शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अंजनेरी ते ब्रह्मगिरीदरम्यान लवकरच रोपवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 22:39 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक त्र्यंबक नगरीत येत असतात. या परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पर्वतांचेही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, उंच आणि घनदाट जंगलात असलेल्या या पर्वतांच्या ठिकाणी जाणे भाविक तथा पर्यटकांना या जाणे शक्य होत नसल्याने अंजनेरी - ब्रह्मगिरी यादरम्यान रोपवे तयार करावा, या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार केला असून रोपवे प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षणाकरिता कन्सल्टंट एजन्सी नेमण्याबाबत शासनाने आदेश काढले असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार सकारात्मक : सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमण्याचे आदेश

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक त्र्यंबक नगरीत येत असतात. या परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पर्वतांचेही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, उंच आणि घनदाट जंगलात असलेल्या या पर्वतांच्या ठिकाणी जाणे भाविक तथा पर्यटकांना या जाणे शक्य होत नसल्याने अंजनेरी - ब्रह्मगिरी यादरम्यान रोपवे तयार करावा, या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार केला असून रोपवे प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षणाकरिता कन्सल्टंट एजन्सी नेमण्याबाबत शासनाने आदेश काढले असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.त्र्यंबकेश्वर परिसरात अंजनेरी आणि ब्रह्मगिरी ही ऐतिहासिक स्थळे असून आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा घनदाट जंगलाचा आहे. अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या दोन्ही पर्वतांचे धार्मिक इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असले तरी या पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने भाविकांना तेथे जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. या ठिकाणी रोपवे झाल्यास पर्यटक तसेच भाविक अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पवित्र स्थळांना भेट देऊ शकतात. तसेच चित्रपटांचे चित्रीकरण होऊन हा परिसर आणखी विकसित होऊ शकेल. या सकारात्मक विचारातून या ठिकाणी रोपवे उभारण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट या कंपनीने या मागणीचा सकारात्मक विचार केला असून अंजनेरी- ब्रह्मगिरी यादरम्यानच्या रोपवेच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे. यातूनच अंजनेरी - ब्रह्मगिरीदरम्यानच्या प्रस्तावित रोपवे प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याकामी सविस्तर प्रॉजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी केंद्र सरकारने कन्सल्टंट एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पायाभूत सुविधांचा अभावअंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असून ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शिवशंकर यांनी जटा आपटल्याने त्या ठिकाणाहून गोदावरी मातेचा उगम झालेला आहे. या दोन्ही उंच पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने अंजनेरी, ब्रह्मगिरी ही ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहे. अंजनेरी-ब्रह्मगिरी या ऐतिहासिक पर्वतांना जोडणारा रोपवे झाल्यास पर्यटनाला निश्चितच मोठी चालना मिळणार आहे.

 

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरHemant Godseहेमंत गोडसे