शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

आनंदी जीवनासाठी वृक्ष लागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:48 IST

त्र्यंबकेश्वर : निरोगी व आनंददायी तसेच उत्तम शरीर प्रकृती ठेवायची असेल तर वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. त्यापुढे म्हणाल्या, वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राहील.

ठळक मुद्देब्रह्मकुमारी वासंतीदीदी : त्र्यंबकेश्वर आश्रमात विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : निरोगी व आनंददायी तसेच उत्तम शरीर प्रकृती ठेवायची असेल तर वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. त्यापुढे म्हणाल्या, वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राहील.क्लीन इंडिया ग्रीन इंडिया या ब्रह्माकुमारी मुख्यालयातून सुरू झालेल्या प्रकल्पांतर्गत प्रत्येक शहरात प्रत्येक गावात विविध ठिकाणी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे वृक्ष लावण्यात येतात. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर प्रत्येकाला प्रफुल्लित व टवटवीत वाटते.येथील तलाठी कॉलनीत राजयोग सेवा केंद्रातर्फे उपक्षेत्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यात प्रमुख पाहुणे म्हणून येथील नगरसेवक संगीता भांगरे उपस्थित होत्या. प्रास्ताविक बी.के. दिलीप यांनी तर आभार प्रदर्शन निर्मला माता यांनी केले.या प्रसंगी नाशिक येथून आमंत्रित संस्थेच्या युवा साधकांनी त्र्यंबकेश्वरमधील विविध ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व मास्क लावून विविध जातीच्या ४० वृक्षांची लागवड केली.आरोग्य व विविध उपयोगिता असलेल्या झाडांमुळे आॅक्सिजन तर मिळतोच सोबत पर्यावरण संतुलन राखले जाते. यामुळेच शाळा-महाविद्यालय, लॉन्स, मंगल कार्यालय आदी ठिकाणी झाडे लावून हिरवळ जोपासली जाते. ज्यामुळे लोकांचे मन प्रफुल्लित होते. सोबत व्यक्तीचे आरोग्यसुद्धा सुदृढ रहाते. तन व मन हे स्वस्थ आरोग्य ठेवण्यासाठी वृक्षारोपण हे चांगले माध्यम आहे, असे प्रतिपादन वासंतीदीदी यांनी सांगितले.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर