शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अंजनेरी ते ब्रह्मगिरीदरम्यान लवकरच रोपवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 22:39 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक त्र्यंबक नगरीत येत असतात. या परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पर्वतांचेही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, उंच आणि घनदाट जंगलात असलेल्या या पर्वतांच्या ठिकाणी जाणे भाविक तथा पर्यटकांना या जाणे शक्य होत नसल्याने अंजनेरी - ब्रह्मगिरी यादरम्यान रोपवे तयार करावा, या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार केला असून रोपवे प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षणाकरिता कन्सल्टंट एजन्सी नेमण्याबाबत शासनाने आदेश काढले असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार सकारात्मक : सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमण्याचे आदेश

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक त्र्यंबक नगरीत येत असतात. या परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पर्वतांचेही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, उंच आणि घनदाट जंगलात असलेल्या या पर्वतांच्या ठिकाणी जाणे भाविक तथा पर्यटकांना या जाणे शक्य होत नसल्याने अंजनेरी - ब्रह्मगिरी यादरम्यान रोपवे तयार करावा, या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार केला असून रोपवे प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षणाकरिता कन्सल्टंट एजन्सी नेमण्याबाबत शासनाने आदेश काढले असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.त्र्यंबकेश्वर परिसरात अंजनेरी आणि ब्रह्मगिरी ही ऐतिहासिक स्थळे असून आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा घनदाट जंगलाचा आहे. अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या दोन्ही पर्वतांचे धार्मिक इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असले तरी या पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने भाविकांना तेथे जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. या ठिकाणी रोपवे झाल्यास पर्यटक तसेच भाविक अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पवित्र स्थळांना भेट देऊ शकतात. तसेच चित्रपटांचे चित्रीकरण होऊन हा परिसर आणखी विकसित होऊ शकेल. या सकारात्मक विचारातून या ठिकाणी रोपवे उभारण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट या कंपनीने या मागणीचा सकारात्मक विचार केला असून अंजनेरी- ब्रह्मगिरी यादरम्यानच्या रोपवेच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे. यातूनच अंजनेरी - ब्रह्मगिरीदरम्यानच्या प्रस्तावित रोपवे प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याकामी सविस्तर प्रॉजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी केंद्र सरकारने कन्सल्टंट एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पायाभूत सुविधांचा अभावअंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असून ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शिवशंकर यांनी जटा आपटल्याने त्या ठिकाणाहून गोदावरी मातेचा उगम झालेला आहे. या दोन्ही उंच पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने अंजनेरी, ब्रह्मगिरी ही ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहे. अंजनेरी-ब्रह्मगिरी या ऐतिहासिक पर्वतांना जोडणारा रोपवे झाल्यास पर्यटनाला निश्चितच मोठी चालना मिळणार आहे.

 

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरHemant Godseहेमंत गोडसे