल बोरसे, संजय सोमासे, विठ्ठल दारुंटे, गोरख भालेराव आदि कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)